मुंबई- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2021 चा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 3 लाख 5 हजार 611 कोटी रुपये दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अर्थसंकल्पाच्या समर्थनार्थ घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. अर्थसंकल्पाबाबत काही जणांनी गैरसमज पसरवले असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. पाच वर्षात जे पैसे मिळायला हवे होते, त्याच्या अनेक पट महाराष्ट्राला वर्षाला मिळाले. हा मोदी सरकार आणि दुसऱ्या सरकारमधील फरक आहे. असेही फडणवीस म्हणाले.
भारतरत्न मिळालेल्या व्यक्तींनाही अभिव्यक्ती स्वातंत्र मिळत नाही. या सेलिब्रिटिंनी देशाच्या हितासाठी ट्विट केले होते. त्यांच्या ट्विटच्या चौकशीची मागणी करणाऱ्यांचे मानसित संतुलन तपासले पाहिजे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले?
घरोघरी पाणी मिळावे यासाठी 1 हजार 133 कोटी रुपये दिले.
मुंबई मेट्रो तीन म्हणजे आरे कारशेडवाली यालाही1832 कोटी रूपये
नागपूर मेट्रोसाठी 5976 कोटी रुपये
नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटी मंजूर झाले
शेतकरी सन्मान योजनेसाठी 6 हजार 823 कोटी रुपयांचा निधी
हवामान आधारित शेती प्रकल्पांसाठी
खांडवा-अकोला मार्गाला परवानगी
सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे प्रकल्पासाठी मोठी आर्थिक तरतूद
राज्याच्या रेल्वेच्या 16 नवीन लाइन्स मिळाल्या.