अजित पवारांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही
मुंबई-अजित पवार यांनी राष्ट्रवादीत स्वार्थासाठी बंड केले होते असे विधान शालिनीताई पाटील यांनी केले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामध्ये जमीन आस्मानाचे अंतर आहे. शरद पवारांचे बंड पक्षातील आमदार दुसरीकडे जाऊ नयेत यासाठी होते. तर अजित पवारांचे बंड स्वार्थासाठी होते. उपमुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी अजित पवारांचे बंड होते अशी टीका शालिनीताई पाटील यांनी केली आहे.पुढे शालिनीताई पाटील म्हणाल्या, 2024 मध्ये देवेंद्र फडणवीसच निवडणूक येतील असा विश्वास देखील शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच जो माणूस विश्वासघात करतो त्याच्यावर काय विश्वास ठेवावा असे शालिनीताही पाटील यांनी म्हंटले आहे.
ज्याने तुम्हाला लहानाचे मोठे केले त्याचाच विश्वासघात केला मग अशा व्यक्तीवर विश्वास का ठेवावा?, अजित पवारांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही. अजितदादांसोबत गेलेली माणसे कोणत्या लायकीचे आहेत हे मी आधीच सांगितले. त्यात बाकी जे आमदार आहेत ते पुन्हा शरद पवारांकडे जातील. त्यानंतर जी दुर्दशा होईल. तुरुंगात आजीवन कारावास भोगून आलेल्या व्यक्तीसोबत जे होते. त्याला निवडणूक लढवता येत नाही”, असे शालिनीताई पाटील यांनी म्हंटले आहे.
तसेच ”मी सातारा मतदारसंघातून यशवंतराव चव्हाण यांच्याविरोधात निवडणुकीला उभी राहिलेली आहे. त्यावेळी ते उपपंतप्रधान होते. त्यांच्यासमोर उभे राहायला कुणी तयार नव्हते. आम्ही काँग्रेसमध्ये होतो आणि ते काँग्रेससोडून बाहेरून लढत होते. त्यांच्याविरोधात उभे राहण्याचा माझ्या पक्षाने आदेश दिला. सातारा जिल्ह्यात त्यांच्याविरोधात कुणी अर्ज केला नाही.
वसंतदादांना पक्षाने उभे राहण्यास सांगितले. परंतु मी सांगलीतून उभा राहतोय. तुम्ही शालिनीताई ज्यांचे माहेर सातारा आहे. माहेरची लोक त्यांना प्रेम करतात. पक्षाने शालिनीताईंना उमेदवारी द्यावी अशी शिफारस त्यांनी केली. त्यानंतर पक्षाने मला उमेदवारी दिली. आम्ही समोरासमोर निवडणूक लढवली. कुणाविरोधात कारस्थान केले नाही. हा माझा आणि माझ्या पतीचा स्वभाव नाही असं शालिनीताईंनी म्हटलं.

