Home Blog Page 520

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या “सिंहस्थ कुंभमेळा २०२७” नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांकडे केली सविस्तर शिफारस

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा सोहळा आहे. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सविस्तर निवेदन पाठवून नियोजन, अंमलबजावणी आणि समन्वयाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन व कृतीची विनंती केली आहे.

दिनांक २३ मे २०२५ रोजी नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, नाशिक महानगरपालिका, आरोग्य, बांधकाम आणि इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात सखोल चर्चा झाली.

डॉ. गोऱ्हे यांनी या पत्रात उल्लेख केला आहे की, महिलांपासून ज्येष्ठ नागरिक, बालक आणि दिव्यांग भाविकांसाठी स्वतंत्र व सुरक्षित चेंजिंग रूम, ‘हिरकणी कक्ष’, तसेच मदत केंद्र व महिला पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. गर्दीमुळे हरवलेली बालके सुरक्षितरित्या पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी, अशीही त्यांनी विनंती केली.

गोदावरी स्वच्छता अभियानास अधिक गती देणे, शौचालये, मैला व्यवस्थापन, घनकचरा प्रक्रिया आणि पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यावरही त्यांनी भर दिला. या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितता साधने व आवश्यक लसीकरण देण्यावरही त्यांनी लक्ष वेधले आहे.

सिंहस्थ मेळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांसाठी वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक सोयीसुविधा सुलभ व सुगम होण्यासाठी विशेष बसेस, पायी मार्गांचे नियोजन, महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृह, तसेच चांदवड, शिर्डी, शनि शिंगणापूर, सप्तश्रृंगीगड यांसारख्या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांशी दळणवळण सुधारण्याची शिफारस केली आहे.

आरोग्य सेवांच्या दृष्टिकोनातून, खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयांचा सहभाग सुनिश्चित करणे, तात्पुरती आरोग्य केंद्रे उभारणे, तपासणी शिबिरे आणि ॲम्ब्युलन्स सेवा कार्यान्वित करणे या बाबींवरही त्यांनी भर दिला आहे.

धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध करण्यासाठी प्रवचन, सत्संग आणि स्थानिक-राष्ट्रीय कलाकारांच्या सहभागातून कार्यक्रमांचे आयोजन करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. श्रद्धा व संस्कृतीचा संगम साधणारे उपक्रम राबवण्यावर डॉ. गोऱ्हे यांनी विशेष भर दिला आहे.

कुंभमेळ्यात सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागांमध्ये सायबर सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना राबवण्याची गरज त्यांनी नमूद केली आहे. गर्दीचे व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञानाचा उपयोगही प्रभावीपणे करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी नाशिकमधील सर्व प्रमुख मंदिरांची माहिती एकत्र करून प्रचार व प्रसार करणे, मंदिरांकडे जाणाऱ्या रस्त्यांची डागडुजी आणि पायाभूत सुविधा सुधारण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्याची पारदर्शकता राखण्यासाठी तो विधिमंडळ सदस्यांना उपलब्ध करून द्यावा आणि सर्व लोकप्रतिनिधींना नियोजनात सक्रिय सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी पत्रात केले आहे.

या निवेदनाच्या माध्यमातून डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली असून, संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हे आयोजन देशासाठी एक आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

डी.एल.एड. द्वितीय वर्षाच्या परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ३० मे रोजी

पुणे, दि.२९: अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- २०२५ (टीएआयटी) साठी प्रविष्ट झालेल्या डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन (डी.एल.एड.) द्वितीय वर्षाचे अंतिम सत्राच्या परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांची टीएआयटीची ऑनलाइन परीक्षा ३ जून ऐवजी ३० मे २०२५ रोजी नियोजित आहे. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी बदलाची नोंद घेऊन सुधारित तारखेला परीक्षेस उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) २०२५ या परीक्षेच्या ऑनलाईन पद्धतीने घेण्याची नियोजन २७ ते ३० मे २०२५ व २ ते ५ जून २०२५ या कालावधीत करण्यात आलेली आहे. तथापि, १ हजार १०७ उर्दू माध्यमाच्या विद्यार्थी/उमेदवारांची डी.एल.एड. परीक्षा व (टीएआयटी) परीक्षा एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी हा बदल करण्यात आला असून विद्यार्थ्यांनी स्वतःची माहिती तपासून प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने प्राप्त करून घ्यावीत. नियोजित परीक्षेस उपस्थित व्हावे, याबाबत सर्वस्वी जबाबदारी उमेदवारावर राहील याची नोंद घ्यावी, असेही आयुक्तांनी कळविली आहे.
0000

पुणे महापालिकेकडून ३७ खेळाडूंना ८७ लाख २० हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती समारंभपूर्वक प्रदान

पुणे -पुणे महापालिकेचा क्रीडा शिष्यवृत्ती प्रदान समारंभ आज येथे संपन्न झाला यावेळी ३७ खेळाडूंना ८७ लाख २० हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

महानगरपालिका क्रीडा विभागाच्या अंर्तगत सुधारीत क्रीडा धोरणानुसार खेळाडूंसाठी विविध १८ योजना राबवण्यात येत आहेत. यामधील उदयोन्मुख खेळाडूंसाठी क्रीडा शिष्यवृत्ती अंतर्गत त्यांना स्पर्धा साहित्य खरेदी किंवा स्पर्धेच्या तयारीसाठी ठराविक रक्कम धनादेशाद्वारे आदा करण्यात येते.
सन २०२४-२५ या वर्षाकरीता खेळाडूंना शिष्यवृत्ती देणेकामी क्रीडा विभागाकडून जाहिरात देण्यात आली होती. त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून एकूण ७४३ खेळाडूंनी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३४४ खेळाडू शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. क्रीडा शिष्यवृत्तीसाठी पात्र खेळाडूंना एकूण ८७,२०,०००/- इतक्या रकमेचे धनादेश, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरण समारंभ आज दि.२९/०५/२०२५ रोजी सकाळी १० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाला .
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, यांच्यासह उप आयुक्त (प्राथमिक शिक्षण विभाग)आशा राऊत, उप आयुक्त (मालमत्ता व व्यवस्थापन) श्रीमती प्रतिभा पाटील, मुख्य कामगार अधिकारी नितिन केंजळे , क्रीडा अधिकारी प्राथ. शिक्षण विभाग माणिक देवकर इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश परदेशी यांनी केले तसेच क्रीडा विभागाच्या विविध योजना व क्रीडा विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामांबाबत क्रीडा विभागाच्या उप आयुक्त किशोरी शिंदे यांनी माहिती दिली. आशा राऊत यांनी मनपा शिक्षण विभागाच्या ३७ खेळाडूंना शिष्यवृत्ती दिल्याबद्दल आभार मानले, तसेच या वर्षी १०० हुन अधिक शिक्षण विभागाकडील खेळाडू विविध स्पर्धामध्ये प्राविण्य प्राप्त करतील असे सांगितले. आंतरराष्ट्रीय खेळाडू सिद्धार्थ कांबळे आणि राष्ट्रीय खेळाडू सुचिता खरवंडीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मनपाचे आभार मानले. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचून स्पर्धा जिंकण्यासाठी खेळाडू अथक प्रयत्न करतो, त्याच्या या प्रयत्नांना आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक असून पुणे मनपा क्रीडा शिष्यवृत्तीच्या माध्यमातून खेळाडूंना आर्थिक सहाय्य करीत आहे. अति. महापालिका आयुक्त यांनी क्रीडा नर्सरी व स्पोर्ट्स रिहॅब सेंटर सुरु करणेकरीता क्रीडा विभाग प्रयत्नशील असून क्रीडा नर्सरी प्रकल्प सुरू करणेस महापालिका आयुक्त यांची मान्यता प्राप्त झाली आहे असे सांगितले.
क्रीडा शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम अत्यंत आनंदमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करून खेळाडू व पालकांना गौरविण्यात आल्याबद्दल सर्व खेळाडू व पालकांनी पुणे महानगरपालिकेचे आभार व्यक्त केले.

