पुणे-टू व्हीलर बाईक टॅक्सीला कोणत्याही परिस्थितीमध्ये परवानगी देऊ नये अशी मागणी बाबा कांबळे यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने नियुक्त करण्यात आलेल्या समितीने घेतलेल्या सुनावणी दरम्यान केली .
टू व्हीलर बाईक टॅक्सी ओला, उबर , रॅपिडो, बाबत धोरण ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कमिटी स्थापन करण्यात आली आहे,(सेवानिवृत्त सांडी अधिकारी .) रमानाथ झा, यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या कमिटीसमोर ही सुनावणी झाली
यावेळी उप परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्षव ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष एकनाथ ढोले उपस्थित होते,
यावेळी ओला, उबेर, रॅपिडो ,मेरू कंपनीचे CEO सीईओ उपस्थित होते,
यावेळी रमानाथ झा यांनी रिक्षा संघटनेचे तसेच सदर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे देखील ऐकून घेतले,
यावेळी रिक्षा चालकांच्या वतीने बाबा कांबळे यांनी भूमिका मांडताना सांगितले, आम्हाला सरकारने लायसन, बॅच ,परमिट दिले आहे, आम्ही दरवर्षी इन्शुरन्स काढतो, रिक्षा पासिंग करतो पी यू सी काढतो सर्व प्रकारचे नियम आम्ही पाळतो, परंतु टू व्हीलर रॅपिडोला मात्र कुठल्याही प्रकारे बंधन नाही ,कोणीही टू व्हीलर घेऊन व्यवसाय करू शकतो यामुळे शासनाच्या नियमाचा भंग होत असून रीक्षा व्यवसायावरती मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे,
कोणत्याही परिस्थितीमध्ये टू व्हीलर ला परवानगी देऊ नये, याबद्दल आम्ही ठाम असून टु व्हिलर टॅक्सीला परवानगी दिल्यास महाराष्ट्रासह देशभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल,
आनंद तांबे म्हणाले की आम्ही पुण्यामध्ये रस्त्यावरची लढाई जिंकलो यानंतर आम्ही हायकोर्टामध्ये इंटरवेशन याचिका दाखल केली तिथे आम्ही जिंकलो, सुप्रीम कोर्टात देखील आम्ही इंटरवेशन याचिका दाखल केली त्या ठिकाणी आमचा विजय झाला ,आता पुन्हा कायदेशीर कचाट्या मध्ये हा लढा अडकला असून कुठल्याही परिस्थितीमध्ये टू व्हीलरला परवानगी नको, केंद्र सरकारच्या अग्रिगेटर पॉलिसीमध्ये टू व्हीलर टॅक्सीला परवानगी दिल्याचं संबंधित कंपन्यांनी यावेळी सांगितलं, मुळात केंद्र सरकारने एग्रीगेटर पॉलिसी तयार केल्यास त्याला आम्ही तीव्र विरोध करू, यासाठी 6 मार्च 2023 रोजी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर आम्ही भव्य धरणे आंदोलन करणार आहोत असे सांगितले.
यावेळी ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने एकनाथ ढोले यांनी, टू व्हीलर टॅक्सी पॉलिसीला तीव्र विरोध करत, महाराष्ट्र मधल्या सर्व मेट्रो सिटी तसेच महाराष्ट्र मध्ये कोणत्याही शहरांमध्ये टु व्हिलर टॅक्सीला परवानगी देऊ नये असे झाल्यास ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केले जाईल आम्ही पुण्यामध्ये तीव्र आंदोलन केल्यामुळेच टू व्हीलर टॅक्सी बंद झाली आहे असे सांगितले