Home Blog Page 538

तुळजाभवानी मंदिराच्या मद्यधुंद‎ पुजाऱ्याची कार्यालयात तोडफोड‎, गैरवर्तनप्रकरणी 3 महिने मंदिरात प्रवेशाला बंदी‎

तुळजापूर‎-तुळजाभवानी मंदिर कार्यालयात मद्यधुंद‎अवस्थेत सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करत‎पुजाऱ्याने तोडफोड केली. हा धक्कादायक‎प्रकार १३ मे रोजी घडला. मंदिरात गैरवर्तन‎‎केल्याप्रकरणी देऊळ‎‎कवायत कायद्यानुसार‎‎संबंधित पुजाऱ्याला ३‎‎महिने मंदिर ‎‎प्रवेशबंदीची नोटीस ‎‎बजावली आहे. अनुप ‎‎कदम असे तोडफोड‎‎ करणाऱ्या पुजाऱ्याचे‎ नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा‎दाखल करण्यात आला आहे.‎

पुजारी अनुप कदम याने १३ मे रोजी‎मंदिरातील व्हीआयपी गेटवर सुरक्षा‎रक्षकांसोबत धक्काबुक्की व शिवीगाळ ‎केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देत ‎‎जबरदस्तीने मंदिरात प्रवेश केला होता.‎तसेच संस्थानच्या कार्यालयातील‎ सीसीटीव्ही कंट्रोल रूमच्या दरवाजाला ‎लाथ मारली. त्यामुळे दरवाजाची काच ‎‎फुटली. त्यामुळे पुजारी कदम याला १३ मे‎ रोजी ३ महिने मंदिर बंदची नोटीस‎ बजावण्यात आली आहे. मंदिरातील ‎‎तोडफोडप्रकरणी पुजारी कदम विरोधात ‎कलम २२१, ३५२, ३२४(४) नुसार गुन्हा ‎‎दाखल झाला आहे. पुढील तपास‎ तुळजापूर पोलिस करत आहेत.‎

यापूर्वी १५ एप्रिलला जिल्हाधिकारी तथा ‎तुळजाभवानी संस्थान अध्यक्षांच्या ‎दालनात कार्यालयीन कामकाज सुरू होते.‎त्याच वेळी पुजारी कदम याने अपर‎जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे मुख्य‎कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापक,‎तहसीलदारांशी हुज्जत घातली होती.‎या प्रकरणात सुरक्षा रक्षक पुरवठादार कंपनीचा‎अहवाल प्राप्त झाल्यानंतर संस्थानने सीसीटीव्ही‎फुटेजची पडताळणी केली, तसेच घटनाक्रमाची‎खात्री केली. त्यानंतर १३ मे रोजी पुजारी कदमला‎‘अशोभनीय वर्तन केल्याने देऊळ कवायत‎ कायदा कलम २४ व २५ नुसार ३ महिन्यांची मंदिर ‎प्रवेशबंदी का करण्यात येऊ नये ?’ अशी नोटीस ‎पुजारी कदमला बजावली होती.‎

शरद पवार यांचा पक्ष मूळ पक्ष आहे. ते अजित पवार यांच्या गटात कशासाठी जातील?-खासदार संजय राऊत

0

अजित पवार हे शरद पवार यांच्या पक्षाला त्यांच्या गटामध्ये घ्यायला तयार नाहीत

आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी धोका निर्माण केला-काँग्रेसने खुलासा न मागता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागायला हवा, अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेसलाही सुनावले आहे. एक प्रधानमंत्री देशाशी खोटे बोलत आहे आणि आपल्या सैनिकांचे पाय खेचून त्यांना मागे घ्यायचे काम करत आहे. आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी धोका निर्माण केला आहे. ते आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोट्या खेळत आहेत का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

मुंबई- अजित पवार हे शरद पवार यांच्या पक्षाला त्यांच्या गटामध्ये घ्यायला तयार नाहीत. अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर खोचक टोला लगावला आहे. या संबंधी ते म्हणाले की, शरद पवार यांचा पक्ष मूळ पक्ष आहे. ते अजित पवार यांच्या गटात कशासाठी जातील? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. मोदी – शहा गेल्यानंतर यांच्याकडे काहीही राहत नाही. त्यामुळे हे दिवस निघून जातील, असा सल्ला देखील त्यांनी शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांना दिला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लवकरच देशाच्या राजकारणातून बाजूला होतील, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. त्यांना देशातील राजकारणातून जावे लागेल. फक्त माझे पुस्तक येण्याची वाट पहा. त्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजेल, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. माझे पुस्तक आल्यानंतर अमित शहा यांच्या अध:त्पतनाला सुरुवात होणार असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपच्या वतीने काढण्यात येणाऱ्या तिरंगा यात्रेवरही त्यांनी निशाणा साधला. तिरंगा यात्रा काढण्याचे कारण काय? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. जागतिक युद्धाच्या इतिहासात पहिल्यांदाच शस्त्रसंधी झाल्यानंतर अशा प्रकारे आनंद साजरा होत असल्याचा आरोप त्यांनी केला. युद्ध विराम आणि माघार घेत, शस्त्रसंधी करून हाच विजय मानून एक पक्ष विजयी सोहळा साजरा करत आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे. शस्त्र संधी हा विजय कसा असू शकतो? दुसऱ्यांच्या हस्तक्षेपाने झालेली शस्त्र संधी हा विजय कसा असू शकतो? असे प्रश्न राऊत यांनी विचारले आहेत.

