सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित तमाशा महोत्सवाचे नियोजन आणि त्याची “फलनिष्पती”

Date:

सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दि 26मार्च ते 31मार्च 2024 या दरम्यान नवी मुंबईतील जुईनगर नाट्यगृहात सहा दिवस आयोजित केलेल्या “ढोलकी तमाशा महोत्सवा”मध्ये हलगी -ढोलकीचा जुगलबंदी बघायला मिळाली. पारंपारिक गण, गवळण, बतावणी, रंगबाजी, शृंगाराच्या लावण्या, सवाल -जवाब, शिलकार,फार्सा, वगनाट्य, आणि शेवटीची भैरवी सुद्धा भरगच्च गर्दीने भरलेल्या नाट्यगृहातील कला रसिकांना ऐकायला मिळाली.याचा अर्थ महाराष्ट्राची लोक संस्कृती किती विशाल आणि समृद्ध आहे. हे यातून स्पष्ट होतेय.

सन 2006पासून सांस्कृतिक कार्य संचालनालयाने सुरू केलेल्या तमाशा महोत्सवाची परंपरा अजून ही कायम राहिली आहे. कुठेही त्यात खंड पडला नाही. पण यावर्षाच्या ढोलकी तमाशा महोत्सवाचे वैशिष्ट्य वेगळे होते.सहा ही दिवस सादरीकरण करणाऱ्या तमाशा मंडळाने अगदी पारंपारिक पद्धतीने नवी मुंबईच्या रसिकांसमोर तमाशाचे सादरीकरण केले. हळीची गवळण. तक्रारीची गवळण, विनवनीची गवळण, सुटकेची गवळण, अगदी अध्यात्मिक रसातील गवळण अशा विविध प्रकारच्या गवळणी ऐकायला मिळाल्या, त्याला चक्क टाळ्या वाजवून लोकांनी दाद दिली.
हलगी -ढोलकीची जुगलबंदी, जणू काय पहिल्यांदाच आपण पाहतोय, या आनंदात टाळ्या आणि शिट्ट्याचा नाद ही ह्या वाद्याबरोबर नाट्यगृहात घुमू लागला होता.
बतावणी रंगबाजी या बरोबर शृंगाराच्या लावण्याचे जोरदार सादरीकरण झाले.काही तमाशात अगदी जुन्या काळातील लावण्या सादर केल्या.अन तेथे बसलेल्या अनेक जेष्ठ कला रसिकांना आपला तरुणपणाचा काळ आठवला.
तमाशा हा उन्नती रंजक, विचार आणि संस्कार या प्रेरणेतून उदयाला आलेली कला आहे.त्यामुळे सहा दिवस सुरू असलेला महोत्सव सुद्धा शासननाने त्याच उद्देशाने आयोजित केला असावा.असे वाटते.
