Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणे लोकसभा कॉंग्रेसच जिंकणार, लोकशाहीसाठी तानाशहा विरोधातील ही लढाई- नाना पटोले

Date:

पुणे-काँग्रेस सकारात्मकतेने निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. यावेळी काँग्रेस पक्ष पुण्याची जागा जिंकणार म्हणजे जिंकणार, कसब्यात रविंद्र धंगेकर जिंकणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी काही पत्रकार हसत होते.आता ज्याचे नाव मेरीट मध्ये येईल त्याला घरी जाऊन उमेदवारी देऊ , असे सांगत कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले कि नरेंद्र मोदी राजस्थानमध्ये 450 रुपये ला गॅस सिलेंडर देतात . मग देशातील दुसऱ्या राज्यात गॅस महाग का? हजारो कोट्यवधी रुपये कमविण्यासाठी ते अदानीला फायदा करून देत आहे.मणिपूर ते मुंबई न्याय यात्रा राहुल गांधी काढणार आहेत. गेल्या 10 वर्षांत एकही काम मोदी सरकारने केले नाही. निवडणूक आयोगाची पारदर्शकता राहणार की नाही? अशा स्थितीत हि निवडणूक लोकशाही वाचविण्यासाठीच महत्वाची ठरणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Pune) आज काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, जेष्ठ नेते उल्हास पवार, आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, अनंतराव गाडगीळ, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे उपस्थित होते. पटोले म्हणाले,’ धंगेकर यांना दिल्लीत काही यावे लागले नाही. मेरिटच्या आधारे पुण्यातील उमेदवार ठरवून घरपोच तिकीट देणार आहे. आज हजारो तरुणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमच्याकडे लोकशाही आहे. हुकूमशाही नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

नाना पटोले पुढे म्हणाले, महाआघाडीचा लोकसभा निवडणुकीचा फारमुला तयार आहे. राज्यात 50 जागा भाजप सांगणार आहेत. उद्याची बैठक राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेसाठी आहे. महाराष्ट्र राज्यात आघाडी सरकारची बोलणी चांगल्या प्रकारे आहे. राम मंदिराचे बांधकाम अपुरे असल्याचे शंकराचार्यांनी सांगितले आहे.

केवळ निवडणुकीसाठी या मंदिराचा उपयोग होत आहे. मी पण हिंदू आहे. राम मंदिर छोटे दाखवून मोदी यांना मोठे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. 22 तारखेला काहीही उपयोग नाही. राम मंदिराचा राजकारणासाठी वापर होतोय. पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार लवकरच ठरविणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत समावेश करण्यासाठी काँग्रेसची भूमिका आहे.

उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सोबत आंबेडकर यांचे बोलणे झाले. पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. मेरिटच्या आधारे जागा वाटपाचा फारमुला तयार आहे. आम्ही तिघांची भूमिका स्पष्ट आहे. उध्दव ठाकरे यांनी जागेसंदर्भात काहीही बोलणे केले नाही. संघटनेची पुण्यात बैठक होणार आहे. काँग्रेसने 60 वार्षात लोकांना सांभाळले. मोदी सरकारने 10 वर्षांत काय केले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आज हजारो तरुणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमच्याकडे लोकशाही आहे. हुकूमशाही नाही.

पटोले म्हणाले, आगामी वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे. महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभरात मालवाहतूक दारांचा संप सुरू आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांना होत आहे. देशात तानाशाही सुरू आहे. आता जो कायदा केला आहे, त्यामध्ये 7 लाख दंड, आणि 10 वर्षांची शिक्षा आहे.

हा कायदा करण्यामागचा हेतू काय आहे, लोकांनी वाहने वापरू नये, का लोकांनी पायीच चालावे, ही तर सरकारची मानसिकता आहे का? समृद्ध माहामार्गावर किती तरी बळी जात आहेत. टाटा गरम होऊन त्यामध्ये अनेक नागरिकांचा बळी जातोय. भाजप सरकारला याचे काहीही देणेघेणे नाही. आवश्यक ते केमिकल या समृद्धी महामार्गावर वापरण्यात आले नाही.

पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. महात्मा फुले यांच्या वाडयात भेट दिली असता पीएचडी विध्यार्थी रडत होते. महराष्ट्रात रोज शेतकरी आत्महत्या करतायेत. शेतकरी विरोधातील हे सरकार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...