मेट्रो तीनचे काम अपूर्ण असतानाही उद्घाटन का? सरकारी गलथानपणा मुळे आचार्य अत्रे स्टेशनमध्ये पाणी शिरले.

मुंबई, दि. २९ मे २०२५
मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे पण भाजपा युती सरकारच्या अव्यवस्थापनामुळे पहिल्याच पावसात मुंबई जलमय झाली. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला असतानाही आपत्ती व्यवस्थापन विभाग अथवा बीएमसीने कोणतीच पूर्व तयारी का केली नाही. भुयारी मेट्रो स्टेशनमध्येच पाणी शिरले असे नाही तर गोवंडी, वांद्रे, जुहू भागही जलमय झाला होता. भाजपा युती सरकारचा भ्रष्टाचार व गैरव्यवस्थापनामुळेच मुंबई जलमय झाली, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना अतुल लोंढे यांनी भाजपा युती सरकारचा भोंगळ कारभार व भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले, ते पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे मागील १० वर्षापासून नगरविकास विभागाचे मंत्री आहेत, पण त्यांच्या विभागाने मुंबईची पुरती वाट लावली आहे, पावसाने नगरविकास विभागाच्या धोरणांचे धिंडवडे काढले. मुंबईच्या जनतेची कसलीही काळजी न करता केवळ भ्रष्टाचारात हे सरकार आकंठ बुडाले आहे. हवामान खात्याने इशारा दिला असताना त्याकडे दुर्लक्ष का केले? बीएमसीने आगाऊ सूचना का दिल्या नाहीत? पावसाच्या (SOP) असतात त्याची अंमलबजावणी का झाली नाही ? पाऊस ८ वाजता सुरु झाला आणि १२ वाजेपर्यंत प्रशासन झापले होते का? असे प्रश्न उपस्थित केले.

मेट्रो-३ चे काम अपूर्ण असतानाही त्याचे उद्घाटन करण्याची घाई का केली? आचार्य अत्रे स्टेशनमध्ये पाणी शिरले त्याची जबाबदारी कोणाची? मेट्रो स्टेशन कसे असावे त्यासाठी काही तांत्रिक बाबी आहेत. या स्टेशनला तीन प्रवेशद्वार तर तीन बाहेर पडण्याचे दरवाजे असायला हवेत पण या स्टेशनवर दोनच दरवाजे आहेत. या त्रुटींची तपासणी कोणत्या अधिकारी वा सल्लागाराने केली होती का? ४० मीमी पाऊस पडला तरी मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरु शकते याची माहिती कोणालाच नव्हती का? बीएमसी अधिकाऱ्यांची ड्युटी मंत्र्यांच्या शिष्टाचारासाठी लावली आहे, मुंबईकरांच्या कामासाठी नाही असे लोंढे म्हणाले…

फक्त आचार्य अत्रे मेट्रो स्टेशनमध्येच पाणी शिरले असे नाही तर गोवंडी, जूहू, वांद्रे भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले पण चर्चा फक्त मेट्रो स्टेशनची झाली. मुंबई जलमय झाली पण बीएमसीचे अधिकारी, ठेकेदार किंवा नगरविकास विभागाच्या कोणत्याच व्यक्तीवर कारवाई का झाली नाही. भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मग कारवाई कोणावर केली याचे उत्तरही त्यांनी द्यावे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे जबाबदारीपासून पळ काढू शकत नाहीत, त्यांना उत्तर द्यावेच लागेल, असे अतुल लोंढे म्हणाले.

बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाण सिटी सर्वे प्रक्रियेला सुरुवात – दिलीप वेडेपाटील यांच्या प्रयत्नांना यश

पुणे: बावधन खुर्द व बावधन बुद्रुक या गावांचा गावठाण सिटी सर्वे आजपासून औपचारिकपणे सुरू झाला आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी गेल्या ५ वर्षांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे माजी नगरसेवक दिलीप अण्णा वेडेपाटील यांचे अथक प्रयत्न आज यशस्वी झाले आहेत.
बावधन परिसरातील झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर गावठाण हद्दीचे अचूक आणि कायदेशीर मोजमाप होणे ही गावाच्या भविष्यकालीन विकासासाठी अत्यावश्यक बाब होती. मात्र ही प्रक्रिया अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. याला चालना देण्यासाठी दिलीप अण्णा वेडेपाटील यांनी शासन, महसूल विभाग, आणि जमाबंदी कार्यालयाशी सातत्याने संवाद साधून या विषयाला प्राधान्य देण्याची मागणी केली.
या प्रक्रियेस गती मिळवून देण्यासाठी त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची विशेष भेट घेऊन बावधन गावातील स्थिती सविस्तरपणे मांडली. या बैठकीदरम्यान जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, उपायुक्त राजेंद्र गोळे, तसेच जमाबंदी नगर भूमापन विभागाचे अधिकारी हे उपस्थित होते.
सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आजपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरु झाले असून गावठाण हद्द, खाजगी जमिनी, रस्ते, सार्वजनिक जागा, मंदिरे, शाळा, यांचा नकाशा व मालकी हक्कांचे दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे.

सिटी सर्वेचे नागरिकांना होणारे फायदे :
• मालमत्तेवर कायदेशीर हक्क सिद्ध होणार.
• जमिनीच्या नोंदी शासकीय दस्तऐवजांमध्ये समाविष्ट होतील.
• बँक कर्ज, वारसा नोंदणी यांसारख्या प्रक्रियेस सुलभता.
• शासकीय योजना व नागरी सुविधांसाठी अडथळे दूर.
• बावधन गावाच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळणार.

