पुणे-प्लॉस्टिक च्या पिशव्या पर्यावरणास घातक असून आता महाराष्ट्र सरकारने ही यावर बंदी घातली आहे.बंदी हुकुम अस्तित्वात येइलच पण नागरिकांनी स्वतःहून प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर थांबवला पाहिजे व बाजारात भाज्या / फळ / धान्य व इतर साहित्य खरेदी करताना सोबत कापडी / कागदी अथवा जूट च्या पिशव्या वापरल्या पाहिजेत असे आवाहन नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केले.प्रभाग १३ मधे त्यांच्या विकास निधीतून बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या कापडी पिशव्या वाटपाच्या कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.आज जवाहरलाल नेहरु वसाहतीत महिलांना या पिशव्यांच्या वाटपातुन जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.संपूर्ण प्रभागात टप्प्याटप्पयाने असे वाटप व जनजागृती करण्यात येणार असून शहरातील पहिला प्लॉस्टिक मुक्त प्रभाग करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ही सौ मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.यावेळी वस्तीतील भारती देशमुख,नूरजहाँ शेख,लता काळे,सिंधुताई पोटे,मीरा पोटे इ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी सर्व महिलांनी प्लॉस्टिक पिशव्या वापरणार नाही असा निर्धार केला.पहिल्या टप्प्यात ५००० घरांमध्ये कापडी पिशव्या वाटप करण्यात येणार असून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या प्रभागात प्लास्टिक बंदी करावी यासाठी जनजागृती अभियान व विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.यासाठी स्वयंसेवी संस्था,ज्येष्ठ नागरिक संघ व विद्यार्थ्यांची मदत घेणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.