पुणे:
कीटकनाशक उद्योगाने सादर केलेल्या सुरक्षितता आणि परिणामकारकता यावरील भरीव माहितीच्या आधारे नियुक्त तज्ज्ञ समितीमार्फत २७ कीटकनाशकांचा व्यापक आढावा घेतल्यानंतर भारत सरकारने २४ कीटकनाशकांचा वापर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा अल्पभूधारक शेतकाऱ्यांसह संपूर्ण कृषी समुदायाने स्वागत व कौतुक केले आहे, कारण ते या उत्पादनांचा गेल्या दशकांपासून अनेक पिकांवर सुरक्षितपणे वापर करीत आहेत.
ही कीटकनाशके भारतात उत्पादित होत असल्याने भारतीय शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी किफायतशीर किंमतीत तंत्रज्ञान उपलब्ध होण्याची हमी या निर्णयामुळे राहील.
या अत्यंत महत्त्वाच्या कीटकनाशकांचा वापर सुरू ठेवण्याचा सरकारचा निर्णय शेतीची वास्तविकता आणि शेतकऱ्यांना किफायतशीर तंत्रज्ञान उपलब्ध असण्याची गरज दर्शवितो कारण प्रचंड महागड्या आयात केलेल्या पर्यायी कीटकनाशकांच्या तुलनेत आपलेच, परवडणाऱ्या किंमतीतील तंत्रज्ञान वापरुन दर्जेदार व किफायतशीर अन्न उत्पादन करण्याची आज आवश्यकता आहे.
पिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि चांगले पीक उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी कीटकनाशके उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे, असे म्हणत देशभरातली शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या महत्त्वाच्या २४ कीटकनाशकांचा वापर चालू ठेवणे भारताच्या अन्न उत्पादन प्रणालीचे रक्षण करण्याच्या दिशेने एक आवश्यक पाऊल आहे आणि त्याचबरोबर यामुळे हे शेतकरी कार्यक्षमतेने आणि शाश्वतपणे अन्न उत्पादन करणे सुरू ठेवू शकतात.
हरयाणा येथील अंबाला शेतकरी उत्पादन संस्थांचे संचालक श्री. गवनीत सिंग म्हणाले, “शेतकरी म्हणून आम्ही जाणतो की आमच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि चांगले पीक उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी कीटकनाशकांचा वापर करणे किती महत्वाचे आहे. सरकारचा हा निर्णय एक सकारात्मक पाऊल आहे कारण या कीटकनाशकांची राज्य कृषी विद्यापीठांकडून शिफारस केली जात आहे आणि शेतकऱ्यांना पिकांवर त्यांचा सुरक्षितपणे वापर करण्याचा अनुभव आहे.”
हरियाणा येथील पेहोवा शेतकरी उत्पादन संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हरप्रीत सिंग म्हणाले, “उत्पादन आणि उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल आहे. आम्ही या कीटकनाशकांसोबत काम केले आहे आणि त्यांच्या कामगिरीवर आमचा विश्वास आहे. अन्य कोणत्याही पर्यायांचा स्वीकार करावा लागल्यास त्याचा आमच्या इन्पुट खर्चावर आणि एकूण उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.”
आपले अन्न पुरवठ्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता राखण्यासाठी कीटक आणि रोग नियंत्रण महत्त्वाचे आहे. या २४ महत्त्वपूर्ण कीटकनाशकांचा वापर चालू ठेवणे ही एक आवश्यक पायरी आहे, कारण या कीटकनाशकांचा वापर तुलनेने नवीन उत्पादनांसाठी संभाव्य तण, कीटक व रोगांविरूद्ध प्रतिरोधक व्यवस्थापनासाठी मिश्रण म्हणून देखील केला जातो.
किडे आणि कीटके गोदामांमध्ये साठवलेल्या धान्यांसह २० ते ३० % एवढे पिकांचे नुकसान करू शकतात. गहू, तांदूळ, कडधान्ये आणि तेलबियांमधील साठवण कीडपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी या कीटकनाशकांचा वापर धान्य साठवणुकीसाठी स्मार्ट फ्युमिगंट्स म्हणून केला जातो.
भारत सरकारने कीटकनाशकांच्या सुरक्षित व कार्यक्षम वापरासाठी ड्रोनच्या वापरास आधीच मान्यता दिली आहे. आपल्या अन्न पुरवठ्याची गुणवत्ता व सुरक्षितता राखण्यासाठी कीटक आणि रोग नियंत्रण महत्त्वाचे आहे. कीटकनाशके विशिष्ट कीटक व रोगांनाच केवळ लक्ष्य करण्यासाठी तशा पद्धतीने काळजीपूर्वक तयार केली जातात आणि त्यांचा वापर केल्याने लक्ष्य नसलेल्या जीवांना आणि पर्यावरणाला पोहोचू नये याची खात्री करण्यासाठी कठोरपणे नियम केले जाते.