मुंबई-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याच्या आंतरवाली सराटीत नव्याने आमरण उपोषण केले आहे. त्यांनी आरक्षणासंबंधी सरकारने जारी केलेल्या सगेसोयरेच्या अधिसूचनेची विशेष अधिवेशन बोलावून तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार, राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव येणे अपेक्षित होते. पण त्यात असा कोणताही प्रस्ताव आला नसल्यामुळे मराठा आरक्षणासंबंधी सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता धूसर झाली आहे.आंतर्वली सराटी त ..उपचार घ्या च्या घोषणातही …. जरांगे उपोषण सोडणार नाही या हट्टाला पेटल्याने त्यांची प्रकृतीही खालावते आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विविध विभागांचे महत्त्वपूर्ण प्रस्ताव हातावेगळे करण्यात आले. पण सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मुद्यावर या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. सुरुवातीला सरकार या बैठकीद्वारे विशेष अधिवेशन बोलावण्याचा एखादा निर्णय घेईल असा दावा केला जात होता. पण असा कोणताही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या अजेंड्यावर आला नसल्यामुळे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांसह त्यांच्या सहकाऱ्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिकच चिघळण्याची शक्यात निर्माण झाली आहे.दुसरीकडे, सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे यांनी गत शनिवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाच्या 5 व्या दिवशी त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाला. यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. डॉक्टरांनी बुधवारी त्यांना सलाईन लावून औषधोपचार सुरू केले. पण त्यांनी काही वेळातच सलाईन काढून फेकून दिले. यामुळे चिंता वाढली आहे.