या वेळी राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी देखील तिरंगा यात्रा काढली होती. यावरुन त्यांचे डोके फिरले आहे का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. तुमच्या माघारी मुळे युद्ध विरामामुळे अख्खा देशाला धक्का बसला आहे. तुमच्या अशा धोरणामुळे अख्खा देश धक्क्यात असताना एकनाथ शिंदे यांनी तिरंगा यात्रा नाही तर डोनाल्ड यात्रा काढायला हवी, असा टोलाही त्यांनी लगावला. शिंदेंनी अमेरिकेचा झेंडा हातात घ्यायला हवा, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

पृथ्वीवरून अंतराळातील परिस्थितीबाबत जागरुकता वाढवण्यासाठी डीएसटी आणि डीआरडीओ यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी

नवी दिल्ली, 14 मे 2025

भारताची पृथ्वीवरून अंतराळातील परिस्थितीबाबत जागरुकता वाढवण्याची क्षमता बळकट करण्याच्या दृष्टीने अंतराळ संशोधन करण्यासाठी आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस (एआरआयईएस) मधील निरिक्षण सुविधा आणि वैज्ञानिक कौशल्याचा वापर करण्यासाठी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) एका संस्थेने संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) संस्थेशी भागीदारी करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

एआरआयईएस (ARIES) नैनीताल, ही डीएसटीची स्वायत्त संस्था आणि इन्स्ट्रुमेंट्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (आयआरडीई), डेहराडून, ही डीआरडीओची प्रयोगशाळा, यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. मनीष कुमार नाजा, संचालक, एआरआयईएस, आणि अजय कुमार, संचालक, आयआरडीई, यांनी 13 मे 2025 रोजी आयआरडीई, डेहराडून येथे या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

एआरआयईएस (ARIES) ही खगोलशास्त्र, खगोलभौतिकी आणि वातावरणीय विज्ञान क्षेत्रातील एक प्रमुख संशोधन संस्था असून, या ठिकाणी 3.6 मीटर देवस्थळ ऑप्टिकल टेलिस्कोप आणि एसटी रडार प्रणालीसह अत्याधुनिक राष्ट्रीय निरीक्षण सुविधा आहेत.

आयआरडीई (IRDE) ही जमीन, सागरी, हवाई आणि अंतराळ क्षेत्रात सशस्त्र दलांसाठी इलेक्ट्रो-ऑप्टिकल सर्व्हेलन्स सिस्टमचे डिझाइन आणि विकास करणारी अग्रगण्य संस्था आहे.

या सामंजस्य करारामध्ये,अंतराळातील वस्तूंवर देखरेख आणि डेटा संपादनासाठी एआरआयईएस (ARIES) मधील निरीक्षण सुविधांचा वापर, खगोलशास्त्र आणि एसएसए वापरासाठी इलेक्ट्रो-ऑप्टिक्स आधारित प्रणाली संयुक्तपणे विकसित करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग (एआय / एमएल) चा एकत्रित वापर करून प्रतिमा प्रक्रिया आणि डेटा विश्लेषण तंत्राचा विकास आणि ज्ञानाची देवाणघेवाण, प्रशिक्षण उपक्रम आणि वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधन आणि विकासाद्वारे क्षमता विकास याचा समावेश आहे.

एआरआयईएस (ARIES) चे डॉ. ब्रिजेश कुमार आणि डॉ. टी. एस. कुमार, आणि आयआरडीई (IRDE) चे रुमा ढाका, डॉ. सुधीर खरे, डॉ. मानवेंद्र सिंह, अभिजीत चक्रवर्ती आणि भरत राम मीणा यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आलेला हा सामंजस्य करार उत्तराखंडमधील दोन प्रमुख वैज्ञानिक संस्थांमधील धोरणात्मक भागीदारीचे प्रतिनिधित्व करत असून, अंतराळ देखरेख प्रणाली आणि भू-आधारित खगोलशास्त्रातील उद्दिष्टे पुढे नेणे, हे याचे उद्दिष्ट आहे.

एआरआयईएस (ARIES) आणि आयआरडीई (IRDE) ची भौगोलिक सान्निध्यता नियमित संवाद, सुविधांची उपलब्धता, तांत्रिक देवाणघेवाण आणि संयुक्त उपक्रमांचे समन्वय सुलभ करेल अशी अपेक्षा आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका:फेर प्रभाग रचना करा-निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला निर्देश

0

लोकशाहीच्या मूळ तत्वांचा अवमान-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न घेणे हे लोकशाहीच्या मूळ तत्वांचा अवमान आहे. सद्य स्थितीत ग्रामपंचायत ते जिल्हा परिषदांपर्यंत सर्वच प्रातिनिधिक संस्था केवळ अधिकाऱ्यांच्या ताब्यात असल्याचे चित्र आहे. हे अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची रखडलेली निवडणूक 2022 च्या जुलैपूर्वी लागू असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या आधारे घेण्यात याव्यात. हा आदेश अंतिम नाही. बांठिया आयोगाच्या अहवाला देण्यात आलेल्या आव्हान याचिकेवरील निर्णयानंतर या निवडणुकांच्या वैधतेवर फेरविचार होऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटलेले आहे .स्थानिक स्वराज्य संस्थांना अनिश्चित काळासाठी वाऱ्यावर सोडता येणार नाही. वेळेवर निवडणुका हे तळागाळातील लोकशाहीचे सार आहे. त्यामुळे जिथे मुदत संपली आहे किवा प्रशासन राज आहे अशा सर्वच महापालिका, नगर परिषदा, नगर पंचायती व जिल्हा परिषदांची लवकर निवडणुका घेण्यात याव्यात, असे निरिक्षणही न्यायालयाने या प्रकरणी आपल्या आदेशात नोंदवले आहे.

मुंबई-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी फेर प्रभाग रचना करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार आता राज्य सरकारला फेर प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मागील जवळपास पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील राजकारण्यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता आगामी चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने देखील तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यातच आता निवडणूक आयोगाने देखील या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासाठी कंबर कसली आहे. यात आता राज्य सरकारला फेरफार रचना करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील 4 महिन्यांच्या आत घेण्याचे महूत्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करताना दिले. कोर्टाने ही निवडणूक 1994 ते 2022 पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसार घेण्याचे आदेश दिलेत. विशेषतः राज्य निवडणूक आयोगाला यासंबंधी 4 आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करण्याचेही निर्देश दिलेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वी उडणार हे निश्चित झाले आहे. ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे महाराष्ट्रात 2021 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती एन के सिंह यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी झाली. त्यात कोर्टाने ह्या निवडणुका 4 महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश दिलेत. कोर्टाच्या आदेशांनुसार, ओबीसी समुदायाला 2022 पूर्वी असणारे आरक्षण कायम ठेवून 4 महिन्यांच्या आत ही निवडणूक घ्यावी लागेल. ही निवडणूक बांठिया आयोगाच्या अहवालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निकालाच्या अधीन असतील, असेही कोर्टाने या प्रकरणी स्पष्ट केले आहे.

