पुणे-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव करून दाखवणार असल्याची गर्जना केली आहे. ज्यांची माझ्यासोबत राहून काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी माझ्यासोबत यावे. उगीच दोन्ही बाजूला राहू नये, असा इशाराही त्यांनी राष्ट्रवादीच्या तळ्यात-मळ्यात करणाऱ्या नेत्यांना दिला आहे. कोल्हे यांच्या तत्कालीन उमेदवारीबाबत बोलताना ते म्हणाले,’,’त्यावेळी उमेदवारी देताना योग्य पद्धतीने दिली होतं. आम्हाला वाटलं होतं की, ते वक्ते उत्तम आहेत. उत्तम कलाकार आहेत, संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी चांगली बजावली. ग्रामस्थांना खिळवून ठेवण्याचं काम त्यांनी केलं असेही अजित पवार म्हणाले. यादरम्यान आता त्यांच्या एवजी दुसरा बदली उमेदवार देणार का? असं विचारल्यानंतर, तु काळजी करू नको. आजच सांगतो, तिथं दिलेला उमदवार निवडूनच आणेन असं मिश्कील उत्तरही अजित पवारांनी यावेळी दिलं.
अजित पवार यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याचा संकल्प व्यक्त केला.राष्ट्रवादीच्या दोन खासदारांकडून शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असून पुण्यात जाहीर सभा देखील होणार आहे, याबद्दल अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, चांगली गोष्ट आहे, पण त्यातल्या एका खासदाराने पाच वर्ष आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यातला एक खासदार एक-दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आला होता माला राजीनामा द्यायचा म्हणून… त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे. त्या खासदाराला निवडणून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचं रान केलं आहे. त्यांना खासगीत समोरासमोर बोलवा.आता त्यांचं हे सगळं चाललं आहे, पण मधल्या काळात ते सहाही मतदारसंघात फिरत नव्हते. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. त्यांनी मला आणि त्यावेळचे आमचे वरिष्ठ यांना मी राजीनामा देतोय म्हणून सांगितलं होतं. मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमांवर परिणाम होतो आहे. मी काढलेला एक शिवाजी महाराजांवरील सिनेमा चालला नाही. माझा प्रपंच आणि आर्थिक गोष्टींवर परिणाम होतो आहे, अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या

