….हेवेदावे सोडले तर पुण्यातील ६ विधानसभा जिंकू – विजय वडेट्टीवारांनी कॉंग्रेस भवनातून केले आवाहान
पुणे-काँग्रेस पक्षाला संपूर्ण देशामध्ये सध्या चांगले वातावरण असून भाजपने ज्या पद्धतीने धार्मिक ध्रुवीकरण करत आहे सध्या अनेक राज्याचे अशांततेचे वातावरण आहे राज्य राज्यांमध्ये जे विरोधी पक्ष फोडून सत्ता स्थापनेचे जे उद्योग सुरू आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये भाजप विरुद्ध असंतोष आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आपापसातील हेवेदावे सोडून काँग्रेस पक्षाचे काम केल्यास पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या किमान सहा जागा आपण निश्चित जिंकू असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते श्री विजय वडट्टीवार यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना व्यक्त केले
कालच श्री विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल ऐतिहासिक पुणे काँग्रेस भवनला भेट दिली यावेळीप्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी श्री वडेट्टीवार यांचा यांचा फुले पगडी,पुष्पगुच्छ,शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला, प्रदेश अनुसूचित जाती विभाग व भवानी पेठ ब्लॉक काँग्रेस च्या वतीने ‘भारताचे संविधान देऊन अध्यक्ष सुजित यादव यांनी सत्कार केला यावेळी’ डरो मत ‘ या लोगोचे उद्घाटन वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. डरो मत हे राहुल गांधी यांचे ब्रीदवाक्य आहे सदर कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अभय छाजेड माजी आमदार दीप्ती चौधरी, संगीता तिवारी नीता परदेशी , देवकी सदानंद शेट्टी, वैशाली मराठे शहर काँग्रेस हे सर्व पदाधिकारी तसेच ब्लॉगचे सर्व अध्यक्ष महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी विविध सेलचे सर्व प्रमुख यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अजित दरेकर यांनी केले तर आभार संगीता तिवारी यांनी मानले. सदर कार्यक्रमाप्रसंगी नवनिर्वाचित विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा यावेळी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी सत्कार केला.
कॉंग्रेस पक्षात गटबाजीचे तुफान
हर्षवर्धन पाटील कॉंग्रेसला सोडून गेले, अनंतराव गाडगीळ नाममात्र उरले ,आता आबा बागुल, रमेश बागवे हि कॉंग्रेसची तरुण कार्यकर्त्यांची फौज बाळगणारी मातब्बर मंडळी पुण्यात आहेत . ज्येष्ठही आहेत , युवाही आहेत ,पण ज्याचा त्याचा सन्मान होण्या ऐवजी भवनात आता अवमान होऊ लागल्याचे बोलू लागले आहे. जिथे कार्यकर्त्यांची ,पत्रकारांची तुफान गर्दी असायची आता तिथे ठराविक भागातील ठराविक चेहरेच दिसू लागले आहेत . चहा विक्रेत्याचे म्हणणे आहे, खारी सोडाच पण चहाही अमावस्या पौर्णिमेला थोडा फार विकला जाऊ लागला आहे . कॉंग्रेसला देशभर चांगले दिवस येत असताना पुण्यात असे काहोतेय याकडे लक्ष मात्र द्यायला प्रदेश अध्यक्ष वा कोणीही बड्या नेत्यांना वेळ नसावा. प्रभारी शहर अध्यक्ष कि शहर अध्यक्ष हा वाद निर्माण होण्यामागची कारणे नेतृत्वाची रस्सीखेच नाही तर पाडापाडी हेच आहे .निवडणुकीच्या तोंडावर होणारी कॉंग्रेसमधील गटबाजी निश्चितच तोंडापर्यंत आलेला यशाचा घास हिरावून नेईल यात शंका नाही.