मंचर/पुणे: खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर डॉ. कोल्हे यांनी मोहितेंचा जोरदार समाचार घेतला. दिलीप मोहिते पाटील यांच्या वक्तव्याचे आश्चर्य वाटते अस म्हणत कोल्हे यांनी गद्दार कोणाला म्हणतात हे उदाहरणांसह सांगितले.
अवसरी मध्ये आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या मेळाव्यात डॉ. कोल्हे बोलते होते. यावेळी देवदत्त निकम, सुरेश भोर, राजू इनामदार, आलू इनामदार, दिलीप पवळे, दत्ता गांजाळे, शेखर पाचुंदकर, राजाराम बाणखेले, नितीन भालेराव आदी यावेळी उपस्थित होते.
खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी केलेल्या वक्तव्याचे सखेद आश्चर्य वाटते अस म्हणत डॉ. कोल्हे म्हणाले, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करून त्याच्या ताटात माती कलविण्याचे जे पाप भाजपने केलं त्याला गद्दारी म्हणतात. भाजपच्या बेरोजगारी वाढविण्याला गद्दारी म्हणतात. पेट्रोल शंभर च्या पार व गॅस हजाराच्या पार जातो त्याला गद्दारी म्हणतात.
ही गद्दारी उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही केवळ स्वार्थासाठी आणि आपल्यावर होण्याऱ्या कारवाय पासून वाचण्यासाठी त्यांच्याच मांडीवर बसून त्यांचीच पालखी वाहायची याला महा गद्दारी म्हणतात, असं सांगत मोहिते पाटलांना चांगलीच चपराक लगावली.
इतिहासातील हंबीरराव मोहिते खंबीर होते पण हे?
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे उदाहरण देत डॉ. कोल्हे म्हणाले की, आणि म्हणूनच खेद वाटतो की सगळे उघड्या डोळ्याने दिसत असतानाही असा आरोप करावा लागतो त्यामुळे असं वाटतं की नक्कीच काहीतरी कमप्लशन असेलआणि कमप्लशन नसेल तर कुठल्या तरी करवाई पासून वाचण्यासाठी असा महा गद्दारीचा आरोप करण्याची लाचारी वाघासारख्या नेतृत्वाने करू नये, असा ही टोला डॉ. कोल्हे यांनी लगावला.
अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली बूथ काबीज होण्याची भीती
कार्यकर्त्यांना केलं सतर्क राहण्याचे आवाहन
यंदाची निवडणूक ही फक्त आपल्या शिरुर मतदारसंघापुरती मर्यादित नाही तर ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निर्णयाक ठरणारी निवडणूक आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती याच बरोबर लोकशाही वाचवण्यासाठी महत्वाची निवडणूक आहे. आणि म्हणूनच प्रत्येक बूथ आपल्यासाठी महत्वाचा आहे. विरोधकांकडून बूथ काबीज करण्याचे प्रकार घडू शकतात, त्यामुळे आपण सतर्क राहायला हवं, असं आवाहन महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना केलं.डॉ. कोल्हे पुढे म्हणाले की, आपल्याला प्रत्येक बूथ महत्वाचा आहे. प्रत्येक बूथ वर मताधिक्य मिळणे गरजेचे आहे. आपल्याकडे मोठे नेते नाहीत. पैश्यांची ताकद नाही. पण जनतेची ताकद आहे. ऐनवेळी बूथ काबीज केला जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. बूथ वर गैर प्रकार होण्याच्या शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे डोळ्यात तेल घालून जागरूक रहा, अस सांगत अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना सतर्क केलं.
जशी पाच वर्ष वयाच्या व वीस वर्ष वयाच्या पहिलवानांमध्ये कुस्ती लावली जात नाही
तशीच पाच वर्षाचा जनसंपर्क व वीस वर्षांचा जनसंपर्क यातही फरक असणारच ना असा सवाल करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वीस वर्षांचा कामाचा बुरखा फाडला.५ वर्षाच्या माझ्या कार्यकाला पेक्षा त्यांचा जनसंपर्क लई भारी एवढेच ते सांगत सुटतात पण खासदार ज्यासाठी संसदेत निवडून पाठवतात त्याची तुलना केली तर माझी अवघ्या ५ वर्षाची कामगिरी तुमच्या १५ वर्षापेक्षा लई भारी हे नाही सांगत … असा टोला कोल्हे यांनी लगावला .