पुणे – धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधीची कागदपत्रे हरवल्याचे उत्तर सरकारच्यावतीने मंगळवारी उच्च न्यायालयात देण्यात आले. त्यावर ही सामान्य जनतेची फसवणूक असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, कागदपत्रे हरवल्याचे उत्तर न्यायालयात सरकारच्यावतीने देण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धनगर समाजाची फसवणूक करण्याचे काम या फसव्या सरकारने केले आहे. राफेलचे कागदपत्रे हरवल्याचे केंद्र सरकारने तर आता धनगर समाजाच्या आरक्षणाची कागदपत्रे हरवल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. म्हणजे त्यांना ज्या वेळी निर्णय घ्यायचा नसतो, त्यावेळी कागदपत्रे चोरीला जातात, किंवा गायब होतात, हे दुर्दैव असल्याचे त्या म्हणाल्या.
आज सामान्य माणसांची फसवणूक होत आहे त्याचा निषेध करत असल्याचे सांगत सरकार कष्टकरी आणि सामान्य माणसांची कशा पद्धतीने फसवणूक करतात ते दिसून येत आहे, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या