समाज भेद, धर्म भेद, वंशभेद, वर्णन भेद यावर वगनाट्यातून समाज प्रबोधन केले. एकेकाळी अंधश्रद्धा, जुन्या रूढी चालीरीती याचा लोकांवर फार प्रभाव होता. त्या काळात तमाशा कलावंतांनी वग नाट्यातून समाजाचे प्रबोधन केले. आता वेळेअभावी तशी वगनाट्य सादर होत नाहीत. त्यामुळे अनेक तमाशा कलावंतांनी आपल्या रंगबाजीत काही मिनिटांचे ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक विषयावर “टायटल”दाखविण्यास सुरू केले आहे. जसे की, कै. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांच्या पहिल्या कार्यक्रमाने या महोत्सवाचा शुभारंभ झाला. या तमाशातील कलाकारांनी जुन्या तमाशाचा बाजा बरोबरच आपल्या रंगबाजीत छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भावनिक भेट दाखविली. हे दृष्य लोकांच्या काळजाला भिडले.शूरवीर तान्हाजी मालुसरे यांचा उत्तम अभिनय दाखविला. विनोद अवसरीकर, बुढन व्यापारी, रोहिदास पाठारे यांच्यासारखे मुरलेले कलावंत रंगमंचावर आले की, प्रेक्षक जोरदार टाळ्या वाजवून कलाकारांना प्रोत्साहन दयायचे.
शांताबाई संक्रापूरकर सह शाहिर संभाजी जाधव, अहमदनगर यांनी पारंपारिक आणि जुन्या बाजाच्या लावण्या सादर केल्या, स्वतःहा शाहिर संभाजी जाधव गणाला उभे राहिले होते. त्यांचा पहाडी आवाज लोकांच्या पसंती पडला होता.
सुनंदा कोचुरे धुळेकर, चि. शुभम कुमार धुळेकर या लोकनाट्य तमाशा मंडळाने तर खान्देशी ढोलावर खान्देशी गण, खान्देशी हळीची गवळण, त्याच बोली भाषेत टाकण, फार्सा सादर केला, अहिराणी भाषेत अनेक गीतं गायली.या वेगळ्या लोक कला प्रकाराला सुद्धा या शहरी भागातील लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
ढोलकी, हलगी,तुणतुणं, टाळ आणि हार्मोनियम अर्थात पारंपारिक पाय पेटी जी आता दुर्मिळ गोष्ट झालेली आहे.या वाद्यावर महादेव मनवकर (कराड ) यांनी रसिकांची मनं जिंकली. कुठेही आधुनिक वाद्य रंगमंचावर न ठेवता, या पारंपारीक वाद्यावर त्यांनी कला रसिकांच्या टाळ्या मिळविल्या,
चक्क कृष्ण आणि मावशी यांच्या संवादाला (सांधा)मनमुराद दाद देणारा प्रेक्षक पहिल्यादा दिसला.सरदार शंकरराव भुयाजीवाडीकर यांनी आपल्या गायनातून रसिकांना मंत्रमुग्ध केले.त्यांच्या सुरात लय होता.ताल होता.शास्त्रशुद्ध आवाजाचा कलाकारच ते जाणवत होते.

