पुणे-बीव्हीजी कृषी तंत्रज्ञानामुळे विषमुक्त शेतमालाचे दुप्पट उत्पादन मिळते.
आयव्हरी कोस्टमधील शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी आम्ही बीव्हीजी कृषी
तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे असल्याचे प्रतिपादन अफ्रिकेतील आयव्हरी
कोस्टचे कृषी मंत्री गॉसौ टॉरे यांनी केले.
सातारा मेगाफुड प्रकल्पाला त्यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी आयोजित
करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सातारा मेगाफुड पार्कचे
अद्यक्ष विजयकुमार चोले, नाबार्डचे संदीप शर्मा, नायाब तहसीलदार दयानंद
कोळेकर, उपविभागीय कृषी अधिकारी महेश झेंडे उपस्थित होते. यावेळी बोलताना
टॉरे म्हणाले, आयव्हरी कोस्टमध्ये विषमुक्त शेतमालाचे उत्पादन वाढवण्याचा
आमचा मानस आहे. बीव्हीजीने विषमुक्त शेतमाल निर्मितीची चळवळ भारतात
सुरु केली आहे. त्याच आधारावर आम्हाला आयव्हरी कोस्टमध्ये विषमुक्त
शेतमाल निर्मितीची चळवळ सुरु करायची आहे. मेगाफूड पार्कमधील शेतमालावर
प्रक्रीया करून दर्जेदार खाद्याची निर्मिती होत आहे. मेगा फूड प्रकल्पाद्वारे
आयव्हरी कोस्टमध्ये रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होणार आहे.
चोले म्हणाले की, प्रक्रीया उद्योगासाठी लागणाऱ्या शेतमालाची खरेदी
शेतकऱ्यांनाकडून केली जाते. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना सुद्धा
मेगाफुडपार्कमुळे अधिकचा नफा मिळतो आहे. मेगाफुड पार्कमध्ये तयार होणाऱ्या
सर्वच उत्पादनांना भारतभरातुन मागणी वाढली आहे. बीव्हीजीने मेगाफुड
पार्कच्या माध्यामातून ग्रामिण भारतात अर्थव्यवस्थेचे रोल मॉडेल तयार केले
आहे. याच मॉडेलचा फायदा आयव्हरी कोस्टमधील शेतकऱ्याना होणार आहे.