पुणे- भाजपचे राष्ट्रीय नेते विकास करायला नाही शरद पवारांना हरविण्यासाठी बारामतीत येतात , त्यांना हरविण्याच्या वल्गनाही करतात ,पण त्यांच्या भाजपमध्ये उमेदवार नव्हताच म्हणून त्यांनी पवारांचेच घर फोडले, मोठी वाहिनी आई समान असते ,त्यांनाच त्यांनी रणांगणात आणले यातून त्यांची नीती समजते असे खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे म्हटले आहे.केजरीवाल प्रकरणी बोलताना त्या म्हणाल्या , स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कितीतरी लोकांनी बलिदान दिलेले आहे. स्वातंत्र्याने मिळालेली लोकशाही हटवून आता दडप शाही लादण्याचा प्रयत्न होणार असेल तर कितीही किंमत द्यावी लागली तरी तो आम्ही हाणून पाडू. त्या म्हणाल्या,’माझी लढाई भाजपाच्या विचारा विरोधी , सुनेत्रा वाहिनी किंवा व्यक्ती विरोधात नाही , महागाई, बेरोजगारी ,पाण्याचे प्रश्न पर्येक कुत्म्बाच्या ,शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणे आणि प्रत्येकाची प्रगती व्हावी यासाठी विकासाच्या दृष्टीने वाटचाल राहावी म्हणून माझी लढाई आहे , माझ्यावर आज पर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही , मेरिटवर लोकांनी माझा विचार करावा