हळीची गवळण, तक्राराची गवळण, विनवनीची गवळण, सुटकेची गवळण, अशा विविध कला प्रकारच्या गवळणी त्यांनी सादर केल्या. सवाल जवाब, लावण्या, खांडगी त्याला काही भागात कड्या टाकणे म्हणतात. पोवाडा, शिलकार, झिल, वग असा सर्व कला प्रकार मनवकर यांनी पारंपारिक पद्धतीने सादर केला.यावेळी तमाशाला उपस्थित असलेले लोककलेचे अभ्यासक प्रा.डॉ. प्रकाश खांडगे यांनी तर आपल्या भाषणात मनवकर यांचा तमाशा हा “वास्तूपाठ”आहे.अशी प्रतिक्रिया दिली.
समाज प्रबोधनाची प्रेरणा घेवून जन्मास आलेल्या तमाशाला आधुनिक काळात नृत्य, संगीत, गायन, वादन आदी कलागुणांची जोड मिळाल्याने ही लोककला विकसित झाली. भक्ती, प्रबोधन आणि रंजन या तीन सूत्रांनी तमाशा रंगत असतो.असाच या महोत्सवात उषा खोमणे सह अर्चना पुणेकर (संभाजी नगर ) यांनी तमाशा जोरदार सादर केला
गण गौळण लावणी यांच्या सादरीकरणात वाद्याची उत्तम साद होती. ढोलकी जोरदार कडाडत होती. आपल्या लहान वयात आपल्याच तमाशात उत्तम सोगाड्या म्हणून काम करणारा, वडिलांसोबत रंगबाजीत जुगलबंदी करणारा, अन आज चंदेरी दुनियेत रमणारा,आघाडीचा गायक म्हणून आपले अस्तित्व निर्माण करणारा रविंद्र खोमणे याने आपल्या आईच्या तमाशाला वेळात वेळ काढून हजेरी लावून कला रसिकांच्या टाळ्या मिळविल्या. म्हणजेच पारंपारिक तमाशाला आधुनिकतेची जोड देणारा हा तमाशा कला रसिकांच्या पसंती पडला होता.उषाबाईनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला.”माझी मैना गावाकडं राहिली”…! हे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचं गाणं गावून एका कलाकाराने लोकांमध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जागृत केली.एका नृत्यगांने तर थेट रंगमंचवरून खाली उतरून या लोककलेचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या एका गृहणीच्या हाताला धरून लावणीचा ठेका धरायला लावला.येवढे समरस सहा ही दिवस तमाशा कलाकारांनी प्रेक्षकांना करुन घेतले होते.
“तमाशा महोत्सवाची”सांगता अगदी दणक्यात झाली. रविवार असल्यामुळे सभागृहात हाऊस फुल्ल झाले होते. प्रेक्षक खाली बसले होते. काहींनी उभे राहून तमाशाचा आनंद घेतला.
वडिलांपासून गेली पन्नास वर्षाची परंपरा असलेल्या मास्टर सुनिल वाडेकर यांच्या सोनाली-गजरा लोकनाट्य तमाशा मंडळाने पारंपारिक तमाशा सादर केला.
गण गवळण, बतावणी,रंगबाजी, यावर कला रसिकांनी मनमुराद दाद दिली.म्हणीमध्ये सरदार प्रभाकर सिंदेवाडीकर यांनी साळू सादर करू जुन्या बाजाची आठवण करून दिली. वाद्येही पारंपरिक वापरण्यात आली होती . एक ही नवीन आधुनिक वाद्ये नव्हते,हलगी ,पाय पेटी ,ढोलकी, या नादाने सभागृह डोलू लागले होते. विशेषतः हलगी वाजविणारे वसंतराव वाडेकर हे या तमाशाचे फड मालक सुनिल वाडेकर यांचे वडील होते. सुनिल वाडेकर यांच्या ढोलकी वादनाने प्रेक्षकांची मने जिंकली, सोनाली कुडाळकर आणि पाटणकर या नृत्यागंनानी सुंदर अशा लावण्या सादर केल्या. त्यांचे सादरीकरण उत्तम होते,
तमाशा महोत्सवाची सांगता, यांच्या सादरीकरणामुळे ठसक्यात आणि दणक्यात झाली . टाळ्या शिट्ट्याचा नेहमी प्रमाणे वर्षाव झाला. सहा ही दिवस या महोत्सवाला महिलांचा प्रतिसाद मोठा होता. यावर्षीच्या तमाशा महोत्सवात दाद देण्यास शहरी कला रसिकांनी कुठेही हात आखडता घेतला नाही. त्यामुळे तमाशा हेच रंजनासोबत उदबोधनाचे प्रभावी माध्यम आहे.खऱ्या अर्थाने ही कला जनसामान्यावर अधिराज्य गाजविणारी कला आहे, असे लोककला अभ्यासकांचे योग्य मत आहे.तमाशाला लिखित संहिता नसते.त्यातील संवाद व कृती बव्हंशी उत्स्फूर्त असते. संवाद मौखिक पंरपरेतून आलेले असतात. संवाद कल्पनेने आठवून म्हटले जातात. ही कला आता काळाच्या ओघात लोप पावत चाललेली आहे. याला खऱ्या अर्थाने जतन आणि जोपसण्याची गरज आहे.
