विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर तळये गावातील घटनास्थळी दाखल
स्थानिक ग्रामस्थ व तरुणांकडून मदत कार्य सुरु
महाड, दि. २३ जुलै-संकट काळातही शासन बेपर्वाईकरत असल्याचा आरोप करत उशिरा मदत कार्य सुरु केल्याचा ठपका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर ठेवला आहे. ते आज तळ्ये गावी पोहोचले त्यानंतर माध्यम प्रतिनिधींना आपली प्रतिक्रिया त्यांनी कळविली आहे. ते म्हणाले,’तळये गावात दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. अतिशय हृदय हेलावणारी अशी घटना या गावात घडली आहे. मी आता त्या गावातच आहे. आमच्या सोबत माजी मंत्री गिरिष महाजन, आमदार निरंजन डावखरे सुध्दा उपस्थित आहेत.
काल सायंकाळी ४ वाजता ही घटना घडली आहे, ४ वाजल्यापासून आज दुपारपर्यंत प्रशासनाचा एकही अधिकारी किंबहुना गावाचा तलाठी सुद्धा पोहोचला नाही. आज सांगतात संपर्क साधू शकत नाही नेटवर्क प्रॉब्लेम आहे परंतु दळणवळणेला चालना देत महाड येथून बोटीने येण्याची आवश्यकता होती. एनडीआरएफ ची टीम उशिरा पोहोचली. ठाणे येथून तरुण मुलं मदतीला आली, दिलासा देण्याचं काम त्या तरुणांनी केल, ग्रामस्थांना स्थलांतर करत त्यानं तेथून बाहेर काढले त्यामुळे त्यांनी दिलासा दिला असून प्रशासकीय अधिकार न आल्यामुळे ही शरम वाटणारी गोष्ट आहे. अनेक दिवसापासून हवामान अधिकाऱ्यांनी रेड अलर्ट दिला असून आम्ही सुद्धा सांगितलं होते की, कोकणात सुविधा बळकट करा, त्यांना अगोदरच स्थलांतरित करण्यात आले नाही त्यामुळे हे जीव गेले. अगोदरच जर टीम आली असती तर आज हे निष्पाप जीव वाचले असते परंतु एवढी बेपर्वाई प्रशासनाची लोकांचे जीव घेण्यापर्यंत कधीच पाहिलं नाही. सरकार ५ लाख देतील १० लाख देतील परंतु गेलेलं जीव परत येणार नाही. प्रशासनाचा प्रतिनिधी आतापर्यंत पोहोचले नव्हते . आता टीम आणि प्रशासकीय कर्मचारी पोहोचले. त्यामुळे नंतर मदत करण्यापेक्षा पंचनामे करून घ्या, मदत पुरवा. आणि खाण्याचे आणी पिण्याची व्यवस्था करा. असे आवाहन प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला केले आहे.
आपत्ति काळात असं निद्रिस्त सरकार महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
- तळीये येथे दुर्घटना घडल्यानंतर वीस ते बावीस तास प्रशासनाचा कोणताही अधिकारी दुर्घटनास्थळी न पोहोचणं दुर्दैवी. – विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली खंत.
- तळीये दुर्घटना प्रसंगी केलं वक्तव्य.
- तळीये दुर्घटना होऊन वीस ते बावी स तास प्रशासन पोहचू शकला नाही. -विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
- एवढं असंवेदनशील सरकार व बेफिकीर प्रशासन आतापर्यंत महाराष्ट्राने कधीचं पाहिलं नाही.
- मी दुर्घटनास्थळी पोहोचलो तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांपासून साध्या तलाठ्यांपर्यंत एकही अधिकारी पोहोचला नव्हता.
- यंत्रणा वेळीच पोहोचली असती तर काहींचे जीव वाचले असते.
- या बेपर्वाई बद्दल विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली खंत.