दिलीप अण्णा वेडेपाटील यांनी यावेळी सांगितले की,
“हा सिटी सर्वे म्हणजे फक्त नकाशा काढण्याची प्रक्रिया नसून, हे गावाच्या विकासाच्या दृष्टीने एक मूलभूत पाऊल आहे. गावातील प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर हक्क निश्चित व्हावा, हीच माझी भूमिका होती. आज ती पूर्ण होताना पाहून समाधान वाटतं. s”या ऐतिहासिक निर्णयामुळे बावधन गावाच्या भविष्यकालीन पायाभरणीत महत्त्वाची भर पडणार असून, येत्या काळात अनेक विकासकामांना गती मिळणार आहे.

ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकन न्यायालयाची स्थगिती:म्हणाले- राष्ट्राध्यक्ष त्यांच्या अधिकारक्षेत्राबाहेर जात आहेत

वाशिंग्टन -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला संघीय व्यापार न्यायालयाने स्थगिती दिली आहे आणि ते असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला आणि संविधानाच्या कक्षेबाहेर जाऊन हे शुल्क लादण्याचा प्रयत्न केला.मॅनहॅटनमधील फेडरल कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेडने ट्रम्प यांचे पाऊल बेकायदेशीर घोषित केले. न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायद्याचा (IEEPA) गैरवापर केला. हा कायदा आणीबाणीच्या काळात राष्ट्राध्यक्षांना काही अधिकार देतो, परंतु ट्रम्प यांनी कोणत्याही ठोस आधाराशिवाय त्याचा वापर केला हे न्यायालयाने मान्य केले.

या शुल्कांमुळे प्रभावित झालेल्या पाच लहान अमेरिकन व्यवसायांच्या वतीने लिबर्टी जस्टिस सेंटरने हा खटला दाखल केला.
१२ अमेरिकन आयातदारांनीही न्यायालयात याचिका दाखल केली होती.
दोघांनीही असा युक्तिवाद केला की, आयात केलेल्या वस्तूंच्या किमती वाढल्याने त्यांचा खर्च वाढत असल्याने आयात शुल्कामुळे लहान व्यवसायांना त्रास होत आहे. न्यायालयाने हे युक्तिवाद मान्य केले आणि असे म्हटले की राष्ट्राध्यक्षांना इतके मोठे शुल्क लादण्याचा संवैधानिक अधिकार नाही.

ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे की, ते या निर्णयाविरुद्ध तात्काळ अपील करतील. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया साइट्सवर दावा केला की “अमेरिका पुन्हा महान बनवण्यासाठी” त्यांचे टॅरिफ धोरण आवश्यक आहे. तथापि, न्यायालयाने असे सुचवले की, ट्रम्प व्यापार कायदा १९७४ च्या कलम १२२ अंतर्गत १५० दिवसांसाठी १५% पर्यंत शुल्क लादू शकतात, परंतु यासाठी देखील ठोस आधार आवश्यक आहे.

अपीलची वाट पाहत आहे: ट्रम्प प्रशासनाच्या अपीलवरील न्यायालयाचा पुढील निर्णय खटल्याची दिशा निश्चित करेल.
९० दिवसांची सवलत: इतर देशांसोबत व्यापार करार करता यावेत यासाठी ट्रम्प यांनी आधीच काही शुल्क ९० दिवसांसाठी पुढे ढकलले होते. आता न्यायालयाच्या निर्णयामुळे हे धोरण आणखी कमकुवत झाले आहे.
जागतिक अर्थव्यवस्था: जागतिक व्यापार संघटनेने (WTO) आधीच इशारा दिला आहे की, ट्रम्पच्या शुल्कामुळे जागतिक व्यापारात ८१% पर्यंत घट होऊ शकते. न्यायालयाच्या या निर्णयामुळे हा धोका कमी होतो.
२ एप्रिल रोजी ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर कर लादले.

२ एप्रिल २०२५ रोजी ट्रम्प यांनी ‘मुक्ती दिन’ असे नाव दिले आणि जगभरातील १०० हून अधिक देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर नवीन शुल्क लावण्याची घोषणा केली. त्यांनी असा दावा केला की या शुल्कांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि अमेरिकेकडून कमी वस्तू खरेदी करणाऱ्या आणि जास्त विक्री करणाऱ्या देशांना धडा शिकवला जाईल.

तथापि, नंतर चीन वगळता सर्व देशांवरील शुल्क ९० दिवसांसाठी बंदी घालण्यात आली. ट्रम्पच्या टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून चीननेही टॅरिफ लादला होता आणि म्हणूनच चीनला टॅरिफमधून सूट देण्यात आली. चीनचा कर १४५% पर्यंत वाढवण्यात आला. चर्चेनंतर चीनवरील कर देखील कमी करण्यात आले.

भारतावरील करांबद्दल ट्रम्प म्हणाले होते,
भारत अमेरिकेवर ५२% पर्यंत कर लादतो, म्हणून अमेरिका भारतावर २६% कर लादेल. इतर देश आमच्याकडून जे शुल्क आकारत आहेत, त्याच्या जवळपास निम्मे शुल्क आम्ही आकारू. त्यामुळे दर पूर्णपणे परस्परसंवादी नसतील. मी ते करू शकतो, पण ते अनेक देशांसाठी कठीण होईल. आम्हाला ते करायचे नव्हते.

महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

मुंबई, दि. २९ मे २०२५: महावितरणच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन दि. १ ते ६ जून २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  दि.६ जून २०२५ रोजी महावितरण कंपनीचा २० वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्ताने आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहादरम्यान मॅरेथॉन, रॅली, निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांना सुरक्षाविषयक ई-मेल व एसएमएस पाठविणे, भित्तीपत्रके, चित्रफिती अशा विविध माध्यमांव्दारे विद्युत सुरक्षेविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे.

मागील काही वर्षामध्ये वीज अपघाताचे प्रमाण कमी करण्यात महावितरणला यश आले आहे. मात्र तरीही विविध कारणास्तव अपघात होतात. विद्युत अपघाताचे प्रमाण अजून कमी करण्यासाठी महावितरणने विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित करून व्यापक जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे.

“आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शुन्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार” हे ब्रिद घेऊन महावितरणच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयात दि.१ ते ६ जून २०२५ दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहात  विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. रविवार दि. १ जून रोजी सर्व परिमंडळ कार्यालयाच्या मुख्यालयाच्या शहरात मॅरेथॉन ‘रन फॉर सेफ्टी’ आयोजित करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी, ग्राहक व जनमित्र यांचेसाठी विद्युत सुरक्षा प्रश्नमंजुषा जाहीर करण्यात आली आहे.  या प्रश्नमंजुषेत सहभागी होणाऱ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. महावितरण कार्यालय / रोहित्र पेटी / आर. एम. यु. /डिजिटल बोर्ड / शिडी गाडी / उपकेंद्र / तक्रार निवारण केंद्र / ग्राहक सुविधा केंद्र / रहिवासी परिसर इ. ठिकाणी  विद्युत सुरक्षा पोस्टर्स लावण्यात येणार असून समाज माध्यमांद्वारे, रेडिओ, टि.व्ही. प्रिंट मिडिया तसेच इतर माध्यमे वापरुन विद्युत सुरक्षा विषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

सोमवार दि. २ जून रोजी  राज्यातील ६५० उपविभाग अंतर्गत शहर व ग्रामीण भागातील रहिवासी परिसरात विद्युत सुरक्षा विषयी जनजागृती करण्यात येईल. ग्राहकांना विद्युत सुरक्षा विषयी ई-मेल पाठविणे. बाजार व इतर सार्वजनिक ठिकाणी विद्युत सुरक्षा विषयी जनजागृती, मंगळवार  दि. ३ व ४ जून रोजी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी आणि कुटूंबियांसाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विद्युत सुरक्षा विषयी निबंध / चित्रकला स्पर्धा, महावितरण कर्मचारी / अधिकारी यांच्यासाठी विद्युत सुरक्षा विषयी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

दि.५ जून वसुंधरा दिनी १५० विभागीय स्तरावर विद्युत सुरक्षा व वीज बचत विषयी रॅली काढण्यात येणार आहे. दि.६ जून रोजी सकाळी १०:०० ते १०:१५ या वेळेत राज्यातील सर्व शाखा कार्यालयातील जनमित्र यांच्यासाठी विद्युत सुरक्षा प्रतिज्ञा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 

सकल हिंदू सामुदायिक व्रतबंध सोहळ्यात ५८ बटूंची मुंज

स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मी सावरकर उपक्रम अंतर्गत विनामूल्य व्रतबंध सोहळा

पुणे : गणेश पूजन…पारंपरिक पद्धतीने केलेले चौलकर्म…मातृभोजन… व्रतबंधन असे शास्त्रोक्त पद्धतीने विधी करत समाजातील वेगवेगळ्या घटकातील आणि अनाथ – विशेष मुलांची मुंज विधिवत पार पडली. व्रतबंध या पवित्र संस्कारामुळे मूळ संस्कृतीशी मुलांची नाळ जोडत ५८ मुले आणि मुली यांचा एकत्रित व्रतबंध सोहळा पार पडला. सामाजिक एकतेचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार या माध्यमातून समाजापर्यंत पोचविण्यात आला.

स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मी सावरकर उपक्रम अंतर्गत हिंदूंच्या १८ विविध समाजातील ५८ मुलामुलींच्या सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन कर्वे रस्त्यावरील अश्वमेध मंगल कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर उपस्थित होते.

संस्काराचे समाजव्यापी महत्त्व ओळखून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत आपल्या कार्यकाळात सर्व हिंदू समाजासाठी सामुदायिक व्रतबंध सोहळ्याची संकल्पना मांडली होती. सावरकरांनी मालवणला तथाकथित १५० अस्पृश्यांच्या मुंजी लावल्या होत्या आणि त्यांना स्वतः जानवं घातली होती. त्यांच्या या विचारातून प्रेरणा घेऊन स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट मागील चार वर्षे हा उपक्रम सातत्याने राबवत आहे.

बदलत्या काळात शिक्षण आणि जीवनशैलीत अनेक बदल झाले असले, तरी भारतीय हिंदू संस्कृतीतील मूलभूत संस्कारांची गरज अजूनही तितकीच महत्त्वाची आहे. त्यापैकीच एक म्हणजे व्रतबंध संस्कार, ज्ञानार्जनाच्या प्रवासाची सुरुवात करणारा एक पवित्र टप्पा आहे.

धायरीतील रस्ते होताहेत गायब, सरकारी पांदण,शिव रस्ते खुले करण्याची मागणी

पुणे:शहरातील सर्वात अधिक दाट लोकवस्तीच्या धायरी परिसरातील शिवकालीन वहिवाटीचे व सरकारी नकाशातील गाव पांदण,शिव रस्ते खुले करण्यात याव्यात अशी मागणी धायरी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व हवेली तालुका तहसीलदारांकडे केली आहे.
धायरी येथील बहुतांश सरकारी नकाशातील शिवकालीन वहिवाटीच्या पांदण,शिव रस्त्यांवर बेकायदा अतिक्रमणे झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसह रहिवाशांना ये जा करणे गैरसोयींचे झाले आहे.याकडे पुणे शहर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
या बाबत आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर, समस्त धायरी ग्रामस्थ समितीचे निलेश दमिष्टे, सनी रायकर अनिल रायकर संदीप विठ्ठल पोकळे संतोष चौधरी अमर खेडेकर चिंतामणी पोकळे आदींनी निवेदन दिले आहे.
आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,शासनाने शंभर दिवसांची मोहीम राबवुनही
धायरी गावातील अनेक पाणंद व शिव रस्ते अजुनही खुले झालेले नाहीत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू आहेत त्यामुळे आगामी काळात हे रस्ते खुले करण्यात अडचणी निर्माण होणार आहेत..उपमुख्यमंत्री व जिल्हाचे पालकमंत्री अजित पवार यांनी शिव व पाणंद रस्ते तातडीने खुले करण्याचे आदेश दिलेले आहेत. धायरी गाव हे शहरातील गाव असुन सदर गावात नागरीकरण हे प्रचंड वाढले असुन गावची लोकसंख्या दिड ते दोन लाखाच्या आसपास गेलेली आहे. रस्ते मात्र पुर्वीचेच असुन त्यामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही. त्यामुळे धायरी गावातील सर्व पाणंद व शिवरस्ते नागरीकांसाठी खुले करणे गरजेचे आहे. तरी ग्रामस्थांच्या मागणीनुसार धायरी गावातील सर्वच पाणंद व शिव रस्ते आपण तातडीने सरकारी मोजणी करूनबेकायदा अतिक्रमणे काढून सर्व पांदण शिव रस्ते खुले करण्याचे साकडे धायरी ग्रामस्थांनी शासनाला घातले आहे.

गोदरेजने पुण्यात स्मार्ट सुरक्षेची नवीन श्रेणी अनलॉक केली

आधुनिक ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्मार्ट नवकल्पनांसह बाजारपेठेतील 80% हिस्सा काबीज करण्याचा उद्देश

