आदित्य बिर्ला कॅपिटलकडून व्यवसायाच्या वाढीसाठी उभारले ४,००० कोटी रुपयांचे इक्विटी भांडवल

Date:

आदित्य बिर्ला ग्रुपकडून ३,०८० कोटी रुपये आणि इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनकडून ९२० कोटी रुपये

मुंबई: आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या (“एबीसीएल”) संचालक मंडळाने भांडवलाचा पाया मजबूत करण्याच्या आणि विकासाच्या पुढील टप्प्यातील गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने ग्रासिमि इंडस्ट्रीज लिमिटेडला (प्रवर्तक) २,८८० कोटी रुपये, सूर्याजा इन्व्हेस्टमेंट पीटीई लिमिटेड, सिंगापूरला (आदित्य बिर्ला समूहाची संस्था) २०० कोटी रुपये आणि इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनला (आयएफसी) ९२० कोटी रुपयांच्या प्राधान्य शेअर्स वाटपास मंजूरी दिली आहे. सेबीच्या आयसीडीआर  नियमांनुसार, हे प्राधान्य शेअर्स वाटप प्रति इक्विटी शेअर ३५६.०२ रुपये किमतीवर केले जाईल, जे भागधारक आणि इतर आवश्यक मंजूरी तसेच नेहमीच्या अटींच्या अधीन असेल.

या प्राधान्य शेअर्स वाटपातून मिळणारा निधी विकासाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वापरला जाईल, ज्यामध्ये भांडवली पाया वाढवणे, कर्ज देण्याच्या व्यवसायासाठी आवश्यक निधीची पूर्तता करणे आणि कंपनीच्या उपकंपन्या/ संयुक्त उपक्रम/ सहयोगी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे यांसारख्या इतर सामान्य कॉर्पोरेट हेतूंचा समावेश आहे.

या गुंतवणुकीबाबत मत व्‍यक्त करत आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष श्री. कुमार मंगलम बिर्ला म्हणाले, “आर्थिक सेवा भारताच्या आर्थिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आल्या असून त्या भांडवल निर्मितीला गती देत आहेत, वित्तीय समावेशन वाढवत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेच्या औपचारिकीकरणाला पाठबळ देत आहेत. जसे हे क्षेत्र विकसित होत आहे, तसे विविधीकृत प्लॅटफॉर्म, मजबूत सुशासन (governance) आणि तंत्रज्ञान-आधारित अंमलबजावणी असलेल्या संस्था विकासाच्या मार्गाला वेगाने आकार देत आहेत. गेल्या काही वर्षांत, एबीसीएलने आर्थिक सेवा क्षेत्रात आपली व्याप्ती वाढवली असून भक्कम डिजिटल क्षमता आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीच्या जोरावर उच्च दर्जाच्या व्यवसायांचा पोर्टफोलिओ तयार केला आहे. विविध विभागांमधील तिची व्याप्ती आणि संस्थात्मक क्षमता निर्माण करण्याचा दीर्घकालीन दृष्टिकोन, भारताचे वित्तीय क्षेत्र विस्तार आणि अत्याधुनिकतेच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत असताना या समूहाला अधिक मजबूत स्थितीत आणतो.”

आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या एमडी आणि सीईओ कु. विशाखा मुळ्ये म्हणाल्या, “आमच्या प्रवर्तकांच्या निरंतर विश्वासाबद्दल आणि आयएफसीने आमच्यावर दाखवलेल्या भरवशाबद्दल आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत. सर्व आवश्यक घटक उपलब्ध असल्याने, या भांडवल उभारणीमुळे (capital infusion) आम्हाला भारतातील विकासाच्या संधींमध्ये सहभागी होणे, ग्राहकांशी संपर्क अधिक दृढ करणे आणि डिजिटल-फर्स्ट सोल्यूशन्स प्रदान करणे शक्य होईल. आमच्या एकूण कर्ज पोर्टफोलिओपैकी सुमारे ५७ टक्‍के हिस्सा एसएमईच्या व्यावसायिक कर्जांचा आहे, जो या क्षेत्राप्रती असलेली आमची मजबूत वचनबद्धता दर्शवतो. जबाबदार व्यावसायिक पद्धतींवर आधारित सर्वसमावेशक वित्तीय परिसंस्था तयार करण्यावर आमचा भर आहे. शाश्वत आणि दीर्घकालीन विकासाला गती देण्यासाठी आम्ही व्यक्ती आणि व्यवसायांना अखंड कर्ज उपलब्धता, डिजिटल क्षमता आणि सखोल परिसंस्था सोल्यूशन्सद्वारे सक्षम करत आहोत.”

