रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे नेते सचिन खरात यांचा सवाल
मुंबई-
राहुल देशपांडे या मराठी गायकाचा अपमान होऊन सुद्धा राज ठाकरे गप्प का ? राज ठाकरे आपल्याला खरंच मराठी माणसाबद्दल प्रेम असेल तर भाजपाला माफी मागायला लावावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे नेते सचिन खरात यांनी केली आहे. खरात म्हणाले की, भाजपच्या वरळी दीपोत्सव कार्यक्रमात प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांना बाजूला करत अभिनेते टायगर श्रॉफ यांचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे मराठी कलाकाराचा अपमान झाला आहे. माननीय राज ठाकरे सतत मराठी माणसाच्या न्याय हक्काच्या भूमिका मांडतात. आता प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे या मराठी गायकाचा अपमान होऊन सुद्धा राज ठाकरे गप्प का ? राज ठाकरे आपल्याला खरेच मराठी माणसाबद्दल प्रेम असेल, तर भाजपाला माफी मागायला लावावी, अशी मागणी खरात यांनी केली आहे.