ज्या माणसाने घरातल्या मंगळसुत्राची प्रतिष्ठा ठेवली नाही , त्याने १० वर्षात देशभरातील मंगळसूत्रे धोक्यात आणली ..तो इतरांवर खोटे आरोप करतोय …
मोदी- शहा वर घणाघाती टीकास्त्र
सासवड :भारतीय जनता पक्षाला विकास जन्माला घालता आला नाही. म्हणून त्यांनी आधी ठाण्याचा नवरा केला, त्यानंतर नांदेडचा नवरा केला, आता बारामतीचा ही नवरा केला. मात्र, तरीही भाजपला विकास जन्माला घालता आला नसल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अजित पवार बारामतीचा विकास केला असल्याचा दावा करत आहेत. मात्र, शरद पवार यांना बारामती ते सर्व निर्माण केले नसते तर तुम्ही आजही राजदूत मोटर सायकल वरून दूध विकत बसला असता, अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे याच विजयी होतील असा दावा देखील संजय राऊत यांनी केला. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका महिन्यामध्ये 27 वेळा महाराष्ट्रात आले आहेत. कारण त्यांना महाराष्ट्राची भीती वाटत आहे. महाराष्ट्र दिल्ली उठवून टाकेल, अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. पंतप्रधान गेल्या दहा वर्षापासून रोज खोटे बोलत असल्याचे देखील ते म्हणाले. खोटे बोलणारा पंतप्रधान देशाने पहिल्यांदीच पाहिला असल्याचे देखील त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील पक्ष फोडायचे आणि लुट गुजरात न्यायची, हा उद्योग नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सुरू केला असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मी शिवसेना फडणवीस गट म्हणतो. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीस गट म्हणतो, अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे. त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील दोन पक्ष सोडले. मात्र, त्यामुळे काय वाकड झाले? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे अस्तित्व आजही कायम असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.