40 रुपयांची दारू प्यायल्याने 23 जणांचा तडफडून मृत्यू,डीएसपी सह एक्साईज इन्स्पेक्टर पर्यंत अनेकजण सस्पेंड

अमृतसर:40 रुपयांची दारू प्यायल्याने 23 जणांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच पंजाब मध्ये घडली आहे . मृत्युमुखी पडणाऱ्या मध्ये मजूर, बस चालक आणि शेतमजूर अशा गरीब वर्गातील लोकांचा समावेश आहे . हे सर्वजण दिवसभर कष्ट करून आपले घर चालवत होते. ते अमृतसर जिल्ह्यातील रहिवासी होते. गावेही जवळच होती. १२ मे रोजी पाऊच दारू प्यायली. घरी परतले तेव्हा छातीत जळजळ आणि तीव्र वेदना होऊ लागल्या. वाचा बंद झाली.नेमकी समस्या काय आहे हे सांगताही येत नव्हते.मराडी कलान, भंगाली कलान आणि थ्रिवाल या तीन गावांत पोहोचले. तिन्ही गावांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे.विषारी दारूमुळे २३ मृत्यू झाल्यानंतर, पंजाब सरकारने मजिठा येथील डीएसपी अमोलक सिंग आणि एसएचओ अवतार सिंग, उत्पादन शुल्क विभागाचे ईटीओ मनीष गोयल आणि उत्पादन शुल्क निरीक्षक गुरजीत सिंग यांना निलंबित केले आहे.दारू रॅकेटचा प्रमुख सूत्रधार साहिब सिंग याला आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

मृत झालेल्या लोकांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना रुग्णालयात नेले, पण वाटेतच त्यांनी एकेक करून शेवटचा श्वास घ्यायला सुरुवात केली. १२ मे रोजी सकाळपासून १३ मे रोजी संध्याकाळपर्यंत एकूण २३ मृत्यू झाले आणि १० जण अजूनही रुग्णालयात आहेत. मृतांमध्ये २५ वर्षांचा एक तरुण ते ८० वर्षांचा एक पुरुष आहेत.

या घटनेमुळे थ्रिवल, पातालपुरी, मरारी कलान, तलवंडी खुम्मन, कर्नाळा, भांगवान, जलालपूर, भंगाली कलान या गावांमध्ये शोककळा पसरली आहे.या गावांमध्ये बेकायदेशीर दारूची सहज उपलब्धता होत असल्याचे स्पष्ट झाले आहे .मृत्यू झालेल्यांमध्ये दारू पुरवल्याचा आरोप असलेल्या दोन लोकांचा समावेश आहे. पाउचमध्ये उपलब्ध असलेल्या या दारूची किंमत ३५ ते ४० रुपये आहे. मृताने प्यायलेल्या दारूमध्ये मिथेनॉलचे प्रमाण जास्त असल्याचा डॉक्टरांना संशय आहे. यामुळे त्यांचा मृत्यू झाला .

डीजीपी गौरव यादव म्हणाले की, दारू रॅकेटचा प्रमुख सूत्रधार साहिब सिंग आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. लुधियानातील मिथेनॉल पुरवठादार पंकज कुमार आणि अरविंद कुमार यांनाही अटक करण्यात आली आहे. प्रभजीत सिंग, कुलबीर सिंग, निंदर कौर, गुरजंत सिंग, अरुण ऊर्फ ​​काला आणि सिकंदर सिंग ऊर्फ ​​पप्पू हे दारू पुरवठा करत होते. त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रॅकेटचा प्रमुख सूत्रधार साहिब सिंग याने लुधियाना आणि दिल्लीतील रासायनिक कंपन्यांकडून ऑनलाइन मिथेनॉल ऑर्डर केले होते. यापासून बनावट दारू बनवली जात होती. डॉक्टरांच्या मते, मिथेनॉल हे मृत्यूचे कारण आहे. हे एक विषारी रसायन आहे. त्याची थोडीशी मात्रा देखील अंधत्व, मूत्रपिंड निकामी होणे आणि मृत्यूला कारणीभूत ठरू शकते.
या अपघातानंतर पोलिस आणि उत्पादन शुल्क विभाग एकमेकांवर आरोप करत आहेत. पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की, उत्पादन शुल्क धोरणाची अंमलबजावणी करणे आणि बेकायदेशीर दारू विक्री थांबवणे ही उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी आहे.त्याच वेळी, उत्पादन शुल्क विभागातील सूत्रांचा असा युक्तिवाद आहे की त्यांच्याकडे बेकायदेशीर दारू विक्री शोधण्यासाठी कोणतीही गुप्तचर यंत्रणा नाही. त्यांना भारतीय राखीव बटालियनकडून बळ मिळते. त्यांना व्हीआयपी ड्युटी किंवा इतर कामावर ठेवले जाते. जेव्हा आपण बेकायदेशीर दारू विकणाऱ्या लोकांना पकडतो आणि त्यांना पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जातो तेव्हा आपल्याला गुन्हा दाखल करण्यासाठी तासनतास विनवणी करावी लागते.

निसर्ग सौंदर्य, भवताल व सांस्कृतिक छटांची सफरघडवणारी मनमोहक छायाचित्रे: भाग्यश्री देसाई

हौशी छायाचित्रकार रमेश करमरकर यांच्या वैविध्यपूर्ण छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे: “निसर्ग सौंदर्याचे वैविध्यपूर्ण अविष्कार, देश-विदेशातील वास्तू, नयनरम्य ठिकाणांची, भवतालातील सांस्कृतिक छटांची सफर घडवणारी छायाचित्रे रमेश करमरकर यांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपली आहेत. ही मनमोहक छायाचित्रे पाहताना आपण प्रत्यक्षात तिथे जाऊन ती पाहत आहोत, अशी अनुभूती मिळते. निसर्गाचे सौंदर्य टिपताना त्यातील बारकाव्यांवर खूपच कलात्मकपणे लक्ष दिले आहे,” असे मत निर्माती-अभिनेत्री व कलाकार भाग्यश्री देसाई यांनी केले.

ज्येष्ठ हौशी व मनस्वी छायाचित्रकार रमेश करमरकर यांच्या वैविध्यपूर्ण, पारितोषिक प्राप्त छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन भाग्यश्री देसाई यांच्या हस्ते झाले. प्रसंगी रमेश करमरकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. कोथरूड येथील हॅप्पी कॉलनीतील पु. ना. गाडगीळ अँड सन्स कला दालनात २१ मेपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. बैलगाड्यांची शर्यत, आयफेल टॉवरचा अद्वितीय अँगल, नायगारा धबधबा, ट्युलिप फ्लॉवर्स, ब्राझीलमध्ये डोंगरावर सूर्यकिरण पडल्याने पाहायला मिळणारा ऊन-सावलीचा खेळ, बैलगाड्यांची शर्यत, वन्यजीव, आम्सटरडॅममध्ये वर्षभरात केवळ २५ दिवस उमलणारी फुले, रनिंगची मनमोहक छायाचित्रे प्रदर्शनात पाहता येणार आहेत.

रमेश करमरकर म्हणाले, “गेल्या ५५ वर्षांपासून फोटोग्राफीचा छंद जोपासला आहे. बेलोज कॅमेऱ्यापासून ते मिररलेस कॅमेऱ्याच्या वापरातून विविध देशांतील जीवनशैली, तेथील निसर्गसौंदर्य, सांस्कृतिक वैभव मला कॅमेऱ्यात टिपता आले. माझ्या छायाचित्राला महाराष्ट्र सरकारच्या प्रथम पारितोषिकासह भारत सरकार व इतर अनेक नामांकित संस्थांची पारितोषिके इतर अनेक छायाचित्रांना मिळालेली आहेत. छंद जोपासताना टिपलेली ही छायाचित्रे लोकांपर्यंत पोहोचावीत, या भावनेने हे प्रदर्शन आयोजिले असून, पुणेकरांनी प्रदर्शनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करतो.”

नवउद्योजकांना दुबईत उत्पादने निर्यातीसाठी मार्गदर्शन करणार : धनंजय दातार

दुबई– मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी महाराष्ट्रातील नवउद्योजकांची उत्पादने दुबईसह संयुक्त अरब अमिरातीत निर्यात करण्यासाठी मदतीची तयारी दाखवली आहे. दुबईच्या उंबरठ्यावरुन जागतिक बाजारपेठेत व्यवसाय वाढवण्यास इच्छुक असलेल्यांना मनापासून मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

सोलापूर येथील आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच धनंजय दातार यांची येथे भेट घेऊन त्यांच्यापुढे सोलापूरच्या शेंगा चटणी, ज्वारीची कडक भाकरी, उत्कृष्ट दर्जाची ज्वारी, तांदूळ व डाळी अशा कृषी उत्पादनांचे सादरीकरण केले. एका बॅग उत्पादकाने नावीन्यपूर्ण पॅकेजिंग सोल्यूशन्सही सादर केली. दातार यांनी या सर्वांच्या गुणवत्तेचे कौतुक केले व काही उत्पादने आपल्या अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स समूहातर्फे खरेदी करण्याची तयारीही दाखवली.

दुबईत उत्पादने निर्यात करण्यासाठीची प्रक्रिभारतातून या, आवश्यक कागदपत्रे, कायदेशीर तरतुदी, दर्जा व पॅकेजिंगसंबंधी नियम तसेच व्यवसायाचे विपणन करताना घ्यायची काळजी अशा विविध पैलूंवर दातार यांनी या शिष्टमंडळाला मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “ भारतातून आखाती देशांत विशेषतः संयुक्त अरब अमिरातीत होणारी निर्यात मुख्यतः सागरी वाहतुकीद्वारे होते आणि ती स्वस्त असते. मात्र या प्रवासाला साधारणतः २० दिवस लागत असल्याने शेल्फ लाईफ अत्यल्प असलेली नाशवंत उत्पादने विचारात घेऊ नयेत. किमान सहा महिने ते वर्षभर टिकणारी उत्पादने निवडावीत. आम्ही आमच्या सुपर स्टोअर्सच्या साखळीद्वारे आखाती बाजारपेठेत शुद्ध, स्वच्छ व अस्सल उत्पादने पुरवतो. हल्ली सेंद्रीय उत्पादनांवर ग्राहकांचा विशेष भर आहे. उत्पादनांचे पॅकेंजिग सुरक्षित व टॅम्परप्रूफ असावे. आम्ही आमच्या पिकॉक ब्रँडअंतर्गत अलिकडे पौष्टिक खपली गहू सादर केला. त्याला येथील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याच धर्तीवर नैसर्गिक, रसायनमुक्त, भेसळमुक्त व आरोग्यदायी कृषिउत्पादने व खाद्यउत्पादने पाठवल्यास उत्पादकांनाही समाधानकारक आर्थिक फायदा मिळेल.” भेसळ, ग्राहकांचे नुकसान, फसवणूक किंवा अनारोग्यकारक उत्पादनांबाबत आखाती देशांचे धोरण व कायदे कडक असल्याने निर्यातदाराने काटेकोर राहण्याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.

महाराष्ट्रातील उत्पादक व व्यावसायिकांना आगामी काळात प्रगतीच्या, निर्यातीच्या व व्यवसायवाढीच्या मोठ्या संधी असल्याचे सांगताना ते म्हणाले, “ मुंबईजवळ पालघर जिल्ह्यात वाढवण हे आंतरराष्ट्रीय बंदर आकाराला येत आहे. पुढील दहा वर्षांत ते संपूर्ण कार्यान्वित होईल. त्यामुळे महाराष्ट्राला मुंबईजवळ जेएनपीटी व वाढवण अशी दोन मोठी आंतरराष्ट्रीय बंदरे जागतिक निर्यातीसाठी उपलब्ध असतील. महाराष्ट्रात पायाभूत सुविधा झपाट्याने विकसित होत आहेत. समृद्धी महामार्गाने विदर्भाला मुंबईशी जोडले आहे. अशा प्रस्तावित महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा फायदा वेळेत उठवण्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे. ज्यांना उत्तम व यशस्वी उद्योजक तथा निर्यातदार बनायचे असेल त्यांनी आतापासूनच आयात-निर्यात व्यवहारांची माहिती घ्यावी, शक्य असल्यास त्याचा अभ्यासक्रम शिकावा आणि उद्योग उभारुन दोन-तीन वर्षांत निर्यात सुरू करावी म्हणजे अजुन दहा वर्षांनी विकसित महाराष्ट्राच्या प्रगतीत तेही सुस्थापित बनून योगदान देऊ शकतील. महाराष्ट्रात अनेक गरीब, मेहनती व होतकरु तरुण उद्योजकतेची, समृद्धीची स्वप्ने बघत आहेत आणि त्यांच्यातून हजारो उद्योजक निर्माण व्हावेत, हे माझे स्वप्न आहे. मी गेली ३० वर्षे दुबईत मराठी संस्कृती व उद्यमाच्या प्रसारासाठी कार्यरत आहे. त्यामुळे सोलापूरप्रमाणेच महाराष्ट्रातील अन्य शहरांतील तरुणांनीही नावीन्यपूर्ण उत्पादने व कल्पनांसह पुढे यावे. त्यांना मी जरुर मार्गदर्शन करेन.”

या शिष्टमंडळात आमदार देशमुख यांच्याखेरीज सोलापूर गार्मेन्ट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे संचालक अमित जैन, उद्यम पीएएचएसयूआय फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश गुराणी, अल्पेश संकलेचा, विजय पाटील, यश जैन, प्रदीप जैन, आनंद झाड आणि चंद्रशेखर जाधव आदींचा समावेश होता.

पशुसंवर्धन विभागात अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाद्वारे बदल्यांचा ऐतिहासिक निर्णय

0

राज्यभरात मनुष्यबळाचा समतोल साधण्याचा प्रयत्न

पुणे, दि.१४: राज्याच्या सर्व भागांमध्ये पशुवैद्यकीय सेवांचा योग्य समतोल, तसेच बदल्यांची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व न्याय्य पद्धतीने पार पडावी, या उद्देशाने पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पशुधन विकास अधिकारी (गट-अ) व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (गट-अ) या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाच्या माध्यमातून करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे केवळ बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक होणार नाही, तर विभागात कार्यरत अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तृत्व व कार्यक्षमता यानुसार योग्य ठिकाणी नियुक्ती मिळण्यास मदत होणार आहे. तसेच, राज्याच्या विविध भागांमध्ये पशुसंवर्धनाच्या कामकाजात गुणवत्ता वाढवण्यास यामुळे हातभार लागणार आहे.

समुपदेशनाद्वारे बदल्यांची ही प्रक्रिया १५ व १६ मे २०२५ रोजी पुणे येथील आयुक्त, पशुसंवर्धन कार्यालयात पार पडणार आहे. यामध्ये सुमारे ६५० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रक्रियेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य असून, त्यांना उपलब्ध पदविकल्पांपैकी त्यांच्या पसंतीनुसार पर्याय निवडण्याची संधी दिली जाणार आहे.

याव्यतिरिक्त, विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने अलीकडेच विभागाची पुनर्रचना करण्यात आली असून, त्याअंतर्गत काही नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. या नव्या पदांच्या नियुक्त्या देखील समुपदेशन प्रक्रियेद्वारेच पार पडणार आहेत.

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे: समुपदेशन बदली प्रक्रिया अधिकाऱ्यांसाठी पारदर्शक, न्याय्य आणि समान संधी उपलब्ध करणारी आहे. प्रशासनातील कार्यक्षमता आणि पशुपालकांपर्यंत उच्च दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा पोहोचवण्याचा उद्देश यामागे असून, राज्याच्या पशुसंवर्धन क्षेत्राला नवी दिशा देण्याचे हे पाऊल आहे.”

हा निर्णय विभागाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, इतर विभागांसाठीही एक आदर्श ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्तांलयाचे उपायुक्त डॉ. प्रशांत भड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

कसबा पेठेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात साजरा

0

शिव पर्वती विवाह सोहळा’ ठरला जन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख आकर्षण

पुणे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात कसबा पेठेतील फडके हौद चौकात साजरा करण्यात आला. यामध्ये संभाजी महाराज यांच्या 12 फूटी मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध
श्रीमंत शिवशाही प्रतिष्ठान गणेश लोणारे प्रस्तुत ‘शिव पर्वती विवाह सोहळा’(जिवंत देखावा)या जन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले.

या भव्य, नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन किशोर उर्फ राजेंद्र भगवान तरवडे, यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणालदादा मालुसरे, छत्रपती संभाजी महाराजांचे दुधभाऊ, विरधाराऊ माता गाडे पाटील यांचे वंशज सरनोबत अमितदादा गाडे पाटील, किल्ले रायगड निर्माता हिरोजी इंदलकर यांचे वंशज समीरजी इंदलकर, सरसेनापती विरबाजी पासलकर यांचे वंशज सरसेनापती अविनाशदादा पासलकर, सरसेनापती हंबीरराव मोहिते पाटील यांचे वंशज राजेंद्रदादा मोहिते पाटील,गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य विश्वस्त. श्रीमंत सचिनदादा भोसले पाटील, सरनौबत येसाजी कंक यांचे 14 वे वंशज रविंद्र श्रीपतराव कंक,पुणे शहर भाजपा अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज चित्रपटातील अभिनेते अनुप सिंग ठाकूर उपस्थित होते.

यावेळी आदित्य जयकुमार गोरे, बाळासाहेब दाभेकर,अमित कंक,सम्यक साबळे,संजय अग्रवाल,ज्योती सावर्डेकर,जयेश टाक, माजी नगरसेवक योगेश समेळ,विशाल धनवडे,पल्लवीताई जावळे, या मान्यवरांनी हजेरी लावली.यावेळी त्र्यंबकेश्वर प्रतिष्ठान आखाडा, कसबा पेठ शिवकालीन मर्दानी खेळ सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

याप्रसंगी बोलताना आयोजक किशोर उर्फ राजेंद्र भगवान तरवडे म्हणाले, यंदा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे चौथे वर्ष आहे. जन्मोत्सव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी प्रत्येक गावातील आणि शहरातील मंडळांनी धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती वैविध्यपूर्ण उपक्रमांनी साजरी केली पाहिजे.

