देशात पुन्हा वैदिक परंपरा सुरू करण्याचा प्रयत्न -प्रकाश आंबेडकर

Date:

येथे जातीय दंगली कधीही आणि केव्हाही …प्रकाश आंबेडकर यांनी केले अलर्ट

पुणे-ज्यांनी ब्रिटीश काळात धार्मिक आणि सामाजिक स्वातंत्र्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी लढा दिला. तेव्हा धार्मिक स्तंवात्र्यासाठी लढणाऱ्यानी सामाजिक स्वातंत्र्यासाठी जे लढले त्यांना ब्रिटीशांचे हस्तक ठरवले आज पुन्हा तीच परिस्थिती दिसते ,ज्यांनी त्यावेळेस धार्मिक हस्तक्षेप होतोय आणि आमच्या वैदिक धर्मावर आघात होतोय असा कांगावा केला होता त्यांनीच आता नवा कांगावा सुरु केला आहे ,कि या देशात हिंदूंचे राज्य असूनही या देशाला हिंदूंचे राष्ट्र असे संबोधित करावे असा लढा चाललेला आहे मी दुर्दैवाने असे म्हणेन या लढ्याचे गांभीर्य लोकांसमोर आलेले नाही ,आणि पुन्हा वैदिक परंपरा या देशात सुरु व्हावी यावरती संविधानावर बदलणार अशी घोषणा आहे , संघ ,हिंदू परिषद बोलत नाही ,पण फडणवीस हेच म्हणतात आम्ही संविधान बदलणार नाही , आमचे आवाहन आहे हेच

जोपर्यंत आरआरएसचे प्रमुख मोहन भागवत हे जोपर्यंत अस वक्तव्य करत नाही, तोवर आम्ही हे मान्य करणार नाही, असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी येथे जातीय दंगली कधीही आणि केव्हाही होऊ शकतात राज्यात अनेक ठिकाणी 3 डिसेंबरनंतर दंगलींची शक्यता आहे. सगळ्या पोलिस स्टेशन्सला तसा अलर्ट आला आहे,असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तर 6 डिसेंबरनंतर काहीही होऊ शकते अशी पोलिसांना सूचना आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.सध्या देशात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मिझोरम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक चालू आहेत. या सर्व राज्यांच्या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. या निवडणुकींच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी हे मोठं वक्तव्य केलं होतं.

दरम्यान प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनला सतर्क करण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत 6 डिसेंबरनंतर काहीही घडू शकते. तर देशात मुस्लिमांना आणि ओबीसींना टार्गेट केले जात आहे. असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील महात्मा फुलेवाड्यात अभिवादन केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत असताना केला आहे देशातलं वातावरण अस्थिर असून दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा त्यांनी अलिकडच्या काही महिन्यांमध्ये अनेकदा केला आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, येत्या सहा डिसेंबरनंतर म्हणजेच महापरिनिर्वाण दिनानंतर देशात काहीही घडू शकतं. हवं तर तुम्ही कोणत्याही पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी करा, कारण तशा पद्धतीच्या सूचना पोलिसांना मिळाल्या आहेत.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, चार राज्याच्या निवडणूका झाल्यानंतर घडेल. मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण टार्गेट केले जात आहे. समाजात अशांतता पसरवली जाते आहे. आंदोलनाशी संबंध नसलेल्यांचा वापर केला जात आहे.राज्यात आरक्षणाच्या नावाखाली समाजासमाजाला एकमेकांविरोधात लढवले जात आहे. ते थांबण्याएवजी त्याला खतपाणी घातले जाते असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर भाष्य केलं. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्वाचं विधान केलं. आता परत मला इतिहास सांगयची गरज नाही. मंडल आयोगाबाबतचा इतिहास पाहा तुम्हाला कळेल. छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो. न्यायालयात पलटवार मीच केला. त्यांनी त्याबाबत कधी माझे आभार मांडले नाहीत. मला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. जरा इतिहास सुधारून घ्या. मग कळेल… ओबीसीचा लढ्याचा जनक मी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...