पुणे- राज्याचे मुख्य सचिव झाल्यावर डॉ . नितीन करीर यांनी पुण्यात येऊन एका कार्यक्रमात बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याची घोषणा केली यावर आज येथे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.. त्या म्हणाल्या , या पूर्वी असे कधी झाले नव्हते , मुख्य सचिव येतात काय आणि कार्यक्रमात अशी घोषणा करतात काय हे सारे चुकीचे आहे.बालगंधर्व रंग मंदिर पाडायचे कशासाठी ?हे त्यांनी समाधानकारकरीत्या स्पष्ट केले पाहिजे , ते नेमके हे कुणासाठी करत आहेत हे स्पष्ट करावे . त्यांनी टेंडर कसे काढायचे ते ठरवलेय , कमिशन कोणी किती खायचे ते ठरवलेय, कंत्राट कोणाला द्यायचे ते ठरवलेय , फक्त इथल्या कलाकारांचे, नाट्य निर्मिती संस्थांचे काय ? ते काही ठरवलेले नाही. आचारसंहितेच्या काळात पाडायचे ..आणि ३ वर्षे / ५ वर्षे पुढे काम बोंबलत ठेवायचे हा खटाटोप नेमका का , कुणासाठी / असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.