महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे अभ्यासू,कर्तृत्त्ववान आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व होय. आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल थोडंसं सांगावं वाटतं.माझा आणि त्यांचा परिचय ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वी झाला.स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्यामुळं फडणवीस साहेबांशी ओळख झाली.आमच्यातली मैत्री निखळ आणि स्वच्छ आहे. जसं आहोत तसं आम्ही एकमेकांना स्वीकारलं आहे.
२०१४ व २०१९ च्या पुणे लोकसभा व शहरातील आठ विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला महत्वाची भूमिका बजावता आली. विशेषतः २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कोथरुड विधानसभा मतदार संघात भाजपाच्या विजयासाठी मी काम केले व विजय मिळवून दिला.फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत जिथं भाजपाची ताकद नाही त्याठिकाणी भाजपाचे नगरसेवक निवडून आणण्याची फडणवीस साहेबांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम देखील मी फत्ते केली आणि सर्वाधिक ९८ नगरसेवक जिंकून आणले.इतिहासात पहिल्यांदाच पुणे महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे (भाजयुमो) वार्ड अध्यक्ष ते उपमुख्यमंत्री,मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ते नगरसेवक आणि पुढे नागपूरचे महापौर झाले. १९९९ ला पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर सलग पाचवेळा ते निवडून आले. अभ्यासूपणामुळं त्यांनी विरोधकांना सळो की पळो करून सोडलं आहे. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ अशी घोषणा झाल्यानंतर २०१४ मध्ये महाराष्ट्राचे भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी शपथ घेतली.
फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग,मुंबईतील कोस्टल रोड,जलयुक्त शिवार योजना व वृक्ष संवर्धन,मुंबई,पुणे,नागपूर याठिकाणी मेट्रोचं जाळं,समान पाणी पुरवठा योजना,पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ,चांदणी चौकातील उड्डाणपूल,कात्रज-कोंढवा रस्ता,स्मार्ट सिटी अशा अनेक योजना गतिशीलपणे राबवल्या गेल्या.
फडणवीस साहेबांच्या या तळमळीनं काम करण्याच्या वृत्तीचा आणि अभ्यासूपणाचा उपयोग महाराष्ट्राच्या कल्याणासाठी होवो.त्यांच्या हातून राष्ट्राची महाराष्ट्राची सेवा घडो आणि यासाठी त्यांना निरोगी उदंड आयुष्य मिळो ! साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
महराष्ट्राच्या राजकारणात अजितदादा पवार यांच्या इतका प्रशासनावर पकड असणारा व मैत्रीला जागणारा दुसरा नेता नाही.वाढदिवसानिमित्त अजितदादांच्या स्वभावाविषयी आणि आमच्यातील मैत्रीविषयी थोडक्यात सांगतो….
अजितदादा म्हणजे कुशल नेतृत्व, चांगला वक्तृत्व असणारे आणि स्पष्टवक्ता नेता…काटेकोर काम आणि प्रशासनावर पकड ही त्यांच्या कार्यपद्धतीची खास वैशिष्ठ्ये आहेत.यामुळे महाराष्ट्रात त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.
अजितदादा आणि माझी ओळख १९९७ साली झाली.प्रा. रामकृष्ण मोरे सरांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. माझ्या सोन्याच्या दुकानाचं उद्घाटन करण्यासंदर्भात अजितदादांना निमंत्रित करण्यासाठी मी त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो.तेव्हापासून आमची मैत्री सुरु झाली.मला विशेष आनंद याचा आहे की आजही आमची मैत्री कायम आहे.
अजितदादांचा एक गुण खूप खास आहे.ते मित्रांना विसरत नाहीत.त्यांच्या कार्यकर्त्यांच्या व त्यांच्या मित्रांच्या पाठीशी ते कायम उभे राहतात.कार्यकर्त्यांना ताकद देतात.आमच्या दोघांच्या मैत्रीतही त्यांनी कधीच अंतर पडू दिले नाही.ज्या ज्यावेळी मला मदत लागली तेव्हा ते आमच्या मैत्रीला जागले आणि माझ्या मदतीला आले.आणि मी देखील त्यांच्या मैत्रीला कधी अंतर दिले नाही.
गेली ३२ वर्षे ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय •असून बारामती विधानसभा मतदार संघातून सलग सातवेळा ते जिंकून आले आहेत.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री,ऊर्जा मंत्री आदी विविध खात्यांचे मंत्रिपद म्हणून काम करताना त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागाची,शेती, सहकारसह उद्योग,व्यापार अशा बहुतांश सर्वच क्षेत्राची अजितदादांना बारकाईनं माहिती आहे.त्यामुळं निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची हातोटी त्यांच्यामध्ये दिसते.
अजितदादा म्हणजे वक्तशीरपणा.सकाळी सात वाजता ते लोकांना भेटतात व कामाला लागतात.सर्वसामान्य माणसाला देखील ते सहज उपलब्ध असतात.
अजितदादांच्या याच गुणांचा उपयोग महाराष्ट्राच्या भल्यासाठी होवो. त्यांच्या हातून राष्ट्राची महाराष्ट्राची सेवा घडो आणि यासाठी त्यांना निरोगी उदंड आयुष्य मिळो ! आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही सदिच्छा! दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
(लेखक:माजी खासदार संजय काकडे )