पुणे, 29 मे 2025 – महाराष्ट्राच्या वेगाने वाढत असलेल्या सुरक्षा उपायांच्या मार्केटमध्ये आपली नेतृत्व क्षमता सिद्ध करत
गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या सुरक्षात्मक उपायांच्या व्यवसायाने अत्याधुनिक, तंत्रज्ञान-उपयुक्त गृह लॉकर्सची नवीनतम
श्रेणी लॉन्च केली आहे. ग्राहक तसेच विविध संस्थांमध्ये मजबूत स्थान असल्याने कंपनी आता परिसरातील अत्यंत
गतिमान आणि शहरीकरणाचा उत्तम वेग असलेल्या शहरांपैकी पुण्यावर अधिक लक्ष केंद्रित करते आहे.
लक्झरी होम्स, एकात्मिक टाउनशिप आणि नागरी विकासासह पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल होत
आहेत. जगण्यासाठी उत्तम सोयी-सुविधा, सुरक्षा तसेच सौंदर्यात्मक नजरेला प्राधान्य देत असलेल्या रहिवाशांमध्ये
अत्याधुनिक गृह सुरक्षा उपायांची मागणी वाढती आहे. या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी गोदरेज
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक डिझाइनचा समावेश करत लॉकर्स तयार करणार आहे.
या उद्घाटनावर भाष्य करताना, गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुपच्या सुरक्षा समाधान व्यवसायाचे प्रमुख पुष्कर गोखले
म्हणाले, “पुण्यासारखी शहरे स्मार्ट शहरी केंद्रांमध्ये विकसित होत असताना, मूलभूत संरक्षणापासून आधुनिक जीवनाचा
अविभाज्य घटक म्हणून सुरक्षेची व्याख्या पुन्हा केली जात आहे. गोदरेजमध्ये आम्ही अंतर्दृष्टीपूर्ण तंत्रज्ञानासह आकर्षक
डिझाइनच्या साहाय्याने या स्थलांतराचे नेतृत्व करत आहोत. आमची नवीन श्रेणी फक्त संरक्षण करत नाही तर आजच्या
ग्राहकांना जगण्याचे, काम करण्याचे आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची दिशा दाखवते. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर
सुरक्षेच्या भविष्यात आकार देण्यासाठी आम्ही सज्ज आणि सक्षम आहोत. पुणे आमच्यासाठी उच्च प्राधान्य असलेले शहर
आहे आणि तिथे आम्ही नवकल्पना, भागीदारी तसेच प्रवेशयोग्यता याला प्राधान्य देत आहोत, जेणेकरून घरांच्या आणि
व्यवसायांचे जागतिक दर्जाच्या सुरक्षा साधनांनी संरक्षण होईल. पुढील तीन वर्षांत आम्ही 18% वार्षिक वाढ
साधण्याच्या उद्देशावर आहोत आणि घराच्या लॉकर विभागात सध्याच्या 75% वरून 80% बाजार हिस्सा घेण्याची
आमची योजना आहे. तर दागिन्यांच्या विभागात आम्हाला 70% हिस्सा मिळवायचा आहे.
ग्राहकांच्या आवडीनिवडी तसेच पुण्यातील दागिन्यांचे क्षेत्र विस्तारात असतानाच कंपनीचा महाराष्ट्रातील विस्तार होतो
आहे, हे अत्यंत योग्य आहे. सोन्याच्या किंमती जवळपास ₹1 लाख प्रति 10 ग्रॅम आहेत, आणि ग्राहक नवीन
दागिन्यांसाठी जुन्या दागिन्यांची अदला-बदली मोठ्या प्रमाणावर करत आहेत, ज्यामुळे पुनर्नूतनीकरण केलेल्या
सोन्याच्या व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. संपत्तीच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे वैयक्तिक घरांसाठी सुरक्षित,
विश्वसनीय घरगुती लॉकर आणि ज्वेलर्ससाठीही मजबूत सुरक्षितता प्रणालीची आवश्यकता.
ग्राहकांच्या या गरजेला प्रतिसाद म्हणून, गोदरेजने डिफेंडर ऑरम प्रो रॉयल क्लास E सुरक्षित उपकरण लाँच केले आहे,
जे एक BIS प्रमाणित उच्च-सुरक्षा देते आणि ज्वेलर्ससाठी योग्य आहे. मौल्यवान गोष्टींच्या संचयनासाठी उच्च क्षमतेची
सुरक्षा तसेच सर्वोत्तम संरक्षण प्रदान करते. सरकारने जारी केलेल्या अलीकडील गुणवत्ता नियंत्रण आदेशानुसार हा बदल
करण्यात आला आहे. ज्यात सर्व उत्पादकांना BIS मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची आणि ISI लेबल केलेल्या सुरक्षित
उपकरणांचाच पुरवठा करण्याचा आदेश आहे. याव्यतिरिक्त, AccuGold iEDX मालिका ज्वेलरी रिटेल, हॉलमार्किंग केंद्रे
आणि सोने कर्ज सेवेमध्ये संलग्न बँका यांच्यासाठी आदर्श असलेल्या शुद्धता चाचणी उपायांसह सोने इकोसिस्टमला समर्थन

देते. जिथे पारंपरिक RCC मजबूत खोली व्यवहार्य नाहीत, तिथे गोदरेज MX पोर्टेबल खोलीचे मजबूत पॅनेल अधिकतम
सुरक्षेसह लवचिक, मॉड्युलर पर्याय प्रदान करतात.
घरमालकांसाठी, नव्याने लॉन्च केलेले NX Pro Slide, NX Pro Luxe, Rhino Regal आणि NX Seal मॉडेल्समध्ये
ड्युअल-मोड प्रवेश (डिजिटल आणि बायोमेट्रिक), iBuzz अलार्म सिस्टम, छुपे कप्पे आणि आधुनिक सजावटीला पूरक
अशी अंतर्गत सजावट यासारख्या नवकल्पनांचा समावेश आहे—रोजच्या जीवनात सुरक्षा कशी समाकलित होते हे यातून
दिसते.
भविष्याचा विचार करताना, पुण्यापलीकडे गोदरेज महाराष्ट्रातील उच्च क्षमता असलेल्या Tier 2 आणि Tier 3
शहरांमध्ये जलद विस्तार करण्यास सक्रिय आहे. यातील अनेक शहरे दागिन्यांच्या कारागिरी तसेच वाढत्या समृद्धीसाठी
प्रसिद्ध आहेत. त्यांचे किरकोळ नेटवर्क तसेच डिजिटल संपर्क बळकट करून, राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रवेशयोग्य आणि
भविष्याच्या दृष्टीने योग्य सुरक्षा उपाय देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

उत्पादने पोर्टफोलिओ:
NX सील फ्लोर लॉकर:
NX सील फ्लोर लॉकर आपल्या मौल्यवान वस्तू गुप्त तसेच सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य पर्याय आहे. या
पायावर स्थापित डिझाइनसह, या नवोन्मेषी सुरक्षिततेस तुमच्या फ्लोअरिंगमध्ये सहज समाविष्ट केले जाते, त्यामुळे ते उघड्या
डोळ्यांना दिसणे अशक्य असते. लाकडाच्या पारंपरिक कपाटांपेक्षा 10 पट अधिक मजबूत साहित्याने तयार केलेला, NX सील फ्लोर
लॉकर चोरल्यास नुकसानापासून उत्कृष्ट संरक्षण प्रदान करतो.
राइनो रिगल लॉकर: ही एक उच्च-सुरक्षा तिजोरी आहे, जी मौल्यवान वस्तूंना संरक्षण देण्यासाठी डिझाइन केली आहे, अत्याधुनिक
तंत्रज्ञानासह robust रचनेसह हे एकत्र करतो. मानक सुरक्षिततेंपेक्षा १०० पट मजबूत सामग्रीसह तयार केलेला, तो सुरक्षा
तोडण्याच्या सर्वात शक्तिशाली प्रयत्नांना देखील सहन करतो. अत्याधुनिक अचूक की लॉक, लॉक करण्यायोग्य टॉप खण, आणि २-
मार्गाने बोल्ट सिस्टीमची वैशिष्ट्ये त्याला उच्चतम सुरक्षा देतात. हे सर्वाधिक सुरक्षा देते. हेव्ही ड्युटी आणि सौंदर्यात्मक आकर्षण
मिळते, तसेच खालच्या बाजूला असलेले गुप्त कप्पे आणि ऍडजस्टेबल शेल्व्ह कार्यक्षमता वाढवतात. घरमालक, व्यावसायिक आणि
संग्रहकांसाठी आदर्श, राइनो रिगल लॉकर अनमॅच्ड सुरक्षा, टिकाऊपणा आणि कस्टमायझेबल स्टोअरेज प्रदान करते, ज्यामुळे
मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी हे अंतिम पर्याय ठरते.
NX Pro Luxe: NX Pro Luxe होम लॉकर्स आधुनिक सोयीसह प्रगत सुरक्षा प्रदान करतात, ज्यामध्ये डुअल लॉकिंग सिस्टम,
मोटराइज्ड लॉकिंग आणि व्हॉइस-गाइडेड ऍक्सेस समाविष्ट आहे. interiors मध्ये सहजपणे समाविष्ट होण्यासाठी डिझाइन केलेले,
यात ड्युअल पासवर्ड ऍक्सेस, ऑटो-फ्रीज फंक्शन, USB आपातकालीन चार्जिंग, आणि सौम्य LED प्रकाश समाविष्ट आहे. 30L आणि
48L आवृत्त्यांमध्ये उपलब्ध, हे टिकाऊपणा आणि वापरण्यास सुलभतेची हमी देते, सुरक्षित आणि स्टायलिश संग्रहणासाठी आदर्श
निवड ठरते.
NX प्रो स्लाइड: NX प्रो स्लाइड होम लॉकने तिच्या नाविन्यपूर्ण स्लाइड-आउट डिझाइनसह सुरक्षा पुन्हा परिभाषित केली आहे.
आधुनिक फर्निचरमध्ये सहजपणे समाकलित होते जे गुप्त पण मजबूत संरक्षण देते. हे लाकडाच्या कपाटाच्या तुलनेत 10X गुण जास्त
मजबूत आहे. यामध्ये एक अचूक की लॉक, कुलूप उघडण्यासाठी चुकीचे प्रयत्न केल्यास स्वयंचलित-फ्रीझ कार्य आणि वाढीव
दृश्यतेसाठी एक LED-प्रकाशित आहे. मोटरायझ्ड लॉकिंग प्रणाली सुलभ आणि सुरक्षित प्रवेश सुनिश्चित करते, तर USB इमरजेंसी
चार्जिंग आवश्यकतेवेळी बॅकअप पॉवर देते. तिच्या आकर्षक, जागा-कार्यक्षम डिझाइन आणि प्रगत सुरक्षात्मक सुविधांसह, NX प्रो
स्लाइड मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाय आहे. ज्यामुळे गोंधळमुक्त, आकर्षक घराचे सौंदर्यशास्त्र राखले जाते.
ऑरम प्रो रॉयल : ऑरम प्रो रॉयल हा भारताचा पहिला BIS प्रमाणित वर्ग E सुरक्षितता आहे जो वैयक्तिकृत केलेले संग्रहण उपाय
प्रदान करण्यासाठी आणि अधिक लवचिक अंतर्गत सजावट करण्यासाठी डिझाइन केले आहे. हे नवीनतम नियामक मानकांची पूर्तता
करण्यात सक्षम आहे, तसेच ज्वेलर्सच्या गरजा लक्षात घेतात, त्यांच्या मौल्यवान इन्व्हेंटरीसाठी उत्तम संरक्षण प्रदान करतात.
ऍक्यूगोल्ड iEDX श्रृंखला: सोन्याचे चाचणी यंत्र – अचूक, अविनाशी सोन्याच्या चाचणीसाठी डिझाइन केलेले. हे ज्वेलर्स, बँका आणि
हॉलमार्किंग केंद्रे यांच्यासाठी योग्य आहे.
Mx पोर्टेबल स्ट्रॉन्ग रूम मॉड्युलर पॅनेल : स्ट्रॉन्ग रूम मॉड्युलर पॅनेल जे सहज सेटअप, ट्रान्सपोर्ट आणि कमाल सुरक्षा यासाठी
डिझाइन केलेले आहे, उच्च-गुणवत्ता असलेली स्टीलची रचना आणि मॉड्युलर ऍडप्टबिलिटीसह व्यवसायाच्या संरक्षणाची पुनार्व्याख्या
करते.

नवीन सुजाता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा सुवर्ण महोत्सव साजरा

पुणे:

बंडगार्डन, येथील नवीन सुजाता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने २४ व २५ मे २०२५ रोजी दोन
दिवसांच्या रंगतदार कार्यक्रमांसह आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला.
शनिवारी उत्सवाची सुरुवात भक्तीमय सुंदरकांड पठणाने झाली. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात यश
मिळवलेल्या तरुण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विविध वयोगटातील सभासदांच्या सहभागाने
सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने सोसायटीतील ऐक्य आणि उत्साही वातावरणाचा प्रत्यय दिला.
रविवारी कार्यक्रम सौ. पूर्णिमा शिंदे यांच्या सूत्रसंचालनाखाली पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शिवेश
आणि त्यांची कन्या स्वरा यांच्या सुस्वर गणेश वंदनेने झाली. नंतर दिवंगत सभासदांना श्रद्धांजली
वाहण्यात आली आणि अजीत मोरे यांनी तयार केलेल्या ‘डाऊन मेमरी लेन’ या भावस्पर्शी लघुपटाने जुन्या
आठवणींना उजाळा मिळाला.
कार्यक्रमास नामवंत बांधकाम व्यावसायिक नाईकनवरे आणि चौधरी कुटुंबीय, श्री. व सौ. वागास्कर, श्री.
लक्ष्मीनारायण आणि वास्तुविशारद रवी कदम यांची उपस्थिती लाभली. श्री. आनंद नाईकनवरे यांच्या
हस्ते सोसायटीचा विशेष कॅटलॉग प्रकाशित करण्यात आला.
कार्यक्रमाचा समारोप प्रा. शशांक दिवेकर आणि त्यांच्या संगीतमय समूहाच्या सुरेल ऑर्केस्ट्राने झाला.
हुतोक्षी वेलिंकर आणि सोसायटीची मॅनेजिंग कमिटी यांच्या संकल्पनेतून आणि आयोजनातून पार पडलेल्या
या सुवर्ण महोत्सवामुळे नवीन सुजाता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या गौरवशाली वाटचालीस
नवयुगीन साज लाभला.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण बीगॉसचा ब्रॅण्ड अम्बेसिडर म्हणून घोषित

