पुणे-गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा देणार की शरद पवार गटाला याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली नव्हती. मात्र आज विधानभवन परिसरात दाखल होताच नवाब मलिक यांनी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यालयात हजेरी लावली. त्यानंतर, सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर ते शेवटच्या रांगेत बसले. त्यामुळे त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरुन, शिवसेना नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. त्यावर, फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिले होते. आता, या वादात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे.
नेमक्या काय म्हणाल्या अंधारे?
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले. बोले तैसा अजिबात ना चाले त्यासी पाहून सरडेही लाजीले, हे नवे विडबंन सूचत आहे. कारण, विधिमंडळ अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांचा राजीनामा का घेतला नाही असा साधा साळसूदपणे प्रश्न विचारला. देवेंद्रभाऊ तुम्हाला आठवते का? पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपनेच केला होता. तमुच्या पक्षातील आक्रस्थाळ्या बायकांना पुढे करत तुम्ही त्यांचा राजीनामा मागितला. आणि आमच्या पक्षाने तो राजीनामा घेतला. त्याच संजय राठोडांना मंत्रिमंडळाच्या पंगतीला बसवून घेतले आणि तेच फडणवीस आज नवाब मलिक यांचे मंत्रिपद का काढून घेतले नव्हते असा प्रश्न विचारतात? आणि वरुण नवाब मलिकांचा प्रश्न विचारता हे कसे जमते, देवेंद्र भाऊ सरडे सुद्धा लाजून आत्महत्या करतील असा खाेचक टोला त्यांनी लगावला आहे.
अंधारे यांचे ट्विट काय?
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपने केले. त्याच संजय राठोडांना मंत्रिमंडळाच्या पंगतीला बसवून घेतले आणि तेच फडणवीस आज नवाब मलिक यांचे मंत्रिपद का काढून घेतले नव्हते असा प्रश्न विचारतात? @Dev_Fadnavis भाऊ सरडासुध्दा आत्महत्या करेल हो!!