Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पालघर साधूंच्या हत्येचा तपास सीबीआय मार्फत करावा- विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी

Date:

गडचिंचले गावातील घटनास्थळाला दिली भेट
मुंबई दि. ९ मे- पालघरमधील गडचिंचले येथे झालेल्या साधूंच्या सामुदायिक हत्याकांडाचा तपास सीबीआय मार्फत करण्यात यावा, तसेच या प्रकरणाचा तपास फास्टट्रॅक पध्दतीने करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली. तसेच २५ दिवस उलटूनही या प्रकरणातील प्रमुख हल्लेखोरांना अटक करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या राजकीय नेत्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याची जोरदार टीका प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
पालघरमध्ये साधू व त्यांच्या चालकाची निघृणपणे हत्या झाल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज गडचिंचले गावात घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत आमदार मनिषा चौधरी,आमदार सुनिल राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदु पाटील, माजी आमदार पास्कल धनारे उपस्थित होते. घटनास्थळी असेलेले पोलिस उप अधिक्षक सोनावणे यांच्याकडून घटनेची संपूर्ण माहिती त्यांनी घेतली, त्यानंतर पालघरचे पोलिस अधिक्षक देशमुख यांची भेट घेऊन त्यांना या प्रकणासंदर्भात निवेदन सादर केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर यांनी सांगितले की, ही दुर्दैवी घटनेनंतर आपण तातडीने घटनास्थळी जात होतो, परंतु पोलिस व प्रशासनाने चेक नाक्यावर आम्हाला अडवून तेथे जाण्यापासून रोखले. दोन साधू व चालकाच्या सामुदायिक हत्याकांडाची घटना ही महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासणारी आहे अशी टीकेची झोड त्यांनी उठविली.
या हत्येचा तपास ज्या गतीने होऊन या हत्येमागे कोण सूत्रधार होता त्याची माहिती जनेतसमोर येणे गरजेचे आहे. कारण ज्या पध्दतीने समुदयाने एकत्रित येऊन साधूंना ठेचून मारणे हे महाराष्ट्राला भूषावह नाही. म्हणून या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आपण त्याचवेळी केली होती. कारण चौकशी करणारे पोलिस व येथे आक्षेप असणारे पोलिस हे एकच असल्यामुळे हा तपास निपक्षरित्या होऊ शकत नाही म्हणूनच आपण सीबीआय तपासाची मागणी केल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी पोलिस अधिक्षक देशमुख यांना निवेदन देण्यात आले असून २५ दिवस उलटूनही या घटनेतील काही प्रश्न अनुत्तरित आल्याचे दरेकर यांनी येथे निर्दशनास आणून दिले.
दरेकर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत, त्यानुसार जमावाने केलेला हल्ला हा चिथावणीमधून झाला होता व विशिष्ट विचारसरणींच्या माथेफिरूंनी हा कट रचला होता, अशी चर्चा असताना सरकारकडून या प्रकरणाच्या तपासात आतापर्यत प्रगती दिसत नाही. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार का केला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच २५ दिवस उलटूनही हल्ल्यामागील सूत्रधार कोण आहेत हे शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, जमावाने प्रथम पोलिसांना मारहाण केली, मग ही बाब तातडीने पोलिसांनी जिल्हा मुख्यालयाला का कळविण्यात आली नाही, याचेही कारण आम्हाला हवे आहे. त्याचप्रमाणे पालघर पासून गडचिंचले हे ठिकाण एका तासाच्या अंतरावर असताना पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी ५ तास वेळ का लागले. असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत, त्यामुळे या सर्व प्रश्नांची जलदगतीने चौकशी होऊन हे प्रकरण फास्टट्रॅक पध्दतीने चालवावे अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केली.
साधू व चालक यांच्या सामुदायिक हत्येमागे पोलिस व स्थानिक प्रशासन यामधील जे कोणी दोषी असतील त्या प्रत्येकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करतानाच घटना घडल्यानंतर गृहमंत्र्यांनी तात्काळ या ठिकाणी येणे गरजेचे होते पण खूपच उशिरा घटनास्थळी येऊन त्यांनी काय साधले हे माहित नसल्याचा टोलाही दरेकर यांनी मारला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन शिक्षेत वाढ:सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या विधेयकाचे झाले काय?

दारूबंदी सुधारणा विधेयक 2025 घेतले मागे... मुंबई-सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून...

दारुबंदी विधेयक सुधारणेसाठी सभागृहात आमदार महेश लांडगे यांनी मांडली आक्रमक भूमिका

कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांचे सर्वंकष उपाययोजनांचे निर्देश मुंबई/ पिंपरी-चिंचवड...

चाकूर च्या माजी नगराध्यक्षांसह शरद पवार गट, ‘प्रहार’ च्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत मुंबई, 11 जुलै...

साक्षीभावात राहिल्यास जीवनातला प्रत्येक क्षण आनंददायी : अभयकुमार सरदार

‌‘निसर्गातील कार्यक्षमता‌’ विषयावर अनोखे चित्रप्रदर्शन पुणे : साक्षीभाव साध्य झाल्यास...