कविता हा अंतरात्म्याचा हुंकार, जाणिवांचा उद्गार – अंजली कुलकर्णी

Date:

जयश्री श्रोत्रिय लिखित ‘मनाचं आभाळ’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

पुणे : कविता म्हणजे जीवनाच्या अनुभूतीतून आलेला जाणिवांचा उद्गार, अंतरात्म्याचा हुंकार असते. s कविता म्हणजे कवीने स्वत:चा घेतलेला शोध असतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह आणि सुप्रसिद्ध कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी केले.

कवयित्री जयश्री विजय श्रोत्रिय यांच्या ‘मनाचं आभाळ’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी कुलकर्णी बोलत होत्या. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे, कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर, विजय श्रोत्रिय, अनिरुद्ध श्रोत्रिय व्यासपीठावर होते. साहित्यदीप प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने टिळक रोडवरील गणेश हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संवेदना प्रकाशनने कविता संग्रह प्रकाशित केला आहे.

अंजली कुलकर्णी पुढे म्हणाल्या, कविता म्हणजे कवीच्या जगण्याचा, अनुभवांचा परीघ असतो. हा परीघ किती खोल असतो त्यानुसार कविता फुलतात. ढोबळपणे स्त्री कवयित्रींच्या बाबतीत तिचे जगणे, अनुभव कवितेत प्रतिबिंबित होते. स्त्री विविध पातळ्यांवर जगत असते, तेच तिच्या कवितेतून आपल्यासमोर येते. निसर्गातील विविध गोष्टी आणि आपल्या आजुबाजूला असलेल्या व्यक्तींचा कवीच्या मनावर परिणाम होतो. त्यातील जाणिवांचा परिणाम किंवा प्रतिबिंब म्हणजे कागदावर उमटणारी कविता असते. अबोध मनात काय दडले आहे हे शोधण्याचा आणि मांडण्याचा ध्यास कवींना असतो.

ज्योस्त्ना चांदगुडे यांनी कवितासंग्रहाचा प्रवास सांगतानाच कवयित्रीचे गुण आणि कविता संग्रहातील बारकावे सांगितले. पुस्तकाची प्रस्तावना आणि काव्य अभिवाचनाची संहिता लिहीताना आपल्याला त्यांच्या कविता जवळून अनुभवता आल्या असेही त्या म्हणाल्या. स्त्री जाणिवेच्या कविता श्रोत्रिय यांच्या संग्रहात अधिक असून कणखर स्त्रीचे घडणारे दर्शन त्यांनी ‘संघर्ष’ ही कविता सादर करत घडवून दिले.

जयश्री श्रोत्रिय म्हणाल्या, कवितेमुळेच वयाच्या ७५व्या वर्षी मी अतिशय आनंदात आहे. साहित्यदीप, कुटुंबीय आणि माझ्या सोबत्यांमुळे मी इथवर पोहोचू शकले.

आईचे शिक्षिका, निवृत्त विंग कमांडरची पत्नी यांपेक्षा कवयित्री हे रूप आपल्याला जास्त भावते असे अनिरुद्ध श्रोत्रिय म्हणाले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निरुपमा महाजन, चिन्मयी चिटणीस, माधव हुंडेकर, धनंजय तडवळकर आणि जयश्री श्रोत्रिय यांनी ‘मनाचं आभाळ’ या नव्या कवितासंग्रहातील कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. धनंजय तडवळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर कवयित्री आरती देवगावकर यांनी सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हिंदुजा कुटुंबाने 2026 मध्ये यूकेच्या श्रीमंतांच्या यादीत सलग पाचव्या वर्षी अव्वल स्थान कायम राखले

