Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कामगार चळवळीला जिवंत ठेवण्याची आवश्यकता-यशवंतभाऊ भोसले यांचे प्रतिपादन

Date:

कामगारांना सशक्त बनवणाऱ्या कायद्यांसाठी प्रयत्नशील

पुणे : “कामगार हा कंपनीचा कणा असतो. देशाच्या प्रगतीसाठी उद्योग चालवले जात असतील, तर कामगारांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. कामगार कायद्यांमधील बदल, खाजगीकरण यामुळे कामगार देशोधडीला लागत आहे. अनेक कंपन्या वेतन देताना, करार करताना कामगारांची पिळवणूक करत आहेत. त्यामुळे कामगारांना सशक्त बनवणारे कामगार कायदे आणण्यासाठी प्रयत्नशील आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी केले. कामगार चळवळ अधिक सक्षम व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियनच्या ५२ व्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात भोसले होते. डहाणूकर कॉलनीतील युनियनच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत खुरपे होते. यावेळी किर्लोस्कर कमिन्स कंपनीचे प्लांट हेड राजेंद्र कुलकर्णी, संचालक (एचआर) अजित तलरेजा, प्रमुख (एचआर) शिवांभर सिंग, युनियनचे अध्यक्ष महेंद्र बालवडकर, उपाध्यक्ष बापू सरोदे, डॉ. दत्ता कोहिनकर आदी उपस्थित होते. सेवानिवृत्त, २५ वर्षे सेवा बाजवलेल्या आणि विशेष प्राविण्य मिळवलेल्या कामगारांचा सत्कार करण्यात आला.
यशवंतभाऊ भोसले म्हणाले, “खाजगीकरणामुळे २००४ मध्ये किर्लोस्कर कमिन्समध्ये २२०० कामगार कायमस्वरूपी तत्वावर होते. आज केवळ ४९५ कामगार या सेवेत आहेत. कामगारांच्या मुलांना सेवेत सामावून घ्यावे. महागाई वाढली, पण पगार जेमतेम असल्याने गरीब व श्रीमंत दरी वाढली. ही स्थिती अशीच राहिली, तर समाजात स्तोम माजेल. किर्लोस्कर कमिन्स कंपनीला मोठा इतिहास, परंपरा आहे. त्यानुसार कामगारांचे हित जपण्याला कंपनीने प्राधान्य द्यावे आणि कामगारांच्या कराराचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा.”
“कामगारवर्गाला गुलामगिरीच्या अवस्थेतून बाहेर काढण्याचे काम नारायण मेघाजी लोखंडे यांनी केले. कामगारांना दिलेले स्वातंत्र्य, हक्क अबाधित ठेवण्याचे दायित्व आपल्यावर आहे. मालक, व्यवस्थापन व कामगार यांच्यातील समन्वय व सौहार्दाचे वातावरण सर्वांसाठी पोषक असते. त्यामुळे कामगारांना केंद्रस्थानी ठेवून त्यांना चांगल्या सोयीसुविधा, वेतन कंपन्यांकडून मिळाले पाहिजे,” असेही भोसले यांनी नमूद केले. भोसले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कंपनीचे प्लांट हेड कुलकर्णी व एचआर संचालक अजित तलरेजा यांनी येत्या १५ दिवसांत करार करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 
श्रीकांत खुरपे म्हणाले, “कामगारांच्या हितासाठी संघटन महत्त्वपूर्ण असते. व्यवस्थापन व कामगार यांच्यात सौहार्द राहावे यासाठी युनियन गरजेची आहे. दोन्ही बाजूनी पारदर्शीपणा व प्रामाणिकपणा जपायला हवा. कामगारांचा आणि कंपनीचा उत्कर्ष झाला पाहिजे. त्यासाठी परस्परांना साथ देण्याची आवश्यकता आहे.”
महेंद्र बालवडकर म्हणाले, “वर्धापन दिनानिमित्त रक्तदान व अन्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ३०७ कामगारांनी रक्तदान केले. सेवानिवृत्त कामगार, सेवेची २५ वर्षे पूर्ण केलेले कामगार व विशेष प्राविण्य मिळवलेल्या कामगारांचा सन्मान करण्यात आला. कामगार व कंपनी यांच्यातील करार लवकरात लवकर व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.”
अधिक तलरेजा म्हणाले, “या प्लांटमध्ये चांगले वातावरण आहे. आधुनिकीकरण आले, तरी येथील संस्कृती टिकून आहे. कामगारांमध्ये एकमेकांबद्दल आदर आहे. ६२ वर्षात कंपनीच्या यशात कामगारांचे महत्त्व आहे. युनियनने सामाजिक दायित्व जपले आहे, ही आनंदाची बाब आहे. नवे तंत्र आले तर कामगारांचे महत्त्वाचे कमी होणार नाही.”

नीलेश कथोरे यांनी सूत्रसंचालन केले. विजय भिलारे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...