फडणवीसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: हर्षवर्धन सपकाळ.

Date:

७ हजार कोटी रुपयांच्या मिसिंग लिंकची दुर्दशा भ्रष्टाचारामुळे, देवेंद्र फडणवीस ‘इन्फ्रा मॅन’ नाही तर ‘डिझास्टर मॅन’.. मुंबईतील १२ लोकांचा मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे नाही तर फडणवीसांच्या सुलतानी आपत्तीमुळे– हर्षवर्धन सपकाळ.

मुंबई, दि. ६ जुलै २०२६.

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा धुमाकुळ सुरु असून जिवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाळ्यात खबरदारी घेण्याची आवश्यकता असताना भाजपा महायुती सरकार व प्रशासनाची काहीच तयारी दिसत नाही. मुंबई परिसरात मागील दोन तीन दिवसातील घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे, हे मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे नाही तर फडणवीसांच्या सुलतानी आपत्तीमुळे झाले आहेत. या १२ मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे,अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, मिसिंग लिंक प्रकल्पावर ७१८१ कोटी रुपये खर्च केले पण अवघ्या दोन महिन्याच्या आत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. या प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत १३ गंभीर आक्षेप पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात तज्ञांनी नोंदवले होते, त्यात लोणावळा धरणाजवळील संरेखन, बोगद्यांची सुरक्षितता, भूगर्भीय स्थिरता आणि इतर तांत्रिक मुद्द्यांचा समावेश होता. या आक्षेपांवर काम न करता घाईघाईत काम उरकून, उद्घाटनांचे इव्हेंट करून श्रेयवाद आणि भ्रष्टाचार करून केलेल्या कामाची परिणती पिलर कोसळून वाहतूक बंद ठेवण्यात झाली. टक्केवारीचा मलिदा खाण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या उपस्थित केलेल्या गंभीर मुद्यांकडे दुर्लक्ष करून जनतेचा पैसा आणि जीव धोक्यात घालण्याची फडणवीस सरकारची वृत्ती दररोज समोर येत आहे.

मिसिंग लिंक टेस्टिंग परियड..
मिसिंग लिंकवर खड्डे पडल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो टेस्टिंग पिरियड आहे, असे म्हटले होते. त्यावर बोलताना सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्र्याचे हे विधान निर्लज्जपणाचे आहे. २०१४ पासून भाजपाचे सरकार आहे तेव्हापासून टेस्टिंगच सुरु आहे का, असा प्रश्न उपस्थित करून राम मंदिरातील चोरी लपवली जात आहे तसेच भ्रष्टाचार लपवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. मिसिंग लिंकचा फियास्को भ्रष्टारामुळे झाला आहे. जेवढे जास्त इंजिन लावतील तेवढा भ्रष्टाचार वाढणार आहे. स्वतःच्या फायद्यासाठी भाजपा महायुती सरकारने मुंबईचीही वाट लावली आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
पंतप्रधांच्या विदेश दौऱ्यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरेंडर झालेले आहेत, त्यामुळे तोंड लपवण्यासाठी ते विदेश वाऱ्या करत असतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीतरी भारतातही थांबावे, अशी कोपरखळी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावली..

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

मुंबई- भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी...

क्रांती दिनी होणार वंदेमातरमचा जागर

नागरिक सोशल फाउंडेशन...

अवघ्या ११ तासांत खडकवासला धरणसाखळीत १.३९ टीएमसी वाढ

सकाळी ६.९३ टीएमसी असलेला पाणीसाठा सायंकाळी ८.३२ टीएमसीवर; धरणसाखळी...