बीड-मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक इशारा सभा बीडमध्ये पार पडत आहे. या सभेसाठी जय्यत तयारी झालेली असून या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जरांगे हे सभास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी 200 जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली तर हेलिकॉप्टरने संपूर्ण सभास्थळावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. तर कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली.
जरांगे-पाटील म्हणाले, “सरकारनं मराठ्यांना नोटीसा दिल्या आणि मुंबईत १८ जानेवारीपर्यंत १४४ कलम लागू केलं. त्यामुळे २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करण्यात येईल. २० जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर मी आमरण उपोषण करणार आणि मला भेटण्यासाठी मराठे येतील.”बीड जिल्ह्यातील मराठ्यांचा महाप्रलय जमला आहे. आपण विराट ताकदीनं जमला आहात त्यामुळं मराठा समाजाच्या चरणी नतमस्तक होतो, असं जरांगे म्हणाले. गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आलेल्या बांधवांना जय शिवराय म्हणत मनोज जरांगेंनी अभिवादन केली.
मराठा समाजानं शांतता काय असते ते पुन्हा सिद्ध केलं आहे. आपल्याला डाग लावला गेलाय, शांततेनं आंदोलन करणाऱ्या मराठ्यांना डाग लावला आहे. कोणी म्हणतं आमची घरं जाळलं, आमचं हॉटेल जाळलं पण तुम्हीच तुमची हॉटेल जाळली आणि निष्पाप मराठ्यांना गुतवल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला.
आपल्या पोरांनी काय न करताही गुन्हे लावले गेले. निष्पाप पोरांना गुतवण्याचं काम सरकारनं केलं आहे. मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. सरकारनं झोपू नये, मराठ्यांना राज्यात शांतता हवी आहे. मराठा समाज शांततेत मैदानात आला आहे, विनाकारण त्याला डाग लावू नका, असं मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांचेच सरकार ऐकत असल्याचा दावा केला. भुजबळ मराठ्यांच्या वाटाला कशाला जातात, असा सवाल मनोज जरागेंनी केला. मी लई नमुना बेक्कार असल्याचं जरांगेंनी म्हटलं.गिरीश महाजन यांनी तुम्ही काही बोलू नका छगन भुजबळ यांना समज दिली असल्याचं सांगितल्याचं मनोज जरांगे म्हणाले. छगन भुजबळ यांना मराठा आरक्षण मिळाल्यानं कचका दाखवतो. भुजबळ यांच्यात किती दम आहे हे बघायचे आहे, असं जरांगे म्हणाले.मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात कोण बोलला तर त्यांना सुट्टी देणार नाही. मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरु असल्याचं जरांगेंनी म्हटलं. मनोज जरांगे यांनी २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली.
‘येवल्याच्या येडपटाने त्याच्याच पाहुण्याचं हॉटेल जाळलं. ते बधीर आहे, सरकारही त्याचंच ऐकत आहे. बाजारची पिशवी घेऊन त्यात कागदं घेऊन फरत आहे. बघा.. बघा मला कशा शिव्या देतेत, म्हणत आहे. परंतु मी आधीच सांगत होतो माझ्या लादी लागू नको म्हणून. मी लई नमुना बेकारय. तुला आत्ताच खाल्लेलं पचत नाही.”जरांगे पुढे म्हणाले, ”सध्या तो (छगन भुजबळ) बारीक बोलतोय, जसंकाय कळ निघती. जरांगे साहेब म्हणतोय आता. आधी अळी वळवळ करत होती. दिसतंयबी कसलंतरी.. रंग बदलणाऱ्यासारखं.””मला गिरीश महाजनांनी सांगितलं, तुम्ही बोलू नका. मी चार दिवस काही बोललो का? तरी काल बोललं. येडपट बुजगावणं. द्या सगळं त्यांना.. मंत्र्यांचे बंगले बांधा.. असं म्हणालं”
सभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “किती दिवस आम्हाला आरक्षणासाठी झुलवत ठेवणार. आजच्या सभेत सर्वकाही सांगणार आहे. संयम किती दिवस पाळायचा आम्हालाही मर्यादा आहे. सरकारच्या हातात आजचा आणि उद्याचा दिवस आहे. सरकारने लिहिलेले शब्द सरकार पाळत नाही. आजच्या सभेतून मराठा समाजासमोर सर्व सत्य मांडणार आहे. मराठा समाजाने आणखी किती दिवस अन्याय सहन करायचा. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी आमची आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही आरक्षण मागत आहोत,” असे जरांगे म्हणाले.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील…!
- मनोज जरांगे पाटील म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज मुंबईत येणार आहे. आम्हाला कोणताही त्रास देऊ नका, मुंबईत मराठे आल्यावर पोलिसांनी त्रास देऊ नये.
- सरकारने आम्हाला अडवू नये, आमरण उपोषणाशिवाय कोणताही शांततेचा मार्ग असूच शकत नाही.
- मुंबईच्या आत येण्यापूर्वी सरकारने आरक्षण दिलेच पाहिजे, नसता त्यांना अनेक गोष्टीला समोर आले.
- मराठ्यांच्या संघटना कोणीही स्वतंत्र आंदोलन करायचे नाही. नाटकं बंद करा, मराठ्यांच्या सोबत राहा, असा इशारा देखील मराठा संघटनांना जरांगे पाटील यांनी दिला. वेगळी चूल कोणीही मांडायची गरज नाही.
- मराठा जात संपविण्याचा डाव सरकारकडून केला जात आहे. पण घाबरु नका, मराठा मागे लागला तर दोन पिढ्या तुम्हाला काहीच सुधारणार नाही, असे म्हणत जरांगे यांनी सरकारला इशारा दिला.
