मतदारांशी थेट संपर्क साधत प्रचारावर कॉंग्रेसचा भर

Date:

पुणे-महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पहिल्या १० दिवसांत संपूर्ण पुणे शहरात १४ जीप यात्रा / पदयात्रा काढून हजारो मतदारंशी थेट संपर्क साधत पहिल्या टप्प्यात प्रचाराचा झंजावात त्यांनी निर्माण केला. प्रत्येक विधानसभा मतदार संघ जीप यात्रा / पदयात्रांद्वारे त्यांनी अक्षरशः पिंजून काढला. त्यामध्ये कसबा – ३, कोथरूड – ३, पर्वती – ३, वडगावशेरी – ३ , आणि पुणे कॅन्टॉन्मेंट व शिवाजीनगर – प्रत्येकी १ अशा जीप यात्रा / पदयात्रांद्वारे त्यांनी सारे मतदार संघ आत्तापर्यंत पिंजून काढले.

काही सकाळी व बहुतांशी संध्याकाळी होणाऱ्या या पदयात्रांचा शुभारंभ उमेदवारी अर्ज भरल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार १९ एप्रिल रोजी सकाळी पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीचे दर्शन घेऊन पदयात्रांना प्रारंभ झाला. त्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आम आदमी पार्टी यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांच्या सोबत पदयात्रेत सहभागी होत राहिले. पदयात्रांमध्ये प्रमुख पक्षांचे झेंडे डौलाने फडकत राहिले. काँग्रेस पक्षाचे चिन्ह म्हणजे हाताचा पंजा सर्वत्र उंचावले जात होते.

याच परंपरेला साजेशी पदयत्रा रविवार सकाळी पर्वती विधानसभा मतदार संघ व संध्याकाळी शिवाजीनगर मतदार संघात निघाली. ढोल ताशांच्या गजरात ‘झिंदाबाद’ च्या घोषणांनी दुमदुमत राहिलेल्या पदयात्रांमध्ये उमेदवार आ. रवींद्र धंगेकर हजारो नागरिकांना भेटत राहिले. नागरिकांचा प्रतिसादही उत्साहवर्धक होता. ठिकठिकाणी स्वागत केले जात होते. अनेक दुकांनांमध्ये धंगेकरांना आवर्जून बोलावले जात होते. पर्वती मतदार संघातील अप्पर इंदिरा नगर येथून सकाळी ९.३० वाजता सुरु झालेली पदयात्रा दुपारी ३ पर्यंत चालूच राहिली. प्रत्येक ठिकाणी औक्षण, सार्वजनिक गाणेशउत्सोव मंडळांमध्ये श्री गणेशाची आरती, यामुळे पदयात्रेला विलंब होत राहिला मात्र कार्यकर्त्यांचा व नागरिकांचा उत्साह कमी झाला नव्हता.

या पदयात्रेत ॲड. अभय छाजेड, मार्केटयार्ड ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे, पर्वती ब्लॉक अध्यक्ष संतोष पाटोळे, माजी नगरसेवक बंडू नलावडे, भरत सुराणा, स्वप्नील नाईक, प्रथमेश आबनावे, राधिका मखामले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाळासाहेब ओसवाल, माजी नगरसेविका दिपाली ओसवाल, सचिन जोगदंड, अमोल रासकर, शशिकांत पापळ,महेश कदम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शशिकांत तापकीर, पुणे शहर महिला अध्यक्ष मृणाल वाणी, सचिन पासलकर, सचिन अण्णा तावरे, सोनाली उजागरे, विजू पवार, सौरभ माने, तेजस मिसाळ, विद्या कळेकर आदी सहभागी झाले होते.

ज्येष्ठ नागरिकांतर्फे
रवींद्र धंगेकरांचा प्रचार सुरु

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करण्याचे पुणे शहर काँग्रेस जेष्ठ नागरिक संघातर्फे बैठकीत एकमताने ठरवण्यात आले. त्यानुसार संघटनेचे २००० हुन अधिक जेष्ठ नागरिक घरोघरी प्रचार पत्रके वाटायचे व रवींद्र धंगेकरांना निवडून आणण्याचे आवाहन करीत आहेत. संघटनेचे अध्यक्ष द.स. पोळेकर यांच्या पुढाकाराने ही प्रचार मोहीम सुरु झाली आहे. संघटनेचे कायदा सल्लागार बाळासाहेब बाणखेळे यांनी प्रचाराची रुपरेखा आखली असून या संदर्भात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख माजी आमदार मोहन जोशी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, रवींद्र धंगेकर यांचा पिंड कार्यकर्त्याचा आहे. ते जनतेचे नेते आहेत त्यांना मत म्हणजे पुण्याच्या विकासाला मत हे घरोघरी जाऊन सांगावे असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...