प्रकाश आंबेडकरांना अटक करायला हवी; मनोज जरांगे आहेत कोण? त्यांना ओळखत नाही:नारायण राणे पहा नेमके काय म्हणाले

Date:

पुणे- 3 डिसेंबरनंतर राज्यात दंगलीची मोठी शक्यता असल्याचा दावा वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यावर प्रकाश आंबेडकरांना अटक करुन त्यांची चौकशी करायला हवी, असे मत भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले. दरम्यान लगेचच नंतर प्रकाश आंबेडकरांना अटक करावी असे तुमचे मत आहे काय ?असा प्रश्न राणेंना केला असता , मी कुठे म्हणालो क्राईम झाला असेल तर करावं… असेही ते म्हणाले . मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला 24 डिसेंबरचा अल्टीमेटम दिला आहे. त्यावर मनोज जरांगे आहेत कोण? मराठा आरक्षणावर त्यांचा अभ्यास काय?, असेही नारायण राणेंनी सुनावले.

केंद्राच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी भाजप देशव्यापी “विकसित भारत संकल्प यात्रा” राबवत आहे. आज पुण्यात ही यात्रा काढण्यात आली. त्यानिमित्त नारायण राणेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील विविध घडामोडींवर नारायण राणेंनी आपली मते व्यक्त केली.

दंगलीचा आधार काय?

प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर नारायण राणे म्हणाले, प्रकाश आंबेडकरांवर FIR दाखल करुन त्यांना अटक करायला हवी. दंगलीसारख्या महत्त्वाच्या घटनांबाबत कुणी माहिती लपवत असेल तर तो गुन्हा आहे. दंगलीचा आधार काय? हे त्यांनी सांगायला हवे. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याची दखल पोलिसांनी घ्यायला पाहीजे. ते कोणत्या माहितीच्या आधारावर हे बोलत आहे, याचा तपास पोलिसांनी करायला हवा. राज्यात दंगल घडू नये, यासाठीची ही खबरदारी बाळगायला हवी.

प्रकाश आंबेडकर राजकीयदृष्ट्या संपलेले

पुढे प्रकाश आंबेडकरांवर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, राजकीय दृष्ट्या संपलेले लोक आता का बोलत आहेत, समजत नाही. त्यांनी घरात बसावे. राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. तीन डिसेंबरनंतर राज्यात दंगलीची मोठी शक्यता आहे. पोलिस ठाण्यांना सतर्कतेची सूचनाही देण्यात आली आहे. चार राज्यांतील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर काहीही होऊ शकते, असे प्रकाश आंबेडकर मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

मनोज जरांगेंचा अभ्यास काय?

मनोज जरांगेंच्या अल्टीमेटमवर नारायण राणे म्हणाले, कोण आहेत मनोज जरांगे? मला माहिती नाही. मराठा आरक्षणावर त्यांचा अभ्यास काय? घटनेच्या कुठल्या कलमाने आरक्षण देता येते, हे त्यांना सांगता येते का पाहा. मराठा आरक्षणाबाबत प्रत्येक नेत्याची भूमिका ही वेगवेगळी आहे. कुणाचेही आरक्षण न काढता 52 टक्क्यांच्यावर आरक्षणाची मर्यादा नेत मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही आमची भूमिका आहे. यासाठी मागास आयोगाला मराठा समाजाचा सर्व्हे करावा लागणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...