पोलिस खाते म्हणजे अगदीच धकाधकीचे मानले जाते या खात्यात नुसतीधावपळ,दगदग आणि यातुन होणारी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची ससेहोलपटत्यातून पोलीस वर्गाची चिडचीड अशा सेवेत काम करताना जनतेच्या नाही त्या
प्रश्नांची सोडवनुक समाधानकारक करावी लागते.येथे गट तट दबाव अशागोष्टींना न जुमानता जनतेविषयी न्यायक भुमिका ठेवावी लागते.पोलिस ठाण्यातयेणा-या प्रत्येक तक्रारदाराचे म्हणने ऐकून घेऊन त्यावर न्याय निवाडाकरावा लागतो अशावेळी निःपक्षपातीपने काम करण्यासाठी पोलिसांची अगदीचकसोटी लागते अशा कसोटीला उतरुन सर्वाची मने राखावी लागतात त्यातूनगुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी कर्तव्यदक्ष रहावे लागते आणि सामाजीक कोणाचाही रोष न पत्करता सामाजिक भान ही जपावे लागते अशी तारेवरची कसरत करणारे अधिकारी नगण्य असतात ..पण निश्चित ते जनमानसात आपल्या कामाचा ठसा उमटवून जातात .
असाच कर्तव्यदक्ष अधिकारी जुन्नर तालुक्यात लाभलाय अशी संपुर्णपरिसरात चर्चा आहे पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणा-या प्रत्येक गावात याअधिकाऱ्यांच्या कामाविषयी स्तुत्य चर्चा आहे.एव्हाना पोलिस म्हणजे
टीकेचा धनी ,निंदेचा वाटेकरी अशी काहीशी चर्चा असते मात्र जेव्हापासून जुन्नरतालुक्याला सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून टी.वाय.मुजावर यांनी पदभारघेतला पोलिस या शब्दाविषयी संज्ञाच बदलून गेलीय गुन्हेगारीला चाप आणि
चांगल्या कामाला शाबासकिची थाप मारनारा अधिकारी या भागाला मिळाला.ओतुर नारायणगाव येथे सहाय्यक पोलिस निरिक्षक पदावर काम करुन आता जुन्नर तालुक्यात पोलिस निरिक्षक पदावर आळेफाटा येथे नियुक्त झालेले टी.वाय मुजावर म्हणजे जनतेचे सिंघम आता रिटर्न झालेत.अगदीहोळीपासून ते गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव सारख्या तसेच रमजान ईद बकरी ईदअशा सर्व धर्माच्या उत्सवात अतिउत्साहाने जनतेला शुभेच्छा देऊन त्यांच्यासुख दुःखात सहभागी होणारा अधिकारी अतिऊत्साही कार्यपद्धती बाळगून याअधिकाऱ्यांने अनेक गुन्हे आपल्या अनुभवाने आणि आपल्या सहकार्याच्या
मदतीने ऊघडकीस आणलेत.छोट्या छोट्या गोष्टी देखील गांभीर्य ओळखून मनावरघेऊन त्यातून एखादी गंभीर घटना टाळण्यासाठी नियोजनबद्ध बंदोबस्त केले तरगुन्हेगारीला चांगलीच चपराक बसते.शेतकऱ्यांचा कांदा चोरीस गेला आणि
साहेबांनी आपल्या स्टाफसह तो तात्काळ शोधून काढून त्या शेतकऱ्याला परतदिला अशा अधिकाऱ्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे असेच म्हणावे लागेलअशा अनेक घटनांचे तपास लावून त्यांनी आपली ईमेज राखली आहे या कामांमुळे
पोलिस ठाण्याचे नाव उंचावले तर डी.जे.बंदी सारख्या विषयाला त्यांनीहसतमुखाने जनतेला विशेष करुन युवकांना डी.जे.च्या तोटे आणि फायद्यांविषयीसमजावून संपुर्ण परिसर डी.जे.मुक्त केला आणि सर्वोच्च न्यायालयानेदिलेल्या आदेशाचे पालन परिसरातील जनतेकडून झाले.ग्रामस्वच्छता सारख्याविषयात मुजावर यांनी आपल्या पोलिस फौजफाट्याला घेऊन स्वच्छता मोहीमराबवीली.पोलिस कर्मचारी आणि जनतेची अडचण लक्षात घेता सर्वांच्यासहकार्याने ओतुर पोलिस ठाण्याच्या नुतन ईमारत आणि स्थलांतर करण्यासाठीत्यांनी आतोनात प्रयत्न केले.आता हे पोलिस स्टेशन नविन जागेत नव्या जोमात
कार्यरत आहे याचे सर्वस्वी श्रेय फक्त टी.वाय.मुजावर यांनाच जाते.तसेच मढयेथील आउट पोस्टचे बांधकाम करून याही ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्यानेपोलीस ठाण्याची ईमारत उभी केली मुजावर यांनी नारायणगाव पोलीस ठाण्याचेसहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना येथेही त्यांनी वाहतूकव्यवस्था ठेवण्यासाठी वाहतूक कर्मचाऱ्यांना एक खोली चौकी म्हणून बांधली त्यांनी नारायणगाव पोलीस ठाण्याची ईमारत सुधरवण्याचे काम हातीघेतले आणि ते पुर्ण केले त्यांच्या मते ग्रामीण पोलीस कर्मचारी यांची व्यथा आणि पोलीसठाण्यांची अवस्था अतिशय मरगळलेली आहे मात्र एवढ्या सगळ्या दगदगीतून देखीलग्रामीण पोलीस कर्मचारी आपली कर्तव्ये अगदीच सचोटीने पार पाडतअसतात
म्हणूनच त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रसन्नतेचे वातावरण असावे अशी ईमारतअसणे आवश्यक असल्याने प्रथम हे कार्य हाती घेतले आणि जुन्नर तालुक्यातीलओतूर,मढ,आणि आता नारायणगाव या ठिकाणी पोलीस ठाणी सुधारण्याचे कार्य करीत
आहे असे ते सांगतात. आता सर्वांना आदर देनारा आणि वेळप्रसंगी आपला खाक्यादाखवनारा शिस्तप्रिय व रुबाबदार अधिकारी टी.वाय.मुजावर म्हणजे ग्रामीणपोलीस ठाणी सुधारण्याचा वसा घेणारे ‘सिंघमच’ आहेत.पोलिसांची राहण्याची
व्यवस्था आणि पोलीस ठाणी सुधारली तर ही यंत्रणा सुधारू शकेल असे त्यांचेमत आहे.