आयएफसीचे आशिया आणि पॅसिफिक क्षेत्राचे प्रादेशिक उपाध्यक्ष श्री. सर्वेश सुरी म्हणाले, “लहान व्यवसाय हे मोठ्या संकल्पनांवर आधारलेले असतात आणि आदित्य बिर्ला कॅपिटलसोबतच्या या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही त्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यास मदत करत आहोत. रोजगाराची निर्मिती करणे आणि आर्थिक संधींचा विस्तार करणे हे जागतिक बँक समूहाच्या ध्येयाच्या केंद्रस्थानी आहे. उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये एमएसएमई हे वित्तपुरवठ्यासाठीच्या सर्वात मोठ्या न वापरलेल्या (untapped) संधींचे प्रतिनिधीत्व करतात. एबीसीएलची व्याप्ती, १,५०,००० पेक्षा जास्त मजबूत एमएसएमई ग्राहक वर्ग आणि डिजिटल क्षमतांचा वापर करून, रोजगार वाढवणाऱ्या क्षेत्रांमधील उद्योजक आणि व्यवसायांसाठी जबाबदार वित्तपुरवठ्याची पोहोच वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे त्यांना गुंतवणूक करणे, उत्पन्न वाढवणे, अधिक व चांगल्या रोजगारांची निर्मिती करणे आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे शक्य होईल. ही गुंतवणूक वित्तीय समावेशन पुढे नेण्याच्या आमच्या वचनबद्धतेची निदर्शक आहे आणि ती ‘विकसित भारत’ संकल्पनेशी सुसंगत आहे, जो भारताच्या विकासाची गाथा घडवणाऱ्या व्यक्ती आणि उद्योगांना सक्षम करतो.”

आदित्य बिर्ला कॅपिटल ही एक विविधीकृत वित्तीय सेवा कंपनी आहे, जी ग्राहकांच्या जीवनाच्या विविध टप्प्यांवरील बदलत्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज, गुंतवणूक, विमा आणि पेमेंट्स या क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक सोल्यूशन्स प्रदान करते. व्याप्तीमधील मजबूत विस्तार, विविधीकरण आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीच्या जोरावर या कंपनीने स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणले असून ती आदित्य बिर्ला समूहासाठी एक प्रमुख ग्रोथ इंजिन म्हणून उदयास आली आहे. आर्थिक वर्ष २०२३ ते आर्थिक वर्ष २०२६ दरम्यान, कंपनीने आपल्या पोर्टफोलिओची मजबूत गुणवत्ता राखत सर्व व्यवसायांमध्ये सातत्यपूर्ण आणि व्यापक वाढ नोंदवली आहे.

एनबीएफसी आणि हाउसिंग फायनान्सचा एकूण कर्ज पोर्टफोलिओ ३०% च्या चक्रवाढ वार्षिक वृद्धी दराने (सीएजीआर) वाढून २ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे, तर अॅसेट मॅनेजमेंट आणि विमा व्यवसायांचे एकत्रित एयूएम १८ टक्‍क्‍यांच्या सीएजीआरने वाढून अंदाजे ५.९ लाख कोटी रुपये झाले आहे. विमा व्यवसायातील एकूण ग्रॉस प्रीमियम २१% च्या सीएजीआरने वाढून ३१,६३४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांत, कंपनीचा एकत्रित करोत्तर नफा म्हणजेच पीएटी (अपवादात्मक आणि एकरकमी बाबी वगळून) २३ टक्‍क्‍यांच्या सीएजीआरने वाढून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ३,७९७ कोटी रुपये झाला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अंतर्नाद’च्या प्रयोगाने रंगभूमीवर उभा केला भक्तिरसाचा जिवंत वारीसोहळा

पुणे  : भाऊसाहेब भोईर यांच्या ‘मोरया थिएटर्स’ निर्मित ‘अंतर्नाद...

बाणेर-बालेवाडीतील वाढत्या वीज समस्यांवर चंद्रकांतदादा पाटील आक्रमक

नागरिकांना गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे-...

मतदार यादीत घोळ करणा-यांना आगामी काळात जेलमध्ये जावे लागेल: हर्षवर्धन सपकाळ

SIR मोहिमेसंदर्भात काँग्रेसचे प्रमुख नेते, खासदार आमदार व BLA1...

महाराष्ट्र हा केवळ भूप्रदेश नाही तर भारतीयांच्या स्वाभिमानाचा विषय: छत्रपती वृषाली राजे भोसले

एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या नकाशाचा पुन्हा समावेश व्हावा या...