२३ गावांचा विकास आराखड्यासाठी एस.पी.अेा स्थापन केल्याबद्दल महाविकासआघाडी सरकारचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी मानले आभार
पुणे-महापालिकेत समाविष्ट केलेल्या २३ गावांच्या विकासाचा आराखडा करण्यासाठी पीएमआरडीए अंतर्गत एसपीओ स्थापन करण्याचा निर्णय आज राज्य सरकारच्या वतीने मुंबईत झाल्याचे कळताच महापालिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली कॉंग्रेसचे गटनेते आणि ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी या निर्णयाबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करीत; अनेकांचे कोट्यावधींचे मनसुबे उधळून लावले, जैसे को तैसा मिला ,हि तर आहे परतफेड अशा राजकीय प्रतिक्रिया देत भाजपा पदाधिकाऱ्यांनी बोलविलेली खास सभा आता खासच उरली आहे असा टोलाही लगावला . आणि एसपीओ अंतर्गत विकास आराखडा झाल्यावर या गावांचा चांगला विकास होऊ शकेल असा विश्वास हि व्यक्त केला .
आबा बागुल म्हणाले कि ,’महानगरपालिकेच्या हददीत नुकताच २३ गावांचा समावेश झालेला आहे. यामुळे पुणे शहर हे भौगोलिकदृष्टया राज्यातील सर्वात मोठे शहर बनलेले आहे. २३ गावांचा महानगरपालिका हददीत समावेश होणेपूर्वी पीएमआरडीए कडून प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. हा जवळपास अंतिम टप्प्यात असताना सदर २३ गावे महानगरपालिका हददीत समाविष्ट झाली. आता सत्ताधारी पक्षाकडून २३ गावांचा विकास आराखडा तयार करणेसाठी इरादा जाहिर करणेबाबत मुख्य सभा बोलाविली आहे. पीएमआरडीए अधिकारी व त्यांचे (शासकीय अधिकारी) तज्ञ टाऊन प्लॅनर यांनी प्रारूप विकास आराखडा तयार केला असून यासाठी मोठा अवधी व मोठया प्रमाणात खर्च देखील झालेला आहे. या अनुषंगाने राज्य शासनाने एस.पी.अेा. निर्माण करून २३ गावांचा ख-या अर्थाने सर्वांगीण होणार आहे. राज्य शासनाने २३ गावांच्या विकासाला एस.पी.ओ. च्या माध्यमातून चालना दिलेली असून यामुळे गावांचा नियोजनबध्द विकास होवू शकेल.
विकास आराखडयाच्या निमित्ताने आठवण करून देतो की, पुणे महानगरपालिका पुण्याचा डीपी अंतिम मंजुरीसाठी मुख्य सभा चालू असताना तत्कालीन भाजप राज्य सरकारने हा डीपी रडीचा डाव करत महापालिकेकडून काढून घेतला. असाच प्रयत्न पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपने करण्याचा प्रयत्न केला, भाजपच्या या मनसुब्यावर राज्य शासनाने पाणी फिरवत सर्व डाव उधळून लावले व भाजपने उदया बोलविलेली खास मुख्य सभा आता खासच राहिली आहे असे आबा बागूल म्हणाले.
बागुल यांनी मंत्रिमंडळातील अशोकराव चव्हाण.बाळासाहेब थोरात, नाना पटोले, .पृथ्वीराज चव्हाण, तसेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे, यांचे २३ गावांच्या विकासाला चालना देण्याबाबत निर्णय घेतल्याने आभार मानले आहेत .