मुंबई२८ मे २०२५ –  आरआर ग्लोबल ग्रुप या प्रसिद्ध इलेक्ट्रिकल सोल्युशन्स कंपनीची निर्मिती असलेल्या बीगॉस या कंपनीने आज प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला आपला ब्रॅण्ड अम्बेसेडर म्हणून नियुक्त केल्याची घोषणा केली. भारतात वाढत्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची मागणी लक्षात घेता कंपनीने प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणसोबत केलेली भागीदारी फार महत्त्वाची मानली जात आहे. अभिनेता अजय देवगण यांची सिनेसृष्टीतील यशस्वी कारकिर्द, जनमानसातील प्रतिमा आणि लोकप्रियता बीगॉसला फायदेशीर ठरेल. बीगॉसचा स्मार्ट आणि विश्वासार्ह आणि भविष्यासाठी तयार असलेली गतिशीलता हा संदेश अजय देवगण यांच्या मोठ्या चाहत्यावर्गापर्यंत पोहोचवता येईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला.

अजय देवगण यांच्याबद्दलची जनमानसांतील मजबूत विश्वासार्हता हा स्वभावगुण बीगॉसच्या कामगिरी, विश्वासार्हता आणि विश्वासाच्या ब्रँण्ड मूल्यांशी उत्तम जुळतो. अजय देवगण यांची भागीदारी झाल्याने देशभरातील अनेक ग्राहक कंपनीशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जातील. यामुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक दुचाकीला स्मार्ट आणि जबाबदार प्रवासाचा पर्याय म्हणून निवडण्यास प्रोत्साहित होतील. ही भागीदारी बीगॉसची सर्वसामान्यांसाठी सोपी आणि आकर्षकरितीने शाश्वत प्रवासाची साधने निर्मित करण्याची कटिबद्धता दर्शवते.

या भागीदारीबद्दल अभिनेता अजय देवगण यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ बीगॉस हा भारतीय ब्रॅण्डने जागतिक दर्ज्याची इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली आहे. कंपनीच्या या यशस्वी कामगिरीमुळेच मी त्यांच्याशी जोडलो गेलो आहे. RUV350 ही दुचाकी कंपनीच्या उत्तम दर्ज्याच्या गुणवत्तेचे आणि नव्या तंत्रज्ञानाच्याबद्दलची बांधिलकीचे दर्शन घडवते. ही दुचाकी म्हणजे स्मार्टस्वच्छ गतिशीलतेच्या प्रवासासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.‘ 

अभिनेता अजय देवगण यांच्यासोबतच्या भागीदारीबद्दल बीगॉसचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक हेमंत काबरा म्हणाले, ‘‘आम्ही देशातील रस्त्यांवर वापरण्यास सोप्पी आणि विश्वासार्ह वाहनांची निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित करतो. आमची वाहने याच गोष्टींची ग्वाही देतात. अजय देवगण यांची प्रामाणिक स्वभाव आणि मोठा चाहता वर्ग आमच्या ब्रँण्डच्या मूल्यांशी तंतोतंत जुळतो. आम्हांला विश्वास आहे की, त्यांची ही भागीदारी शाश्वत शहरी वाहतुकीला प्रोत्साहन देत कंपनीच्या व्यवसायवृद्धीस हातभार लावेल.

यासह बीगॉसने ईलेक्ट्रोनिक वाहनांच्या व्यवसायात अजून काही वाहने आणण्याची तयारी दर्शवली आहे. पुढील वर्षापर्यंत इलेक्ट्रिक सायकल आणि आणखी दोन नवीन मॉडेल्स बाजारात आणली जातील. कंपनी इलेक्ट्रिक दुचाकी प्रकारात सर्वात विविध प्रकारची उत्पादने (रेंज) उपलब्ध करुन देणार आहे. येत्या दोन वर्षांत डीलरशिप नेटवर्किंगमध्ये मोठा विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. यामुळे देशभरातील विक्री आणि सेवा मजबूत होईलअसा विश्वास कंपनीच्यावतीने व्यक्त करण्यात आला.

बीगॉस RUV350 ही एक मजबूतस्मार्टटिकाऊ आणि आरामदायक इलेक्ट्रिक दुचाकी आहे. शहरातील रस्त्यांवर तसेच लांबच्या पल्ल्यातील आरामदायी प्रवासासाठी ही दुचाकी फायदेशीर ठरते. ही दुचाकी ७५ किमी प्रति तास वेगाने धावते. दुचाकीला एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर १४५ पर्यंतची रेंज देते. ही दुचाकी एआरएआय प्रमाणित आहे. ३ हजार ५००W इन व्हील मोटर आणि ३ kWh LFP बॅटरी, मेटल बॉडी१६ इंच अलॉय व्हील्स ही या दुचाकीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. या दुचाकीत सामान ठेवण्यासाठी बूट स्पेसदेखील उपलब्ध आहे. प्रवासाची सर्व माहिती स्पष्ट दिसावी याकरिता ५ इंचाचा TFT डिस्प्लेयोग्य मार्ग दर्शविणारा टर्न बाय टर्न नेव्हिगेशनक्रूझ कंट्रोलदुचाकी पडल्यास आपोआप बंद होण्यासाठी फॉल सेन्सप्रवासाच्या मार्गात चढण आल्यास दुचाकी मागे घसरणार नाही यासाठी हिल होल्डब्रेक लावल्यावर बॅटरी चार्ज होण्यासाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम या आवश्यक सोयीसुविधांसह दुचाकी उपलब्ध आहे. स्टाईलसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार झालेली ही दुचाकी प्रवासासाठी अतिशय आरामदायक आहे.

बीगॉस सी१२ या दुचाकीच्या रेंजमधील नवे मॉडेल आता दोन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. यात TFT डिस्प्लेसह जुन्या सी१२आय मॉडेल्सची सर्व वैशिष्ट्ये एकत्रित करण्यात आली आहेत. २ हजार ५०० Wची हब मोटर६० किमी प्रति तासाचा टॉप स्पीडएकदा चार्ज केल्यावर १२३ किमीपर्यंतची रेंज उपलब्ध असल्याने दुचाकीस्वारांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. यात काही नव्या वैशिष्ट्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यात २ थीम्ससह ५ इंचाची मोठ्या आकाराचा TFT डिस्प्ले असून २.९ kWh बॅटरी जोडली आहे. बॅटरीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्याधुनिक लिथियम सेलचा वापर करण्यात आला आहे. सुरक्षित प्रवासासाठीही दुचाकीत खास तरतुदी उपलब्ध आहेत. क्रूझ कंट्रोलरिव्हर्स मोडटर्न बाय टर्न नेव्हिगेशन, फॉल सेन्सरिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि सुरक्षित ब्रेकिंगसाठी सीबीएस ब्रेकिंग सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. हे मॉडेल शहर आणि उपनगरातींल रस्त्यांसाठी बनवले आहे. यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

या दुचाकीच्य निर्मितीला भारत व्हॅल्यू फंडचे मधु आणि महावीर लुणावत आणि विनी कॉस्मेटिक्सचे दर्शन पटले या प्रमुख गुंतवणूकदारांनी पाठिंबा दर्शवला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा कसबा मतदारसंघाचा दौरा

कार्यकर्त्यांनी ग्राऊंडवर उतरून काम करावे!

