Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आव्हाडांच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास जबाबदारी सरकारची, मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Date:

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून जाब विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा का कमी केली ? असा प्रश्न मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. हे पत्र त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही शेअर करत मुख्यमंत्र्यांना जबावदो या हॅशटॅगने मेंशन केले आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाला धोका असून त्यांच्या घराची रेकीही करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांचाही तसा अहवाल आहे. त्यामुळे मी आव्हाड यांच्या घराची सुरक्षा वाढविण्याची मागणी आपणाकडे केली होती. मात्र, आव्हाड यांच्या घराची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. आमदार आव्हाड हे हीटलिस्टवर आहेत, असे एटीएसने सांगितले आहे. पण, सरकारने त्यांची सुरक्षा कमी केल्याने संशय निर्माण होत आहे. सरकारचा हा गलथानपणा आहे की, सनातनी प्रवृत्तींना मदत करणे हा उद्देश आहे, याबाबत मनात संशय येतो, असेही मुंडे यांनी म्हटले आहे. यापूर्वी सांगली व पुणे येथे आव्हाड यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले आहेत. तर एटीएसनेही ते हीटलिस्टवर असल्याचे सांगितले आहे. मात्र, सरकार याबाबत निष्काळजी असल्याचे दिसते. तसेच एक विधानसभा सदस्य या नात्याने त्यांची साधी चौकशीही करण्यात आली नाही. त्यामुळे सरकारच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत आव्हान यांच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास, त्याची जबाबदारी सरकारकडे राहिल, असेही मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील गारठ्यात आणखी वाढ होणार; हवामान विभागाचा यलो अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील गारठ्यात...

बिबट्या अखेर पुणे विमानतळावर पकडला….

पुणे-पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात गेल्या आठ महिन्यांपासून वावर असलेला...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन:वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लातूर-देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज...