बापटांविषयी जीव तळमळला,वापरा नंतर सोडून द्या ही भाजपची नीती,पिंपरी – चिंचवड मनपातील घोटाळ्याची चौकशी करा,
पुणे -टिळकांच्या घराण्याला वापरून सोडले, गिरीश बापटांना ऑक्सिजन नळ्या नाकात लावून प्रचारात उतरवले हा क्रुरतेचा कळस असे वक्तव्य करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज आयोजित प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन आज सायंकाळी भाषण केले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी घणाघात केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री होते. त्या काळात मी या सर्वांचा उल्लेख मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनो असा उल्लेख करायचो. त्यानंतर जे काही घडतेय आणि घडले ते मी पाहत आहे. शिवसेनेची लढाई सुरू आहे. त्यात काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कठिण काळात सहकार्य करीत आहेत. राजकारणात निवडणुका जिंकणे व त्याची इर्षा बाळगावी लागते.उद्धव ठाकरे म्हणाले, पोटनिवडणूक बिनविरोध करताना लोकशाहीतील मोकळेपणा शिल्लक राहीला नाही. दोन निवडणुका आल्या. ज्यांना वाटते की, निवडणूक बिनविरोध व्हायला हवे होते. लोकमान्यांच्या घराण्यातील व्यक्तीला दुर्लक्ष करून दुसऱ्यांना उमेदवारी दिली गेली. तिथे सहानुभुती कुठे गेली. टिळकांच्या घराण्याचा वापरून सोडून दिले.उद्धव ठाकरे म्हणाले, उमेदवारी दुसऱ्याला दिल्यानंतर वाईट वाटले व जीव तळमळला. भाजपमध्ये असले तरीही गिरीश बापटांविषयी जीव तळमळला. वयोमान थकवून टाकणारे असते पण काहीवेळा आजारपणा असतो. टिळकांच्या घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी नाकारली. क्रुरतेचा कळस म्हणजे गिरीश बापट आजारी असताना त्यांना ऑक्सिजनच्या नळ्या नाकात घालून त्यांना प्रचारात उतरवले.
उद्धव ठाकरे म्हणाले, अशा पद्धतीने लोक वापरायची आणि नंतर सोडून द्यायचे असे ते करतात. शिवसैनिक काॅंग्रेस, राष्ट्रवादीला मतदान का करणार नाही. करणार, कारण शिवसैनिकांची मते भाजपलाही मिळाली होती. शिवसेनेला मुळासकट उखडायला निघाले अशा भाजपला मदत होता कामा नये. ती केली गेली तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. महाविकास आघाडी आपली आहे.उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्यात भाजपने फूट पाडली. शिवसेना मुळासकट संपवायला निघाले. चिन्हही त्यांनी चोरले. शिवसेना मुळासकट संपवायला निघाले हे राजकारण आणि लोकशाही मी मानायला तयार नाही. जगताप वहिनींना मी सांगतो की, तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाबद्दल आदर आणि प्रेम शिवसैनिकांच्या मनात राहील पण सहानुभूती भाजपला दाखवण्याची परिस्थिती राहीली नाही. तुमचा वापर करून भाजप पकड घट्ट करीत असेल तर नाईलाजास्तव आम्हाला ही निवडणूक जिंकावली लागेल.उद्धव ठाकरे म्हणाले, हिमंत असेल तर पाच वर्षांतील पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या घोटाळ्याची चौकशी लावा. सर्वांचीच चौकशी होऊ द्या. प्रत्येकवेळी गृहीत धरून राजकारण त्यांनी केले. लक्ष्मणराव जगतापांचे आणि माझे नाते वेगळे पण राजकारण वेगळे. टीळक घराण्यांचा वापर करून त्यांना वाऱ्यावर सोडले. डबल इंजिन फक्त धूर सोडत आहे.उद्धव ठाकरे म्हणाले, गिरीश बापट यांना आजारी असताना प्रचारात उतरवणे हा अमानुषपणा. आमच्या एका पदाधिकाऱ्यावर हल्ला केला. गृहीत धरून राजकारण करणाऱ्यांना गाडा. ती आता वेळ आली. विरोधक असावेत, त्यांनी मत मांडावे पण माझ्यासोबत आले नाही तर संपवून टाकू. चौकशी लावू ही हुकुमशाही चालणार नाही. आमच्यातील शिवसेनेतील गद्दार भाजपकडे गेले पण नंतर त्यांच्यावरील आरोपांबाबत चौकशी बंद झाली.उद्धव ठाकरे म्हणाले, स्पर्धा नको म्हणून त्यांनी पक्षातील लोकांची गच्छंती केली तर विरोधकांतील लोकांना हेरले. त्यांच्यासोबत गेले तर धुतले तांदूळ आमच्यासोबत राहीले तर तांदळाचे खडे. त्यांच्या चौकशा लावा. धनुष्यबाण मिंध्यांना दिला हे निवडणूक आयोगाचे अतीच झाले. मिध्यांना माझे पुन्हा आव्हान देतो. काळाची पाऊले ओळखून ती वेळीच रोखा.