आतापर्यंत राज्य सरकारने अभिजात कला आणि ग्रामीण कला यामध्ये सतत भिन्नता निर्माण केली आहे.हे वारंवार निर्दशनास आले आहे.. गाव कुसा बाहेरच्या कलेला सन्मान मिळत नव्हता. परंतु यावर्षीच्या तमाशा आणि लावणी महोत्सवाचे आयोजन करताना सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती. दोन्ही महोत्सवाचे नियोजन उत्कृष्ट होते.
नवीमुंबई येथील जुईनगरमध्ये घेतलेल्या तमाशा महोत्सवात नाट्यगृहाला आकर्षण रंगीबेरंगी साजवट करण्यात आली होती. सुंदर असा रंगमंच सजवला होता. नाट्यगृहाच्या गेटवर तमाशा कलावंतांचे चित्र असलेले सेल्फीपॉईंट उभा करण्यात आला होता.
विशेष म्हणजे सहा ही दिवस लोककलावंतांना जेवण आणि अल्पपोहार, चहा पानाची उत्तम व्यवस्था संचालनालयाकडून करण्यात आली होती. या सर्व नियोजनासाठी कार्यक्रम अधिकारी संदिप बलखंडे आणि निलेश धुमाळ यांनी प्रचंड मेहनत घेतली. या दोघांचे कौतुक करावे. तेवढे कमी आहे.
पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यत संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवी मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी महिंद्र कोंडे यांनी आपल्या विनयशील वाणीतून केले. मच्छिद्र पाटील यांनी सुद्धा या काळात लोककलावंतांना स्थानिकदृष्ट्या प्रामाणिकपणे भरपूर सहकार्य केले.
या तमाशा महोत्सवाला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून या महोत्सवाची रंगत वाढविली.सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव बाळासाहेब सावंत, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सह संचालक श्रीराम पांडे, लोककलेचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड, सह प्रा. डॉ. शिवाजी वाघमारे यांची उपस्थिती होतीच, पण यांच्या सहकार्याने या तमाशा महोत्सवाला एक नवीन ऊर्जा मिळाली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्या देखरेखीखाली तमाशा आणि लावणी महोत्सवाचे नियोजन उत्तमच झाले, मात्र या दोन्ही महोत्सवाला आपल्या कार्यबाहुल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्या अनुपस्थितीची यामुळे उणीव भासत होती.
खरं तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाने यावर्षीचा तमाशा आणि लावणी महोत्सव खूप घाई घाईत उरकून घेतला. जणू काय एखादी “लगीन घाई”च सुरू होती. त्यामुळे कलाकारांना तालीम करायला अपूर्ण वेळ मिळाला. वगनाट्याची पूर्ण तालीम यामुळे कलाकारांना करतात आली नाही. सहा ही दिवस अनेक रंगबाजीतील सांधे सारखेच वाटत होते. त्यामुळे रोज येणार रसिका वर्ग एकच सांधा ऐकून कंटाळत होता. यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या पुढे दोन्ही महोत्सवात तोच तोच सारखेपणा येणार नाही. यासाठी प्रत्येक कला पथकाकडून कार्यक्रमाचे नियोजन करून घेतले पाहिजे.त्यामुळे तोच तोच पणा येणार नाही.ही कला जुन्याकडून नव्याकडे देण्यासाठी शासनाचे योग्य पद्धतीने प्रोत्साहन दिले पाहिजे. तर ही कला टिकून राहील.
निश्चितच या तमाशा महोत्सवामुळे जुन्या तमाशाचा बाज कला रसिकांना बघायला मिळाला. या कलेची परंपरा कळाली. ही कला अशीच यापुढे जतन ठेवायची असेल तर शासनाचे सहकार्य असलेच पाहिजे.याबद्दल शंका नाही.
या गावकुसा बाहेरच्या तमाशा कलेला शासनाने एका परिसंवादाच्या माध्यमातून विद्वता ही प्राप्त करून दिली. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत आधुनिक तमाशाची जडण घडण या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये हे निश्चित झाले की, तमाशाने आपले मूळ स्वरूप बदलेले नाही.

