पुणे- यापुढे 2024 ला मोदींचा पराभव केला नाही तर देशात लोकशाही उरणार नाही असे सांगून ममता बैनर्जी च्या मुद्द्यावर बोलताना , काँग्रेसला सोडून आघाडी करणे म्हणजे भाजपाला सहाय्य करणे होईल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा माध्यमांशी संवाद करताना व्यक्त केले. इंदिराजींनी अमेरिकेलाही ललकारले होते ही आठवण 1971 च्या विजयी युद्धा च्या आठवणी जाग्या करताना होते, आज चीन भारताचे लचके तोडत आहे, देशाची आर्थिक स्थिती बांगला देशाहून अधिक कमजोर करून ठेवण्यात आली आहे हे चिंताजनक असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे .कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आले असताना माध्यमांशी ते बोलत होते
राजकारणात राजकीय महत्त्वकांक्षा ठेवणे काही गैर नाही. पण बाकीचे वातावरण तयार करून विरोधकांची एकजूट तोडण्याचा प्रयत्न करू नये, काँग्रेस शिवाय कोणतीही आघाडी होऊच शकत नाही. आणि अशी आघाडी झाल्यास तिला यश मिळणार नाही, असे विधान करत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर दिले.
पुढे म्हणाले, त्यामुळे राजकीय महत्त्वकांक्षा असणे गैर नाही. त्यांना पंतप्रधान व्हायचे असेल त्यांनी पहिल्यांदा निवडणुका जिंकल्या पाहिजे. निवडणुका जिंकल्यानंतर जे चित्र निर्माण होईल, त्यानंतर नेते पुढचा निर्णय घेतील. पण स्वतःच्या महत्वकांक्षा पुढे आल्यातर काही निष्पन्न होणार नाही, असे सांगतानाच तरी सर्व विरोधी पक्षांची एकजूट होईल ही आशा आहे.
2024 मध्ये होणारी निवडणूक एक निर्णायक निवडणूक असणार आहे. त्या निवडणुकीत मोदींचा पराभव केला नाही तर देशात लोकशाही अस्तित्वात राहणार नाही. असेही मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत कोण एकत्र येईल, कोण त्याच नेतृत्व करेल हे नंतर ठरेल. त्यासाठी आधी पाच राज्यात होणाऱ्या निवडणुका लढवाव्या लागेल. तिथं मोदींना रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. नंतर 2024 ची निवडणूक होईल. त्या कालावधीत ही सर्व आघाडी एकत्र करावी लागेल. तोपर्यंत एकदिलाने मोदींच्या कारभारावर टीका केली पाहिजे. त्यांचा कारभार उघड केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.