पुणे- येथील भारतीय जनता पार्टीचे सर्वेसर्वो असलेले, जुनेजाणते नेते,खासदार गिरीश बापट यांचे दीर्घकालीन आजाराने निधन झाल्यानंतर पुणे पोरके झाल्याची भावना व्यक्त करणारे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडेच पुण्यातील भाजपचे नेतृत्व देण्याची तयारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमधून सुरु असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.यामुळे कोथरूड मतदार संघ आता पुन्हा मेधा कुलकर्णींना मिळण्याची जास्त शक्यता वर्तविली जाते आहे.पुणे लोकसभेच्या पोट निवडणुकीबाबत भावनिक वक्तव्ये होत असली तरी वास्तवता नाकारता येत नाही.तातडीने पुण्याच्या नेतृत्वाबाबत अथवा पोटनिवडणुकीबाबत वक्तव्ये करणे भावनिकदृष्ट्या योग्य नसून शक्यतो पोटनिवडणूक होऊ नयेच आणि थेट लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीच येथील निवडणूक व्हावी अशी भावना वरिष्ठ नेत्यांची आहे,६/६ महिन्यांसाठी निवडणुकीचा खेळ करण्याची तयारी कोणाची नाही.परंतू अद्याप दिल्लीश्वरांचेच निवडणुकांसंदर्भात असलेले धोरण आणि विचार समजले नसल्याने अनेकजण केवळ तर्क वितर्क लढविताना दिसत आहेत.
जर स्वरदा बापटांनाच लोकसभेची उमेदवारी दिली तरच भाजपा पुण्याची जागा राखू शकेल असाही विचारप्रवाह पक्षात आहेच.पण येत्या काळत महापालिका विधानसभा आणि लोकसभा अशा सर्वच निवडणुकांचा सामना करायचा असल्याने याबाबत अंतिम धोरण दिल्लीतच होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.