पुणे –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२१, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा शासन निर्णयातील सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार उपरोक्त निकाल नुकताच आज जाहीर करण्यात आला. शासन निर्णयानुसार कोरोना चे संकट लक्षात घेता यावर्षी १० वी बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आली होती.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चाटें क्लासेसच्या विद्यार्थ्यांसोबतच चाटे स्कूल कात्रज, चाटे पब्लिक स्कूल धनकवडी, चाटे स्कूल गाऊडदरा मधील विद्यार्थ्यांनीही घवघवीत असे यश संपादन करत चाटे समुहाची उज्वल यशाची परपंरा कायम राखली.यामध्ये चाटे समुहाच्या शेजल राठी -100 %, पारस शिरवळे-100 %, निखिल खराटे 95.80, पार्थ चव्हाण 95.40, ज्ञानेश्वरी थेऊरकर 94.60, अपेक्षा खुटवड 94.40, साक्षी चौगुले 93.60
अशा अनेक विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवले.यावेळी प्रा. फुलचंद चाटे यांनी सर्व गुणवतांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चाटे समूहाद्वारे दहावी बोर्ड परीक्षा मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांकरीता कौतुक सोहळा आयोजित केला होता.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच विद्यार्थ्यांना संबोधून प्रा फुलचंद चाटे सर म्हणाले की या विद्यार्थ्यांना १० वी मध्ये शिकत असतानाच दहावीची तयारी ही पुढील शिक्षणाचा पाया आहे आणि जर दहावी मध्येच चांगले गुण मिळाले तर विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवून पुढील शिक्षणाची वाटचाल यशस्वीपणे करता येते म्हणूनच विद्यार्थ्यांना आजची स्पर्धा व उद्याच्या संधी लक्षात घेऊन चाटे समूहातर्फे अकरावी आणि बारावी या दोन वर्षाचे महत्व आम्ही पटवून देत आलो आणि त्याकरिता दहावी बोर्ड परीक्षा किती महत्त्वाची आहे याचेही महत्त्व विद्यार्थ्यांना सांगत आलो. आणि यामुळेच की काय आज या सोहळ्यास उपस्थित विद्यार्थ्यांनी दहावीच्या निकालाच्या अगोदरच आपल्या पुढील प्रवेश परीक्षांची तयारी मे मध्येच सुरू केलेली आहे. आणि म्हणून विद्यार्थी व पालकांनी दहावीच्या निकालामध्ये फारसे अडकून न राहता पुढच्या वाटचालीस सुरुवात करावी असा सल्ला यावेळी चाटे सरांनी विद्यार्थी व पालकांना दिला.
परीक्षेमधील उज्वल यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपले पुढील शिक्षण हे आयआयटी पवई, एम्स दिल्ली इ. नामवंत संस्थांमधून घेण्याचे ठरवल्याचे सांगितले व या करिता आम्ही अगोदरच चाटे कॉलेजमध्ये याची तयारी सुरू केल्याची विद्यार्थ्यांना कल्पना दिली व आपल्या यशाचे सर्व श्रेय आपले पालक व चाटे शिक्षण समूहातील सर्व गुरुजन वर्ग यांना जाते असेही यावेळी विद्यार्थ्यांनी नमूद केले
चाटे शिक्षण समूहाच्या विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीमध्ये देखील जे यश मिळविले आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे आणि हे केवळ चाटे शिक्षण समूहाच्या कार्यप्रणाली मुळेच शक्य करता आले आहे. बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करत मागील ३३ वर्षापासून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम अतिशय सक्षम पणे व यशस्वीरित्या चालू आहे यामुळेच आज विद्यार्थी व पालकांचा चाटे शिक्षण समूहावर पूर्ण विश्वास आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा बापू काटकर यांनी केले यावेळी पुणे विभागीय व्यवस्थापक प्रा विजय बोबडे, प्रा रत्नाकर सोनवणे, प्रा उत्तरेश्वर खराटे आदी मान्यवरही कार्यक्रमास उपस्थित होते.