बँकॉकहून पुण्यात तस्करी:10.3 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा पकडला-तिघांना अटक

पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील अधिकाऱ्यांना बँकाकवरुन पुणे विमानतळावर येणाऱ्या विमानातील दाेन प्रवाशांकडे संशयित सामान आहे. त्यानुसार, 12 मे राेजी बँकाकहून पुण्यात आलेल्या विमानातील प्रवाशांच्या सामानाची सखाेल तपासणी केली असता, दाेन प्रवाशांचे सामानात 11 हवाबंद पाऊच मिळून आले. त्याची तपासणी केली असता ते 10.3 काेटी रुपये किंमतीचे बाजारमूल्य असलेले 10.3 किलाे हायड्राेपाेनिक गेंड हा उच्च नशा क्षमता असलेला गांजा सारखा अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी डीआरआयने दाेन प्रवासी तसेच मुंबईतील एक वितरक अशा एकूण तीनजणांना अटक केली आहे. पुणे विमानतळावर संबंधित प्रवासी यांच्या सामानाची तपासणी केल्यावर, त्यात 9864 ग्रॅम हिरवट ढेकळासारखा पदार्थ मिळून आला हाेता. त्यामुळे सीमाशुल्क विभागाचे अधिकाऱ्यांनी सदर पदार्थ हा फील्ड टेस्ट कीट मध्ये टाकून त्याची तपासणी केली असता त्या पदार्थाचा अहवाल सकारात्मक आला. त्यानुसार 10.3 किलाे अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. सदर माल घेणाऱ्या मुंबईतील एका वितरकाला देखील तपासात याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्या झडतीत 478 ग्रॅम चरस आणि हायड्राेपाेनिक गेंड असा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईत रहाणाऱ्या सदर तीन आराेपी विराेधात एनडीपीएस कायदा 1985 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डीआरआय पुणे पथक करत आहे.

साध्या,स्वच्छ स्वच्छतागृहाची मागणी पूर्ण करू शकला नाहीत अन आता 86 लाखाचे एसी स्वच्छतागृहे नेमकी कुणासाठी ?

ई टॉयलेट गुंडाळून खाणाऱ्या महापालिकेला आप चा सवाल

पुणे- प्रत्येक रस्त्यावर 500 मीटर अंतरामध्ये स्वच्छ व सुलभपणे वापर करता येईल अशा पद्धतीची स्वच्छता गृहे असावी अशी सामान्य जनतेची अपेक्षा ५० वर्षात पूर्ण करू न शकलेल्या आणि ई टॉयलेट गुंडाळून खाणाऱ्या महापालिकेला 86 लाखाचे एसी स्वच्छतागृहे नेमकी कुणासाठी ? असा सवाल आम आदमी परतीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

ते म्हणाले,’ स्वच्छतागृहे हा विषय सामान्य नागरिक, प्रवासी आणि मुख्यत्वे महिलांचा जिव्हाळ्याचा गरजेचा विषय असतो. याबाबत राज्य शासनाने ही वेळोवेळी महामार्गावर स्वच्छतागृह उभी करू असे आश्वासन नेहमीच दिले आहे, परंतु प्रत्यक्षात स्वच्छ स्वच्छतागृहे देणे शासनाला जमलेले नाही. पुण्यासारख्या शहरातही ई टॉयलेट नावाने सुद्धा सव्वा दोन कोटी रुपयांचा मोठा खर्च करून ११ स्वच्छतागृहे उभी केली गेली व आता ती सर्व बंद पडली असून त्याच्या दुरुस्ती व देखभाल खर्चही प्रशासनाला परवडत नाही.त्यानंतर राज्य सरकारच्या मदतीने प्रत्येकी ३६ लाखाची एकूण १५ आकांक्षा स्वच्छतागृहे उभी करण्याचे टेंडर काढण्यात आले. त्यामध्ये सुद्धा खर्चिक स्वरूपातील विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर होता. एकच जागी महिला,पुरुष, तृतीय पंथी साठी एकूण दहा सीटचे टॉयलेट असे त्याचे स्वरूप होते. अजूनही या आकांक्षा व्हीआयपी स्वच्छतागृहांचा पत्ता नाही.आणि आतातर तब्बल प्रत्येकी 86 लाखाचे एसी स्वच्छतागृह (AC toilets) उभे करण्याचे धोरण महानगरपालिका (PMC) राबवत आहे.महिलांच्या संदर्भामध्ये गर्दीच्या ठिकाणांपासून, रस्त्यांवर 500 मीटर अंतरामध्ये स्वच्छ व सुलभपणे वापर करता येईल अशा पद्धतीची स्वच्छता गृहे असावी अशी अपेक्षा सामान्य जनता व्यक्त करीत आलेली आहे. असे असताना बांधकामावर वाढीव खर्च आणि त्याच्या देखभालीची हेळसांड असे महानगरपालिकेचे धोरण आहे असा आरोप आप परवा मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने काही निकष घालून देत रस्त्यावरील स्वच्छतागृहे कशी असावीत या संदर्भात पुणे महानगरपालिकेत आदेश दिलेले होते. आता महानगरपालिकेने ते आदेश कचऱ्याच्या डब्यात टाकले असावेत.ई टॉयलेट मध्ये बंद पडणारी वेंडिंग मशीन, ऑटोमॅटिक कंट्रोल होते तर आकांक्षा स्वच्छतागृहामध्ये नॅपकिन व सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन योजले आहेत. आणि सध्या प्रस्तावित नवी स्वच्छतागृह वातानुकूलित असणार आहेत . प्रत्यक्षामध्ये शहराच्या प्रवेशद्वाराजवळ वा पुणे स्थानकावर अशा वातानुकूलित स्वच्छतागृहांची मागणी कुठल्याही प्रवाशांनी, संघटनांनी व्यक्त केलेली नसून केवळ स्वच्छ सुटसुटीत आणि मुबलक संख्येने ही स्वच्छतागृह असावी अशी अपेक्षा आहे.
त्यामुळे महानगरपालिकेने ही खर्चिक स्वच्छतागृहे उभी न करता स्वच्छ ,स्वस्तातील व मूलभूत सुविधा असलेली, कमी सीटची परंतु अधिक संख्येने शहरात असावी अशी आम आदमी पार्टीची (Aap) मागणी आहे.खर्चिक सुविधा असलेली बांधकामे मग ती दवाखाने असो किंवा शाळा किंवा स्वच्छतागृहे ,ही मुख्यत्वे कंत्राटदारांच्या सोयीसाठी महानगरपालिका बांधते का अशी शंका आहे असेही मुकुंद किर्दत (Mukund Kirdat) यांनी म्हटले आहे.

भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राजीव गांधींच्या बलिदान दिनी २१ मे रोजी राज्यभर काँग्रेसची तिरंगा यात्रा.

