पुणे:दिवाळीनिमित्त काल राज्याभरातील नागरिकांनी गावी जाण्यासाठी एसटी स्टॅंडसह रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी केली होती. याच गर्दीमुळे पुण्यातील रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीत गाडीमध्ये चढणाऱ्या साजन बलदेवन या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची बातमी काल समोर आली होती.याप्रकरणी एवढी गर्दी झालीच कशी ? किती तिकिटे विकली याचे रेल्वे प्रशासनाला भान नव्हते काय ? किती लोक येतील याची जाणीव झाली नाही काय ? जबाबदार आणि बेफिकीर राहिलेल्या सर्व रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि येथून पुढे याबाबत दक्षता घेतली पाहिजे अशी जोरदार मागणी कॉंग्रेसचे नेत्या संगीता तिवारी यांनी विभागीय व्यवस्थापिका रेणू शर्मा यांच्याकडे केली आहे तर साजन बलदेवन याचा मृत्यू चेंगराचेंगरीत मृत्यु झाला नसून, दम्याच्या आजारामुळे सदर प्रवाशाचा मृत्यू झाला असल्याचा दावा पुणे रेल्वे विभागाने केला आहे.यामुळे याप्रकार्नाला कलाटणी दिली जाते कि काय अशी शंका निर्माण होते आहे.
साजन बलदेवन हा काल पुणे दानापूर एक्सप्रेसने प्लॅटफॉर्म नंबर एक वरून बिहारला जाणार होता.
बिहारला जात असताना त्याची प्रकृती रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच अतिशय खालावली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचा दावा पुणे रेल्वे विभागाने केला आहे. साजन बलदेवन सोबत असलेल्या त्याच्या इतर सहकारी मित्रांनी देखील त्याला दम्याचा आजार असल्यास पोलीस पुणे रेल्वे पोलीस विभागाला कळवल आहे.
दीपावलीनिमित्त गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आज मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या आसपास एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर पुण्याहून दानापूरच्या दिशेने जाणारी गाडी आली.गाडी येताच स्थानकावरील प्रवाशांनी गाडीत चढण्यासाठी एकच गर्दी केली. त्यातच एक प्रवाशी खाली पडला. परंतु, खाली पडलेल्या प्रवाशाला उचलण्याऐवजी लोक त्याला चेंगरून रेल्वेत चढले. यात त्या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला अशी बातमी काल प्रसारित झाली होती
हा प्रवाशी मूळचा बिहार येथील पाटणा जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचे सांगण्यात आले.. तो शनिवारी पुणे-दानापूर एक्सप्रेसने घरी जण्यासाठी निघाला होता. पुणे स्थानकावर सध्या दिवाळीच्या हंगामुळे मोठी गर्दी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या दिवाळीचा हंगाम असल्याने पुणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी आहे. अनेक नागरिक आपल्या घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी करत आहेत. पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी रात्री ९ च्या सुमारास प्रवाशांनी गर्दी केली. या गर्दीत गाडीत चढण्याचा प्रयत्न करत असताना हा खाली पडला. दरम्यान, अनेक प्रवाशी हे त्यांच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.