पुणे- चंद्रकांत दादा पाटील यांना जेव्हा पुण्यात आणले गेले आणि आमदारकीचा मुकुट जेव्हा त्यांना बहाल केला जात होता तेव्हा सर्वांच्या टीका अस्त्रांचा भडीमार होत होता.पण आता परिस्थिती बदलते आहे.पालकमंत्री म्हणून अजितदादांच्या दादागिरीपुढे चंद्रकांत दादांच्या कार्य पद्धतीचे कौतुक केले जाऊ लागले आहे.जिल्हा नियोजन मंडळात याचे जोरदार पडसाद उमटू लागले आहेत.चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री होते तेव्हा सर्वांना समान न्याय दिला जात होता पण आता तर चंद्रकांत दादांच्या कारकिर्दीत घेत्लेलेया निर्णयांना देखील वाटण्याच्या अक्षदा लावण्यात येऊ लागल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. सध्या अजित पवार हे पालकमंत्री आहेत.आणि अगदी चंद्रकांत दादा पालकमंत्री असताना झालेल्या बैठकीतील निर्णयाचे चर्चेचे इति वृत्तांत सुद्धा आता सदस्यांना देणे टाळले जाऊ लागले आहे.चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर अंमल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सह्याच केलेल्या नाहीत आणि या सह्या न केल्याने असंख्य कामांचा खेळ खल्लास च जणू करून टाकण्यात आल्याचे म्हटले जाते आहे.नियोजन मंडळाच्या ९० टक्के निधींवर नव्या पालकमंत्र्यांनी कब्जा मिळविल्याचा आरोप होतो आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी यांना जिल्हा नियोजन मंडळाच्या १० सदस्यांनी पत्र दिले आहे.मोठ्या राजकीय आणि प्रशासकीय दबावाखालील पार्श्वभूमीवर देखील त्यांनी पहा माध्यमांशी बोलताना नेमके काय म्हटले आहे. ते ऐका त्यांच्याच तोंडून….