पुणे- हिंदुजा ग्रुप या 111 वर्षे जुन्या बहुराष्ट्रीय उद्योगसमूहाचे प्रतिनिधित्व करणारे संजय आणि धीरज हिंदुजा आणि कुटुंब यांनी 38 अब्ज पाऊंड संपत्तीसह सलग पाचव्या वर्षी संडे टाइम्स रिच लिस्टमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. संडे टाइम्स रिच लिस्ट ही युनायटेड किंगडममध्ये वास्तव्यास असलेल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि कुटुंबांची अधिकृत वार्षिक क्रमवारी यादी आहे.  यामध्ये 2026 च्या यादीत सुमारे 350 जणांची नावे आहेत. जागतिक आव्हाने आणि धोरणात्मक बदल होत असूनही हिंदुजा कुटुंबाने उल्लेखनीय व्यावसायिक स्थैर्य आणि जागतिक नेतृत्व सातत्याने प्रदर्शित केले आहे. शतकाहून अधिक काळ, हिंदुजा ग्रुपचा प्रवास स्वर्गीय श्री. परमानंद दीपचंद हिंदुजा यांच्या “माझा धर्म म्हणजे असे कार्य करणे की ज्यामुळे मला इतरांना देता येईल,” या तत्त्वाच्या आधाराने  मार्गक्रमण करत आहे. हे तत्त्व आजही आर्थिक प्रगती, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा विकास आणि विविध बाजारपेठांमधील समुदायांवर सकारात्मक परिणाम यामध्ये योगदान देत व्यवसाय वृद्धीसोबत समतोल राखत समूहाच्या उद्योगधंद्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला आकार देत आहे. हिंदुजा ग्रुप 38 देशांमध्ये कार्यरत असून दळणवळण, डिजिटल तंत्रज्ञान, बँकिंग आणि वित्तीय सेवा, प्रसारमाध्यमे, प्रकल्प विकास, ल्युब्रिकंट्स आणि स्पेशालिटी केमिकल्स, ऊर्जा, रिअल इस्टेट, ट्रेडिंग आणि आरोग्यसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये समूहाची गुंतवणूक आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात हिंदुजा ग्रुपने भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रावर आपले लक्ष अधिक केंद्रित केले असून वाहन चार्जिंग पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीसह शाश्वतता आणि भविष्याभिमुख नाविन्यपूर्णतेकडे धोरणात्मक वाटचाल दर्शवली आहे. व्यावसायिक साम्राज्याच्या पलीकडे हिंदुजा कुटुंब हिंदुजा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी देखील कटिबद्ध आहे. हे फाउंडेशन शिक्षण, आरोग्यसेवा, शाश्वत ग्रामीण विकास आणि जलसंधारण क्षेत्रातील परिवर्तनात्मक उपक्रमांवर लक्ष केंद्रित करते आणि विविध भौगोलिक क्षेत्रांतील समुदायांवर सकारात्मक प्रभाव टाकते. द संडे टाइम्स रिच लिस्ट 2026 मध्ये समाविष्ट असलेल्या इतर मान्यवर आणि प्रतिष्ठित नावांमध्ये 27.971 अब्ज पाऊंड संपत्तीसह डेव्हिड आणि सायमन रुबेन आणि कुटुंब, 26.852 अब्ज पाऊंड संपत्तीसह सर लिओनार्ड ब्लावातनिक, 24.481 अब्ज पाऊंड संपत्तीसह इदान ओफर, 18.939 अब्ज पाऊंड संपत्तीसह गाय, जॉर्ज, अलाना आणि गॅलेन वेस्टन आणि कुटुंब, 18.177 अब्ज पाऊंड संपत्तीसह ख्रिस्तोफर हार्बोन, 16.411 अब्ज पाऊंड संपत्तीसह निक स्टोरोन्स्की, 16.006 अब्ज पाऊंड संपत्तीसह अ‍ॅलेक्स गेर्को, 15.194 अब्ज पाऊंड संपत्तीसह सर जिम रॅटक्लिफ, तसेच 14.26 अब्ज पाऊंड संपत्तीसह इगोर आणि दिमित्री बुखमन यांचा समावेश आहे.

विधान परिषदेचा बिगुल वाजला! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांसाठी निवडणूक जाहीर; 18 जूनला होणार मतदान

मुंबई-पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या सदस्यसंख्येत आणखी भर पडणार असून,...

उष्णतेने होरपळ:बिहारमध्ये प्रार्थनेदरम्यान 27 विद्यार्थिनी बेशुद्ध

देशातील अनेक राज्ये तीव्र उष्णतेने होरपळत आहेत. उत्तर प्रदेशातील...