मुंबई, दि. १४ मे २५
राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात अवकाळी पावासाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजपा युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले आहे. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळणारी १ रुपयात पीक विमा योजना सरकारने बंद करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. पीक कापणीवर आधारीत नवी विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नाही. पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे, ज्यांनी घोटाळा केला त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक सरकारमध्ये नाही. या योजनेत काही त्रुटी असतील तर त्या दूर करून योजना राबवली पाहिजे पण सरकारने योजनाच रद्द केली. १ रुपयात पीक विमा योजना ही पुन्हा लागू करावी अशी काँग्रेसची मागणी असल्याचे सपकाळ म्हणाले..

खरीपासाठी सरकारची तयारी नाही..
खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. बि बियाणे, खते यांचा मुबलक साठा उपलब्ध करून देणे सरकारची जबाबदारी आहे पण सरकारच्या कृषी विभागाची काहीच तयारी दिसत नाही. बोगस बियाणे विकून व्यापारी शेतक-यांची फसवणूक करत आहेत. राज्यभर बोगस बियाण्यांचा सुळसुळाट सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे खते बियाणे लिंकिंग करून व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. सरकार फक्त कारवाईच्या घोषणा करते पण कारवाई काही करत नाही. आतातरी सरकारने जागे व्हावे व लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.

आदिवासी, सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवणे असंवैधानिक…
भाजपा युती सरकारचा कारभार म्हणजे सावळा गोंधळ आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी या सरकारने लाडकी बहिण सारख्या योजनांसाठी वळवला हे असंवैधानिक आहे. दलित, आदिवासी, ओबीसी समाजासाठी असलेला निधी सरकारने वळवला आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. यासंदर्भात महामहिम राज्यपाल यांनी सरकारला जाब विचारला पाहिजे. योजनांसाठी निधी नाही हे चित्र राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्याचे द्योतक आहे. राज्य सरकारकडे निधी नसेल तर फडणवीस, शिंदे व अजित पवार यांनी केंद्राकडून राज्यासाठी विशेष पॅकेज आणून लाडक्या बहिणींना २१०० रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, असेही सपकाळ म्हणाले.

केंद्र सरकारने सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत..
पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानला अद्दल घडवावी यासाठी सर्व देश एकजूट झाला होता. काँग्रेस पक्षासह सर्व विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या पाठिशी खंबीरपणे उभे होते. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे कंबरडे मोडत असताना अचानक शस्त्रसंधीचा निर्णय घ्यावा लागला यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आपले जवान शर्थीने लढत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा कशी केली? भारत पाकिस्तानमध्ये अमेरिका मध्यस्थी करत आहे का? तसे असेल तर शिमला करार रद्द केला आहे का? डोनाल्ड ट्रम्प यांनी जे जाहीरपणे सांगितले ते भारत सरकारला मान्य आहे का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देशातील जनतेला सरकारने द्यावीत, त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे. सर्वपक्षीय बैठकीलाही पंतप्रधान उपस्थित नव्हते, त्यामुळे जनेच्या मनात शंका आहेत, त्यांचे समाधान करावे, असेही सपकाळ म्हणाले..

२१ मे रोजी काँग्रेसची राज्यात तिरंगा यात्रा..
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी आपल्या शौर्याने दैदिप्यमान कामगिरी केली आहे. आपल्या जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच महात्मा गांधी ते पहलगाम अतिरेकी हल्ल्यात बलिदान दिलेल्यांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी काँग्रेस पक्ष माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बलिदान दिनी २१ मे राजी राज्यातील सर्व जिल्ह्यात तिरंगा यात्रा काढणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

शरद पवार यांची सदिच्छा भेट…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार हाती घेतल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलेली नव्हती. आज त्यांची वेळ घेऊन भेट घेतली. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना राजकीय व सामाजिक क्षेत्रातील ५० वर्षांचा मोठा अनुभव आहे. ही सदिच्छा भेट होती असे हर्षवर्धन यांनी सांगितले.

पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि. १४: हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता सर्व विभागांनी पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी आणि आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारी विभागस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त महेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, तसेच विभागातील सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, जिल्हास्तरावर महसूल, पोलीस, जलसंपदा, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य विभाग आदींनी समन्वयासाठी बैठक घ्यावी. औषधे आणि रास्तभाव दुकानातील अन्नधान्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी. पूरस्थितीत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी. पाऊस अधिक झाल्यास दळणवळण आणि वाहतूक सुविधा कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यात २४ तास यंत्रणा कार्यरत ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त म्हणाले, यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने जलसंपदा विभागाने सीडॅक प्रतिमान उपयोगात आणून पूरस्थितीची माहिती देण्याचे नियोजन करावे. आवश्यक उपाययोजनांसाठी हवामान विभागाशी संपर्क ठेवावा. जलसंपदा विभागाने पुणे विभागात असणाऱ्या नद्यांवरील पुलावर धोका पातळी चिन्हांकित करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारती आणि पुलांची तपासणी करावी. पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी निवारा केंद्रांचे नियोजन करावे. आवश्यक तेथे जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाने आंतरराज्य बैठका तातडीने घ्याव्यात. जलसंपदा विभागाने पूर परिस्थितीचा नेहमी सामना करणाऱ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

मागील वर्षीच्या कामगिरीसाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफला धन्यवाद देऊन डॉ. पुलकुंडवार म्हणाले, एनडीआरएफने पुण्यासाठी २ पथके कायमस्वरूपी ठेवावीत आणि एक पथक राखीव असावे. तर कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यात प्रत्येकी एक पथक असावे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर परिस्थितीत वाहतूक वळविण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी विभागातील नियोजनाविषयी माहिती दिली. पूरस्थितीची पूर्व कल्पना देण्यासाठी जलसंपदा विभागाने सीडॅक आणि हवामान विभागाशी समन्वय ठेवण्याच्या सूचना पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या.

बैठकीला आरोग्य, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, एनडीआरएफ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज ठाकरे- राणे यांनी पक्षावर दावा केला नाही:अजित पवार- एकनाथ शिंदेंनी अमित शहांच्या मदतीने पक्ष पळवला; संजय राऊतांचा आरोप

नाशिक- राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी पक्ष सोडला तेव्हा पक्षावर दावा केला नाही. या दोन्ही नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर स्वत:चा पक्ष स्थापन केला. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मात्र, पक्ष पळवला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते.

