पुणे- शहर आणि उपनगर तसेच एकूणच परिसरात ‘आम्ही इथले भाई ‘ असे म्हणत दहशत निर्माण करण्याची नशा जणू येथील तरुणाईत पसरली असल्याचे दिसून येते आहे.अशाच आणखी एका प्रकरणात फरासखाना पोलिसांनी सुमारे ८ जणांवर गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. हे आरोपी अगदी १८ ते २२ वयोगटातील असल्याचे आजवर ठिकठिकाणी निदर्शनास आले आहे.
फरासखाना पोलिसांनी १. ऋतिक राजेश गायकवाड,( वय २२, रा. ४२३, नविन मंगळवार पेठ, पुणे) २. उजेद शाहिद शेख,( वय-२१, रा. सदर)३. अरमान इकबाल शेख,( वय २०, रा. सदर )या तिघांना अटक केली असून त्यांच्या इतर पाच साथीदारांवर देखील गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी सांगितले कि याप्रकरणी वेदांत सारसेकर वय २६ वर्षे रा. मंगळवार पेठ पुणे याने फिर्याद नोंदविली आहे.
दि.०९/०७/२०२३ रोजी रात्रौ २२/०० रोजी कमला नेहरु चौक येथे असलेल्या सुंदर पान शॉप जवळ यातील फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसोबत सदर ठिकाणी गप्पा मारत थांबले असताना, नमुद इसम व फिर्यादी यांचेत झालेल्या जुन्या भांडणाचे कारणावरुन नमुद इसमानी त्यांचे साथीदारासह फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचे डोक्यात घातक हत्यारांच्या सहाय्याने वार करुन, गंभीर जखमी करुन, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांचेकडील हत्यारे हवेत फिरवुन, “आम्ही इथले भाई आहोत, इथुन पुढे आमच्या सोबत कोणी पंगा घेतला, तर त्याला जिवंत सोडणार नाही” असे म्हणुन सदर परिसरात दहशत निर्माण केली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी भादविक ३०७, ३२४, १४३, १४४, १४७, १४९, ३२३, ५०६, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) १३५, आर्म अॅक्ट ४ (२५), क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट क. ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे ,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप (8830552255)याप्रकरणी अधिक तपास करत आहेत .