- मनोज जरांगे पाटील म्हणाले की, कोणी दंगा करायला लागला तर तो आपला नाही, जो हिंसा करेन तो आपला नाही, एवढं मात्र नक्की आहे. ‘प्रश्न मार्गी लावा, नाटक कशाला’.
- कोणालाही जाळपोळ करू द्यायची नाही. आपले माणसं लक्षात ठेवा, कुठेही जाळपोळ होणार नाही, याची दक्षता घ्या. पंधरा दिवस आपल्यायाला मुंबईत उपोषण करायचं आहे. त्या तयारीनेच त्या जायचे आहे. कोणाला अटक केली तर पोलिसांच्या समोर जाऊन बसा, असा सल्लाही त्यांनी दिला. विनाकारण मराठा समाजाला अडचणीत आणण्याची गरज नाही, असाही इशारा जरांगे यांनी सरकारला दिला.
- मराठ्यांचा मुळावर कोण आहेत. जो कोणी मराठ्यांच्या पाठिशी उभा राहिलात तोच नेता आमचा, असा इशारा देखील त्यांनी राजकारण्यांना दिला आहे.
- गडबड, गोंधळात माणूस फसतो, मागे पुढे पाहून निर्णय घ्यायचा आहे.
- सरकारला विनंती आहे, मराठा समाजाला आता डिवचवू नका, तुम्ही आंतरवाली सराटीत प्रयोग केला. पुन्हा तसा प्रयोग करू नका, सरकारला वाटलं की, पुन्हा डाव रचला. आयोजकांना नोटीस दिल्या. ट्रॅक्टरवाल्याला देखील पोलिसांनी नोटीस दिल्या.
- आमच्या लेकराचं मुडदे आम्ही बघू शकत नाही. शांततेच्या आंदोलनात प्रचंड ताकद आहे. शांततेत पण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे घेणार नाही. तुम्ही किती दिवस मराठा समाजाच्या मर्यादा आहेत. आपण सगळे आंदोलनाची दिशा ठरवू
- मराठा समाजाला आरक्षण मागितले तर चूक आहे. मला ते लोक दुश्मन समजू लागले. मी मॅनेज होत नाही, त्यांना हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे.
- सरकारने मराठा समाजाची फसवणूक करतेय. मायबाप सावध व्हावा, आपल्या लेकरासाठी सरकार गांभीर्याने घेत नाही. सरकारला वठणीवर आणण्याची ताकद आहे. मी कुणालाही गिनतही नाही भीत नाही.
- मराठ्यांच्या नादाला लागला की संपला, त्याचा विषयच आवरला. जे आपल्या लेकरांच्या बाजूने आहे. तोच नेता आपला बाकी कोणीच आपला नाही. आपलं मतं घेण्यासाठी दारात आला तर त्याला चपल्लेने तुडवा, कारण आरक्षणासाठी किती तरी बळी गेले आहेत.
- या समाजातील लेकरांना आरक्षण मिळावे हीच मागणी आहे. मी काय चूक केली आहे. दशकाने दशक वाया गेले, पिढ्याने पिढ्या बरबाद झाल्या, एवढीच मागणी आहे. मग आम्ही काय चुकीची मागणी केली. माझं लेकरु मोठं व्हावं, नोकरीला लागावं, एवढीच आशा कोणत्याही मायबापाची आहे. पण आरक्षणाने घात केला. हुशार लेकरू देखील घरी येवून रडू लागले. त्यामुळे आता आरक्षण नक्की मिळणार आहे. याची शंभर टक्के गॅरंटी देतो, असे जरांगे पाटील म्हणाले.
- आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण पाहिजे, यासाठी ही आमची लढाई आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे की, आमच्या सर्वांची वेदना एकच आहे. मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्या, भुजबळांचे ऐकू नका, एकदा जर संपूर्ण समाज खवळला तर मग तुमचा सुफडा साफ झाला म्हणून समजा. माझ्या मराठ्यांना तडफू नका, तुम्ही एकदा प्रयोग केला. त्यामुळे त्या प्रयोग तुम्हाला भोगावा लागला. आता सावध रहा, कानाकोपऱ्यातली मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे भुजबळचे ऐकून तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तर जड जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केला.
- त्याला पाणीच पाजतो, त्याचा खुटाच उपटतो, माझे उलटं आहे, आधी समाज नंतर कुटुंब. त्यामुळे मराठा समाजाशी माझे माय-लेकराचं नातं आहे.
- तुला म्हटलं होत, नादी लागू नको, मी लयी नमुना बेकार आहे, असा शब्दात जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली. जरांगे साहेब म्हणतो, आता म्हाताऱ्याला काही बोलायची गरज होती. त्याला अक्कल काढतो. महाराष्ट्राला या डबड्याची गरज काय, आरक्षण मिळेपर्यंत शांत राहा, या भुजगावण्यात किती दम आहे, बघूच आता, अशा एकेरी उल्लेख करत जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली.
- बीडमध्ये मराठ्यांच्या एकीजुटीचा हा महाप्रलय आहे. ही मराठ्यांची मागणी
- शांत असलेल्या मराठा समाजावर खोटा डाग लावलाय, यांनी यांचेच हॉटेल जाळले अन् मराठ्यातील निष्पापावर आरोप केले. मराठ्यांना शांतता बघा, असा इशारा सरकारला जरांगे यांनी दिला.
- मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच छगन भुजबळ यांच्यावर टीका करून केली. एवढी गर्दी पाहून येवल्याच्या यडपटाला .XXXXसंंXX लागल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात टीका करत भुजबळांवर हल्लाबोल केला.