सावरकारांची क्षमता टिळकांनीच आधी ओळखली असेही म्हणाले मोदी ….
पुणे-इंग्रजांचा विरोध झुगारून सरदार पटेल यांनी लोकमान्य टिळकांचा पुतळा अहमदाबादमध्ये बसवला. मात्र, एखाद्या रस्त्यांचे नाव बदलले तरी विरोधक हंगामा करतात, त्यांची झोप उडते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.नरेंद्र मोदी यांचा पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवक करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. त्यांनी पुरस्काराची रक्कम नमामि गंगे प्रकल्पाला अर्पण केल्याचे यावेळी सांगितले.नरेंद्र मोदी म्हणाले की, इंग्रजांचा विरोध झुगारत सरदार पटेल यांनी लोकमान्य टिळकांचा पुतळा अहमदाबादमध्ये बसवला. या स्मारकाचे उद्घाटन महात्मा गांधींच्या हस्ते झाले. मात्र, आता एखाद्या रस्त्यांचे नाव बदलले तरी विरोधक हंगामा करतात, त्यांची झोप उडते, अशी टीका मोदींनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला वंदन करुन त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळकांचे महत्त्व त्यांनी अधोरेखीत केले. लोकमान्य हे या लढ्यातील माथ्यावरचा टिळा असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘पुरस्कार स्वीकारण्यासाठी या मातीत येण्याचे मला भाग्य लाभले आहे. हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या सन्मानासाठी मी हिंद स्वराज्य संघ आणि उपस्थितांचे आभार व्यक्त करत असल्याचे ते म्हणाले. टिळक पुरस्कार माझ्यासाठी अविस्मरनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात काशी आणि पुण्याची विशेष ओळख असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. येथे विद्या म्हणजेच शिक्षण, विद्वत्ता अजारमर झाली असल्याचे ते म्हणाले. हा पुरस्कार मी 140 देशवासियांच्या चरणावर समर्पित करत असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. देशवासियांच्या सेवा करण्यात मी कमी पडणार नसल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. या पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेला पैसे नमामी गंगे योजनेसाठी देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
पुरस्कार घेताना मी उत्साही आणि भावुक आहे. या पुरस्कारानंतर माझी जबाबदारी वाढली आहे. महात्मा गांधींनी टिळकांना आधुनिक भारताचा निर्माता म्हटले. टिळकांनी शिवजयंतीचे आयोजन सुरू केल्याचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. समाजाला एकत्र करण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव सुरू केल्याचे ते म्हणाले. सावरकारांची क्षमता टिळकांनीच आधी ओळखली असल्याचे ते म्हणाले. टिळकांमुळे सावरकरांचे शिक्षण विदेशात झाले असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
स्वातंत्र्याच्या आंदोलनादरम्यान लोकमान्य टिळक अहमदाबादमध्ये दीड महिने कारागृहात राहिले असल्याची आठवण मोदी यांनी करून दिले. त्या काळी टिळकांचे स्वागत करण्यासाठी 40 हजार नागरिक एकत्र आले असल्याचे ते म्हणाले. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल देखील आले असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राप्रमाणेच गुजरातचेही टिळकांचे वेगळे नाते असल्याचे ते म्हणाले.