खंडूराज गायकवाड

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक करण्याचे राजकीय पक्षांना आवाहन

पुणे, दि. २४ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार...

‘बनो मिस आत्मनिर्भर इन्व्हेस्टर’ हे गीत सादर

सीडीएसएल आयपीएफकडून महिलांना त्यांचा गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता सई गोडबोले यांच्या आवाजात  मुंबई, 23 जून 2026: सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड (आयपीएफ) ने आपल्या सुरू असलेल्या ‘आत्मनिर्भर’ (AtmanirbHER) उपक्रमांतर्गत लोकप्रिय गायिका, अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर सई गोडबोले यांच्या आवाजातील ‘बनो मिस आत्मनिर्भर इन्व्हेस्टर’ हे नवीन गुंतवणूकदार जनजागृती गीत सादर केले आहे. हे गीत महिलांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये सहभागी होण्यासाठी पहिले पाऊल उचलण्यास आणि आत्मविश्वासपूर्ण, माहितीपूर्ण तसेच स्वावलंबी, आत्मनिर्भर गुंतवणूकदार बनण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. हे गीत एका आकर्षक दृकश्राव्य चित्रफितीद्वारे साकारण्यात आले असून, त्यामध्ये एका महिलेच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे उलगडण्यात आले आहेत. पहिली नोकरी सुरू करण्यापासून नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यापर्यंत आणि स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याच्या प्रवासापर्यंतचा हा प्रवास दाखवताना प्रत्येक महत्त्वपूर्ण यशाची सुरुवात संकोचावर मात करून पहिले पाऊल उचलण्यापासूनच होते हा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. गुंतवणुकीच्या प्रवासाशी समांतर चालत ही चित्रफीत महिलांना संशोधन, नियोजन आणि माहितीपूर्ण निर्णयांच्या आधारावर त्याच आत्मविश्वासाने गुंतवणुकीकडे पाहण्यास प्रोत्साहित करते. संपत्ती निर्माण करणारी, भविष्य घडवणारी आणि ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी व्यक्ती बनण्याचा संदेश देत हे गीत महिलांना त्यांच्या आर्थिक भवितव्याची जबाबदारी स्वीकारण्यास आणि आत्मनिर्भर गुंतवणूकदार बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करण्यासाठी प्रेरित करते. आज भारतातील जवळपास प्रत्येक चार गुंतवणूकदारांपैकी एक महिला आहे. देशातील गुंतवणूक क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग यातून दिसून येतो. कार्यक्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग आणि समाजातील त्यांची विकसित होत असलेली भूमिका लक्षात घेता अधिकाधिक महिला त्यांच्या आर्थिक निर्णयांवर स्वतःचे नियंत्रण प्रस्थापित करत आहेत. यामुळे भारतातील गुंतवणूकदारांच्या लोकसंख्याशास्त्रीय स्वरूपातही लक्षणीय बदल घडून येत आहे. सई गोडबोले यांचा वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि सहज आपलेसे वाटणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून हे गीत विविध वयोगटांतील महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना आत्मविश्वास, जागरूकता तसेच माहितीपूर्ण निर्णयक्षमतेसह गुंतवणुकीकडे वळण्यासाठी प्रेरित करते. अलीकडील वर्षांमध्ये गुंतवणुकीमधील महिलांचा सहभाग सातत्याने वाढला असला तरी या सहभागाला आणखी चालना देण्याची मोठी संधी अद्याप उपलब्ध आहे. जागरूकता, आत्मविश्वास, गुंतवणूक उत्पादनांविषयीची समज आणि विश्वासार्ह माहितीची उपलब्धता हे घटक सिक्युरिटीज मार्केटमधील माहितीपूर्ण सहभागासाठी आजही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या उपक्रमाविषयी बोलताना सीडीएसएल आयपीएफ सचिवालय प्रमुख श्री. सुधीश पिल्लई म्हणाले, “‘बनो मिस आत्मनिर्भर इन्व्हेस्टर’ हे गीत एका साध्या पण प्रभावी संदेशावर आधारित आहे. प्रत्येक अर्थपूर्ण प्रवासाची सुरुवात पहिलं पाऊल उचलण्यापासून होते. या उपक्रमाद्वारे आम्हाला अधिकाधिक महिलांना गुंतवणुकीच्या दिशेने ते पहिले पाऊल उचलण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे, ज्ञानाच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास वाढवायचा आहे आणि त्यांना माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम करायचे आहे. महिला त्यांच्या आर्थिक भवितव्याची जबाबदारी अधिकाधिक प्रमाणात स्वीकारत असताना, त्या केवळ स्वतःच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेलाच बळकटी देत नाहीत, तर अधिक सर्वसमावेशक आणि सक्षम गुंतवणूक परिसंस्था उभारण्यातही महत्त्वपूर्ण योगदान देतात.” सीडीएसएल आयपीएफ विविध समाज घटकांमध्ये आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूकदार जागरूकता वाढविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. ‘आत्मनिर्भर’ (AtmanirbHER) हा उपक्रम विविध पार्श्वभूमीतील महिलांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये जबाबदारीने सहभागी होण्यासाठी आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. जाहिरात मोहिमेतील फिल्म पाहण्यासाठी लिंक: YouTube: https://www.youtube.com/watch?v=6hpots_dUR8 Instagram: https://www.instagram.com/reel/DZ1oTUkjX8e

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम 37 (1) व (3) आदेश जारी

पुणे: पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शांतता व...