अजित पवार हे अमित शहा यांच्या मदतीने शरद पवार यांचा पक्ष पळवून घेऊन गेले आहेत. मी या बाबतीत नेहमीच दोन नेत्यांचे कौतुक करतो. त्यातील एक नारायण राणे यांनी पक्ष सोडला आणि त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यांना पक्ष चालवायला जमला नाही, त्यामुळे ते दुसऱ्या पक्षात गेले. दुसरे राज ठाकरे यांनी देखील स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यांचे आणि आमचे मतभेद झाले मात्र, त्यांनी स्वतःचा पक्ष काढून राजकारण केले. एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे त्यांनी शिवसेना माझीच आहे, असे कधी सांगितले नाही. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात आणि नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यात हा फरक असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचे स्वागत तर अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याला संजय राऊत विरोध करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात संजय राऊत यांनी हे उत्तर दिले आहे. राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे. तेथे कोणीही जाऊन पदवी घेऊ शकते, अशीच परिस्थिती आहे. मात्र त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नये, ही आमची अट असल्याचे मी म्हणणार नाही. मात्र ही अपेक्षा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी हे भाष्य केले आहे.

सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत राहावे आणि अजित पवार यांनी महाराष्ट्र सांभाळावा हे त्यांचे पहिल्यापासूनच ठरलेले आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे पहिल्यापासूनच दिल्लीमध्ये काम करत आहे. मात्र दिल्ली सांभाळण्याची जबाबदारी अजित पवार यांनी आता दाऊद इब्राहिम म्हणजेच भ्रष्ट प्रफुल्ल पटेल यांना दिली आहे. त्यांना राष्ट्रीय नेतृत्वाची जबाबदारी आहे. ते आता काम पाहत आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळेंचा प्रश्नच येत नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचा आहे तर अजित पवार यांचा हा फुटलेला गट असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. तसेच मूळ शिवसेना ही देखील उद्धव ठाकरे यांची आहे. तर एकनाथ शिंदे यांचा गट आहे. अमित शहा यांनी ठरवले म्हणून लोक ते स्वीकारणार नाहीत, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे.

ईव्हीएमची तयारी झाल्यानंतर सरकार निवडणुका जाहीर करेल-सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सरकारने लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात. आमची पूर्ण तयारी झाली असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मात्र सरकारच्या वतीने अद्याप ईव्हीएमची तयारी झालेली दिसत नाही. त्यांची ईव्हीएमची तयारी पूर्ण झाल्यानंतर ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करतील, असे वाटत असल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे. सर्व जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महा विकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढण्याची तयारी करत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

राज्यात ज्या-ज्या जिल्ह्यामध्ये शक्य आहे, त्या- त्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महा विकास आघाडी म्हणून लढणार आहे. यामध्ये काही शंका नाही. काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये वेगळे लढण्याबाबत चर्चा होऊ शकते. मात्र शक्य तेवढ्या जिल्ह्यामध्ये आम्ही एकत्र लढणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षांमध्ये उत्तम संवाद सुरू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही एकत्र लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जवळपास सर्वच महानगरपालिका आम्ही एकत्रच लढायला आमची हरकत नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त ‘जयतु शंभू’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सासवड येथे उद्घाटन

येत्या वर्षभरात बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणार -सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

पुणे, दि. १४ : येत्या ३६५ दिवसात महाराष्ट्राची कला संस्कृती, नाट्य संस्कृती लोककला, लोकसंगीत, महान विभूतींना अभिवादन आदींचे १ हजार २०० कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृहात आयोजित ‘जयतु शंभू’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री ॲड. शेलार बोलत होते. यावेळी आमदार विजय शिवतारे, ॲड. राहुल कुल, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे उपस्थित होते.

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती प्रथमच राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येत असल्याचे सांगून मंत्री ॲड. शेलार म्हणाले, त्यानिमित्ताने हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यापुढे दरवर्षी छत्रपती संभाजी महाराजांना सलामी म्हणून असा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित केला जाईल.

छत्रपती संभाजी महाराज हे सर्वांचे प्रेरणादायी होते. आदर्श पुत्र, आदर्श राजा, आदर्श योद्धा, पराक्रमी नेतृत्व कसे असावे याचा आदर्श छत्रपती संभाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य जतन करण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी मृत्यू पत्करला पण धर्म सोडला नाही म्हणून त्यांना धर्मरक्षक म्हटले जाते. राज्यकारभार, न्यायनिवाडा, शत्रूशी झुंज यांचे आदर्श उदाहरण छत्रपती संभाजी महाराज असून त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. ते संस्कृत, हिंदीचे भाषा प्रभू होते, असेही ते म्हणाले.

राज्यशासनाने यावर्षी पहिल्या वर्षीचा छत्रपती संभाजी महाराज प्रेरणागीत पुरस्कार घोषित केला. तो क्रांतिवीर वि. दा. सावरकर यांच्या ‘अनादी मी, अनंत मी’ या गीताला दिला. पॅरिसला मार्सेलीस येथून हा पहिला पुरस्कार जाहीर केला. यावर्षी अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेव्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रम सुरू करण्यात येत असून एक कार्यक्रम संत सोपानदेव यांच्या समाधी ठिकाणी आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आमदार विजय शिवतारे म्हणाले, शंभूराजांचा जन्म पुरंदर येथे झाल्यामुळे येथे त्यांची शासकीय जयंती साजरी व्हावी अशी मागणी दोन वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्री यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी तत्काळ मान्यता आणि तरतूद केली असे सांगून श्री. शिवतारे यांनी पुरंदर तालुक्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले.

आमदार राहुल कुल म्हणाले, संपूर्ण देशभरात ज्या ज्या वेळी क्रांती झाली त्यामध्ये पुणे आणि परिसराचा मोठा वाटा आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा इतिहास या जिल्ह्यामध्ये घडला. त्यामुळे हा वारसा जतन करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे.

या सांस्कृतिक कार्यक्रमात ढोल पथक, मर्दानी खेळ, वासुदेव, गोंधळी असे शंभरहून अधिक लोक कलाकारांनी आपली कला सादर केली. प्रामुख्याने स्नेहलता तावडे, तेजा देवकर, ऋतुराज फडके हे कलाकार यात सहभागी झाले. निवेदन प्रसिद्ध अभिनेत्री समीरा गुजर यांनी केले. नृत्यदिग्दर्शन राकेश शिर्के यांनी केले.