पुणे-

विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज दिल्या. तसेच, मोर्चा आणि आघाडीची कार्यकारिणी लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही ना. पाटील यांनी यावेळी दिल्या.

ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज कसबा विधानसभा मतदारसंघाचा प्रवास करुन; नवनियुक्त मंडल अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर विष्णू कृपा कार्यालयात विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृहनेते गणेश बिडकर,आ. हेमंत रासने, शैलेश टिळक, स्वरदा बापट, राघवेंद्रबापू मानकर, राजेंद्र काकडे, प्रमोद कोंढरे, दीपक पोटे यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला ना. पाटील यांनी भाजपा संघटन पर्वाअंतर्गत पक्षाची कसबा विधानसभा मतदारसंघातील सर्व मंडलातील आघाड्या-मोर्चाच्यांची कार्यकारिणी लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी ग्राऊंडवर उतरून काम केले. त्यामुळे ना-भूतो-ना भविष्यती विजय मिळाला. आगामी महापालिका निवडणुकीत ही आपल्याला तसेच यश मिळवायचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, अशा सूचना दिल्या.

ते पुढे म्हणाले की, महापालिका निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाबाबत वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील. कार्यकर्त्यांनी त्याची काळजी करु नये. आपल्याला मिळालेली जबाबदारी योग्य पार पाडावी, अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आपापल्या भागावर विशेष लक्ष केंद्रित करावे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय ठेवावा. जेणेकरून, आणीबाणीच्या प्रसंगातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी त्याचा फायदा होईल.

म्हाळुंगे टीपी स्कीमला अंतिम मान्यता मिळावी; अमोल बालवडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे विनंती

पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला म्हाळुंगे टीपी स्कीम प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या योजनेला स्थानिक शेतकरी आणि नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद असून, त्यांनी योजनेस आपली मान्यता दिली आहे, अशी माहिती अमोल बालवडकर यांनी दिली आहे.

बालवडकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या विनंती पत्रात नमूद केले आहे की, या योजनेचा आराखडा लवकरात लवकर तयार होऊन त्याला अंतिम मान्यता मिळावी, जेणेकरून विकासकामांना गती मिळू शकेल.पीएमआरडीएच्या माध्यमातून या योजनेवर गेल्या काही वर्षांपासून काम सुरू आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे अद्याप योजनेस अंतिम मान्यता मिळालेली नाही. परिणामी, या भागातील रस्ते, पाणीपुरवठा व अन्य मूलभूत सुविधा आणि अन्य विकासकामे प्रलंबित आहेत.

बालवडकर यांनी स्पष्ट केले की, “मुख्यमंत्र्यांनी तांत्रिक अडचणी दूर करून या योजनेला तातडीने अंतिम मान्यता द्यावी, जेणेकरून संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलेल आणि सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळेल.”या प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यास परिसराचा एकात्मिक आणि नियोजित विकास सुनिश्चित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

वैष्णवी हगवणेंच्या वडिलांची हात जोडून विनंती:मुलगी गेली आता शिंतोडे तरी उडवू नका.. आवाहन करताना अश्रू अनावर

पुणे-माझ्या मुलीवर आरोप करणाऱ्या वकिलांना देखील मुली-बाळी असतील. आता माझे लेकरु तर गेले आहेच. मात्र, तीच्यावर एवढे वाईट शिंतोडे उडवू नका, अशा शब्दात वैष्णवी हगवणेचे वडिल अनिल कस्पटे यांनी हात जोडून विनंती केली आहे. माझ्या लेकराची अशी बदनामी करु नका, असे म्हणत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांनी न्यायालयात केलेले सर्व दावे त्यांनी फेटाळले आहेत.वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी केलेले सर्व दावे तीचे वडिल अनिल कस्पटे यांनी फेटाळून लावले आहेत. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी हगवणे कुटुंबावर अनेक आरोप केले. तसेच माझ्या मुलीच्या खुनात नीलेश चव्हाण यांचा जवळचा संबंध असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

या संबंधी बोलताना कस्पटे म्हणाले की, वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेणे हे चुकीचे आहे. मोबाईल मधील चॅट बाबत आम्हाला कोणतीही पुसटशीही कल्पना कोणीच दिलेली नाही. उलट माझ्या जावयाला मी एक लाख 52 हजार रुपयांचा मोबाईल घेऊन दिला. त्याची पावती देखील कस्पटे यांनी दाखवली आहे. या मोबाईलचे हप्ते मी आजही फेडत असल्याचे ते म्हणाले.हगवणे कुटुंबाकडे पाच कोटी रुपयांच्या गाड्या असल्याचा दावा वकिलांनी न्यायालयात केला होता. मात्र हा दावा कस्पटे यांनी फेटाळून लावला आहे. त्यांच्याकडे केवळ एकच स्फोर्ड कंपनीची गाडी असून मी दिलेली फार्च्युनर गाडी त्यांनी मागितली होती. मी आधी दुसरी गाडी बुक केली होती. मात्र त्यांना फार्च्युनर गाडी हवी होती. मला तीच द्या नसता मी गाडीला हाथ लावणार नाही, असे त्यांनी मला सांगितले होते. त्यानंतर फार्च्युनर गाडी बुक केली असल्याचा दावा कस्पटे यांनी केला आहे.

हगवणे यांनी वैष्णवीची दोन लग्न मोडली असल्याचा दावा देखील पुन्हा एकदा कस्पटे यांनी केला आहे. मात्र या विषयी मी सध्या काही जास्त बोलू शकत नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे कस्पटे यांनी म्हटले आहे. या माध्यमातून कस्पटे यांनी हगवणे परिवाराकडून आम्हाला धमकवले जात असल्याचा अरोप पुन्हा एकदा केला आहे.

आपली सून मयत झाली हे सोडून हगवणे यांना बाळाला नीलेश चव्हाणकडे देणे कसे सुचले? असा प्रश्न कस्पटे यांनी उपस्थित केला. बाळ वैष्णवीच्या जवळच घरात होते. मग ते बाळ नीलेश चव्हाणकडे कसे पोहोचले? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. नीलेश चव्हाण देखील माझ्या वैष्णवीच्या खुनाच्या कटात सामील आहे, असा माझा ठाम आरोप असल्याचे कस्पटे यांनी म्हटले आहे.