पुणे –
बुधवारी रात्री झालेल्या अतीवृष्टीमुळे पुणे शहरातील महावितरणच्या पद्मावती, पर्वती, रास्तापेठ व शिवाजी
विभागासह पुणे ग्रामीण परिसरातील मुळशी विभागातील जवळपास १२५ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला
होता. महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले व गुरुवार संध्याकाळी ५
वाजेपर्यंत जवळपास सर्व ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला . या पावसामुळे वीज यंत्रणेचे प्रचंड नुकसान
झाले असून यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार पद्मावती विभागातील १४ पैकी ११ वीज उपकेंद्राचा वीज पुरवठा सुरक्षतेच्या कारणासाठी रात्री बंद
ठेवावे लागले. महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले व गुरुवार संध्याकाळ ५
वाजेपर्यंत जवळपास सर्व ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. भिलारवाडी ओढ्याजवळील ३ रोहित्रे
पाण्यामुळे जमीनदोस्त झाली तर काही ठिकाणी विजेचे खांब कोलमडून पडले.
रास्तापेठ विभागातील जवळपास १५००० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. कोंढवा खुर्द, कोंढवा बुज्रूक,
लुलानगर, एनआयबिएम व घोरपडी बाजारातील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. कोंढवा खुर्द व कोंढवा
बुज्रूक चा परिसर वगळता बहुतेक भागाचा वीज पुरवठा दुपारपर्यंत सुरळीत करण्यात आला होता.
पर्वती विभागातील धायरी, सहकार नगर व सिंहगड रोड येथील भागात उच्चदाब वाहीनीचे ७ खांब पडले व काही
ठिकाणी फिडर पिलर पाण्याखाली गेल्यामुळे जवळपास २५०० ग्राहकांचा वीज पुरवठा रात्री १२ ते सकाळी ७
वाजेपर्यत खंडित झाला होता.
पुणे ग्रामीण परिसरातील खेड, नरसापूर व शिवापूर येथिल नदीकाठी असलेले रोहित्रे पाण्यात गेल्याने बंद ठेवावे लागले
तर या भागातील ५ रोहित्रे पाण्यात वाहून गेलेली आहेत. या परिसरातील जवळपास २५०० ग्राहकांचा वीज पुरवठा
खंडित झाला होता.
त्याचप्रमाणे पुणे शहरातील शिवाजीनगर विभागातील बालेवाडी, म्हाळुंगे, सुसगाव, बाणेर व बोपोडी गावठाण, इ.
परिसरातील जवळपास ३००० ग्राहकांचा वीज पुरवठा रात्री खंडित झाला होता.