पुणे- घरो घरी जाऊन , कोणी लास घ्यायचे राहिले आहे काय ? विचारीत पहिला डोस , दुसरा डोस देत घरो घरी -दारोदारी नेलेल्या प्रगती फौंडेशनच्या लसीकरण वारीने दहा हजार लसीकरणाचा टप्पा गाठला आहे .
पुण्यात सर्वात आधी , लसीकरण केंद्रावर नाही तर घरो घरी जाऊन लास देण्याचा संकल्प करून तो अंमलात आणायचा निश्चय सोडलेल्या प्रगती फौंडेशन च्या प्रतिक प्रकाश कदम यांनी आजच्या दिवशी लोकांनीही लास दारी घेऊन गेल्याने केलेल्या स्वगातातच अपूर्व आनंद लाभल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘ अनेकांनी केंद्रावर सुरुवातीला गर्दी केली . पण तिथे गर्दीमुळे होणारी गैरसोय ,लागणारा विलंब पाहून अनेकांनी पुन्हा केंद्रांवर लास घ्यायला जाण्यास उतुस्क्ता दाखविली नाही त्यात लॉक डाऊन मुले अगोदरच बेजार झालेली मांडली लॉक डाऊन उठताच कामाला प्राधान्य देत गेली या साऱ्या रोजच्या धकाधकीत लसीकरणाला प्राधान्य देणे अनेकांना जमेनासे झाले . तेव्हा आम्ही हि संकल्पना राबविण्यास प्रारंभ केला . लोकांच्या घरी जाऊन लास घेतलेले कोणी राहिलेय काय ? लास घ्या ..आलोय तुमच्या दारी असे म्हणत लासिकारणाला प्रारंभ केला . कित्येक घरी जाऊन लासी दिल्या तर काही ठिकाणी अनेक चाळी, सोसायट्या , वस्त्या मध्ये काही ठिकाणी अम्ब्युलंस प्रमाणे गाडी नेऊन लासी दिल्या . आज सकाळी ९२०० चा टप्पा पार केला तर संध्याकाळी तो १० हजार पर्यंत पोहोचला . देशात केंद्रा केंद्रा तून रुग्णालयांतून १०० कोटीचा टप्पा पार होत असताना कात्रज ने घरी दारी जाऊन हा १० हजाराचा टप्पा म्हणजे खारीचा वाटा उचलला आहे. अशा पद्धतीने संपूर्ण पुण्याचे लसीकरण करण्यास अनेकजण पुढे आले तर लसीकरण युक्त पुणे , कोरोना मुक्त पुणे होण्यास फार अवधी लागणार नाही असेही ते म्हणाले .