हिदू -मुस्लीम जातीयवाद भडकेल याची चिंता न करणारा , काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर बनलेला ‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काही काळ अवधी दिवस चर्चेत होता . या पार्श्वभूमीवर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पहिल्यांदाच या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, काश्मिरी पंडितांच्या पलायनाचे कारण दिल्लीत बसलेले सरकार होते.मी जर पलायनास ते जबाबदार असल्याचे सिद्ध झाले तर मला पाहिजे तेथे फाशी द्या, मात्र त्यापूर्वी चौकशी आयोग नेमा ,एएस दुल्लत (तत्कालीन रॉ प्रमुख), आरिफ मोहम्मद खान, मोहसर रझा (तेव्हाचे मुख्य सचिव) यांना विचारा.जम्मू-काश्मीरमध्ये सीमांकन व्हायला हवे, राज्याचा दर्जा परत दिला पाहिजे. हा देशाचा मुकुट आहे, तो पुन्हा उजळला पाहिजे,, हिंदू-मुस्लिम संबंध सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यानंतर योग्य, प्रामाणिकपणे निवडणुका घ्याव्या लागतील. मशीनमध्ये छेडछाड केली जाते, सैन्याकडून मते टाकून घेतली जातात, ती थांबवावी लागतील, असा आरोप त्यांनी केला. जम्मू-काश्मीरमध्ये एखादा हिंदू मुख्यमंत्री प्रामाणिकपणे निवडून येतो, तो काश्मिरी असो वा नसो, त्याचा विचार केला जाईल. पण अप्रामाणिकपणे आला तर कधीच त्यास स्वीकारला जाणार नाही…आज तकला दिलेल्या मुलाखतीत फारुख अब्दुल्ला म्हणाले – काश्मिरी पंडितांनी परत यावे अशी प्रत्येक काश्मिरीची इच्छा आहे. 1990 मध्ये जे घडले ते षड्यंत्र होते. काश्मिरी पंडितांना कट रचून हाकलण्यात आले. त्यावेळी जे दिल्लीत बसले होते तेच याला जबाबदार आहेत. माझे मन अजूनही त्या बांधवांसाठी अश्रू ढाळत आहे.
फारुख यांनी पंतप्रधान मोदींची हिटलरशी केली तुलना
काश्मीर फाइल्सवर अब्दुल्ला म्हणाले – हा चित्रपट मने जोडत नाही, तर तोडत आहे. ही आग आम्ही विझविली नाही, तर संपूर्ण देशाला कवेत घेईल. मी पंतप्रधानांना सांगेन की कृपा करून अशा गोष्टी करू नका, ज्यामुळे देश हिटलरच्या काळातील जर्मनीसारखा दिसेल. काश्मिरींची मने जोडल्याशिवाय शांतता कठीण आहे.
‘जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करावा’
फारुख पुढे म्हणाले- 370 संपून किती वर्षे लोटली, दहशतवाद संपला का? बॉम्बस्फोट थांबले का? तुमची इथे इतकी फौज आहे, ते का थांबवू शकले नाहीत. जम्मू-काश्मीरमध्ये अजूनही लोक मारले जात आहेत. आजही येथे 800 काश्मिरी पंडितांची कुटुंबे राहतात, त्यांना कोणी हात लावला का? पुलवामाच्या बंशीलाल यांनी मी इथे राहिलो, गेलो नाही, मी इथे खूप आनंदी आहे, असे वक्तव्य केले आहे. बोलता बोलता फारुख यांनी जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यासही सांगितले.