पवार कुटुंबीयांच्या मतभेदामुळे दु:खी–पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही केले कौतुक
अबकी बार 400 पार अशक्य आहे. उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी लोकांमध्ये सहानभूती आहे असे खळबळजनक विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. तसेच एनडीएचा मार्गही यंदा फार कठीण असून बारामतीमध्ये होणारी लढत दुर्दैवी असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे. छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळ बोलत होते.
यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ”2014 आणि 2019 सारखा भाजपचा मार्ग आता सहज सोपा राहिलेला नाही. त्यांनी दावा केलाय की, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाचे नेते शरद पवार या दोघांचे पक्ष फुटले आहेत. त्यामुळे त्यांच्या बाजूने लोकांची सहानुभूती आहे, ज्याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे. भुजबळ असंही म्हणाले की, एनडीएचा मार्गही यंदा फार कठीण आहे”, असे भुजबळ म्हणालेछगन भुजबळांनी बारामतीतील पवार कुटुंबीयांच्या लढतीवरही ही लढत दुर्दैवी असल्याचे म्हंटले आहे. ते म्हणाले की, ”माझ्यासाठी हा थोडा भावूक क्षण आहे. जे कुटुंबीय मागची इतकी वर्षे एकत्र लढले ते आता वेगळे झाले आहेत. आता जे सुरू आहे ते काही लोकांना अजिबात आवडलेलं नाही. चूक कोणाची आहे, ती गोष्ट वेगळी परंतु हे जे आता सुरू आहे ते नसते झाले तर बरे झाले असते”, अशी खंत भुजबळ यांनी बोलून दाखवली.याशिवाय ”नाशिकबाबत देखील भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ”भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच माझे नाव नाशिकसाठी सुचवले होते. त्याप्रमाणे मी मनाची तयारी केली होती. पण इतर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होत असताना नाशिकचा निर्णय मात्र होत नव्हता. त्यामुळे मी अखेर माघार घेतली. कारण मी उमेदवारीसाठी रडत बसणारा नाही. मी महानगरपालिकेसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पहिल्यांदा उमेदवारी मागितली होती. त्यानंतर माझ्यावर कधीही निवडणुकीची उमेदवारी मागण्याची वेळ आली नाही. त्यामुळे या पातळीवर येणं, मला पसंत नव्हतं, म्हणून मी माघार घेतली” असे छगन भुजबळ म्हणाले.यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले आहे. ते म्हणाले, ”पतंप्रधान मोदींच्या क्षमतेवर लोकांना विश्वास आहे आणि लोकांना असं वाटतं की, त्यांनी तिसऱ्यांदा भारताचं नेतृत्व करावे. त्यामुळे मतदार यावेळीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तिसऱ्यांदा एक मजबूत सरकार निवडून आणतील”, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला.