पुणे- हिंदू -मुस्लीम , सवर्ण – बहुजन आणि बहुजानात देखील मराठा -कुणबी अशा विविध धर्म ,जाती पातीत देशाचे विघटन होण्याचा प्रयत्न जोमाने होत असताना अशा प्रयत्नाना हाणून पडून देश एक संघ ठेवायचा असेल तर धर्म , जाती पतीच्या भिंती ओलंडून मानवतेच्या मार्गाने एकजूट राहून देश मजबूत राहू शकतो असे असताना आता प्रांत वाद देखील सुरु झाल्याने चिंतेचे विषय समोर येऊ लागले आहेत .महाराष्ट्रातील उद्योग, केंद सरकारची कार्यालये गुजरात सरकारने पळव्ल्यानंतर त्याचा महाराष्ट्रातील गावांवर डोळा आहे. गावे महाराष्ट्रात असताना त्याच्या नोंदी गुजरातमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. गुजरातच्या या घुसखोरीबाबत आ. विनोद निकोले यांनी लक्षवेधी मांडली.त्यानंतर आज जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई विमानतळावरील एका फलकाचा फोटो काढून ट्वीट केले आहे .इतर राज्यांचे उद्योग पळविल्यावर #GujratMeansGrowth हे बोलणं फार सोपं आहे.. असे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील उद्योग, केंद सरकारची कार्यालये गुजरात सरकारने पळव्ल्यानंतर त्याचा महाराष्ट्रातील गावांवर डोळा आहे. गावे महाराष्ट्रात असताना त्याच्या नोंदी गुजरातमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. गुजरातच्या या घुसखोरीबाबत आ. विनोद निकोले यांनी लक्षवेधी मांडली. तेवढ्यावर न थांबता त्यांनी शुक्रवारी संबंधित यंत्रणा तसेच सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे.
कर्नाटकातील मराठी भाषक 865 मराठी गावे महाराष्ट्राला अजूनही परत मिळवता आलेली नाहीत. त्यातच महाराष्ट्रातील काही गावांनी गुजरात, तेलंगणामध्ये जाण्याचा ठराव केला आहे. ही परिस्थिती एकीकडे असताना पालघर जिल्ह्यावर गुजरातकडून अन्याय सुरू आहे. पालघरला मंजूर झालेले कोस्टल गार्ड गुजरातने पळवून नेले. गेल्या सहा महिन्यांपासून गुजरातची वक्रदृष्टी महाराष्ट्रातील गावांवर वळली आहे. पालघर जिल्ह्यातील दोन मराठी गावे बळकावण्याच्या हालचाली गुजरातने चालवल्या आहेत. सीमावर्ती तलासरी तालुक्यातील वेवजी आणि झाई या गावात असलेला सीमादर्शक दगड सुमारे 150 मीटर महाराष्ट्राच्या बाजूला आतमध्ये सरकवून गुजरातने आपली हद्द वाढवली. त्यामुळे नवा संघर्ष उद्भवला आहे.

