मुंबई–
सत्ता उलथवण्यासाठीच मी इथे उभा आहे असे विधान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच सत्तेला घाबरणार असाल तर काही उपयोग नाही. भीती वाटणारी सत्ता उलथवलीच पाहिजे असा हल्लबोलही त्यांनी केला आहे. ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिंदे गट आणि भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच येणारे नवीन वर्ष हे देशासाठी लोकशाहीचे जावो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्वांचे मी स्वागत करतो. वैशाली ताई यांचे कौतुक वाटत आहे. आर. ओ पाटील आमचा भक्कम माणूस होता. त्यांचे जाणे एक आघात होता. पण त्यांचा वारसा वैशाली ताई पुढे नेत आहेत, असे म्हणत ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या वैशाली सूर्यवंशी यांचे कौतुक केले आहे. वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रयत्नामुळे ठाकरे गटात पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला.
या पक्षप्रवेशाच्या वेळी संजय राऊत हे देखील उपस्थित होते. ते म्हणाले, ”आपल्याकडे पक्ष नाही. चिन्ह नाही. तरी लोक पक्ष प्रवेश करत आहेत. हाच वारसा वैशाली पाटील पुढे नेत आहेत. उद्धव ठाकरेंचे बळ वाढवत आहे. शिवसेना सत्तेला लाथ मारत पुढे जात आहे”,असे राऊत म्हणाले.

