Home Blog Page 361

पत्नीच्या गुप्तांगात हळद-कुंकू लावलेले लिंबू पिळले, म्हणाला , ‘आता हो वेडी

पुणे-पत्नीने कोर्टात पोटगीचा दावा दाखल केल्यामुळे संतापलेल्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या गुप्तांगात हळद-कुंकू लावलेले लिंबू पिळल्याचा संतापजनक प्रकार पुणे जिल्ह्यात उजेडात आला आहे. ही घटना वर्षभरापूर्वी घडली. याविषयी 36 वर्षीय पीडित महिलेने गत 11 तारखेला पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी पती यांचा 2004 मध्ये विवाह झाला होता. त्यांना 2 मुले आहेत. लग्नानंतर काही वर्षांनी पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. या वादाला कंटाळून पीडिता आपल्या दोन्ही मुलांना घेऊन बालेवाडी येथे राहण्यासाठी गेली. त्यानंतर आरोपी पतीही पिंपळे निलख परिसरात दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेला. पीडितेने नवऱ्याविरोधात पोटगीचा दावा दाखला. पण मधल्या काळात मुलांची शाळा सुरू झाली. त्यांची वह्या, पुस्तके नवऱ्याच्या घरीच राहिल्या होत्या. त्यामुळे ते आणण्यासाठी पीडिता पतीच्या घरी गेली.

त्यावेळी महिलेची आई, मामी व मुले ही सोसायटीच्या पार्किंगमध्ये थांबली होती. तर पत्नी वरच्या मजल्यावर असणाऱ्या फ्लॅटमध्ये साहित्य आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने मद्यप्राशन केले होते. मुलांच्या शाळेच्या साहित्यासाठी आली आणि आमचे साहित्य घेऊन जाते काय? असे म्हणत आरोपीने पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पण पतीने मद्यपान केले असल्यामुळे तिने त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. यामु्ळे संतापलेल्या पतीने मी बोलत असलो तरी माझ्याकडे पाहत नाही असे म्हणत घरातील कोयता काढून पत्नीच्या गळ्यावर ठेवला.त्यानंतर पत्नीला जबरदस्तीने कपडे काढायला लावले. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने पत्नीच्या इच्छेविरोधात तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित करून हळद-कुंकू लावलेल्या लिंबाच्या 4 फोडी तिच्या गुप्तांगात पिळले. त्यानंतर मी तुझ्यावर जादूटोणा केली असून, तू आता वेडी होणार आहेस. हा प्रकार कुणाला सांगितला तर मी तुला ठार मारेन, अशी धमकीही त्याने पीडितेला दिली. त्यामुळे पीडित महिलेने ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही. ती कुणालाही काही न बोलता आपल्या आई-मुलांसह आपल्या घरी गेली. त्यानंतर काही दिवसांनी तिने हा प्रकार आपल्या आई व मामीला सांगितला. त्यानंतर त्यांनी 11 एप्रिल रोजी सांगवी पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

संभाजी भिडेंना चावलेल्या कुत्र्याची एसआयटी चौकशी करा:विजय वडेट्टीवारांची उपरोधक मागणी

म्हणाले – कुणाला चावावे हे कुत्र्याला कळले नाही
मुंबई-शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली होती. या घटनेवरून विजय वडेट्टीवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधक टीका केली आहे. कुणाला चावावे हे कुत्र्याला कळले नाही याचे वाईट वाटते. संभाजी भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. तर महत्त्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काही उचलले जात नाहीत, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना दोन इंजेक्शन दिले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी संभाजी भिडेंना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. आता या घटनेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिक टीका केली आहे.

कुत्र्याला कुठून दुर्बुद्धी सुचली…कुणाला चावावे हे कुत्र्याला कळले नाही याचे वाईट वाटते. आता कुठला कुत्रा पोलिस शोधत आहेत, याची माहिती अजून मिळालेली नाही, पण मी माहिती घेतो, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असतो, मात्र या प्रामाणिक कुत्र्याने का असा राग धरला? यासंदर्भात खरंतर एसआयटी वैगरे लावून चौकशी केली पाहिजे, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही भाष्य केले. माझ्या शहरातही कुत्रे खूप वाढले आहेत. आता कुणाला चावल्यानंतर ते सापडतील ते माहिती नाही. कुत्रा कुणाला चावल्याशिवाय, तोही महत्त्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काही उचलले जात नाहीत. आता महत्त्वाच्या माणसाला ते चावावेत, अशी आपण देवाकडे प्रार्थना करूयात, म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल. या सरकारमध्ये कुत्राही मोठ्या व्यक्तीला चावला तर पकडला जातो. सरकारची कार्य करण्याची पद्धत चांगली आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

संभाजी भिडे सोमवारी रात्री सांगली येथील आपल्या एका धारकऱ्याकडे जेवणासाठी गेले होते. जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसोबत घरी परत येत होते. तेव्हा शहरातील माळी गल्ली भागात एका कुत्र्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवत त्यांच्या डाव्या पायाचा चावा घेतला. या अनपेक्षित घटनेमुळे भिडेंसह त्यांच्या सोबतचे कार्यकर्तेही काही क्षण गांगारून गेले. त्यानंतर लगेचच त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. संभाजी भिडेंना डॉक्टरकडून दोन इंजेक्शन देण्यात आली आहेत. सध्या संभाजी भिडेंची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. संभाजी भिडेंना येत्या दोन दिवसात आणखी इंजेक्शन देण्यात येणार आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर सांगली महापालिका खडबडून जागी झाली आहे. महापालिकेने शहरातील विविध भागात मोकाट कुत्र्यांची धरपकड सुरू केली आहे. ज्या भागात संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतला होता त्या परिसरात महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली आहे.

“लाडक्या बहिणींचा शाप लागल्याशिवाय राहणार नाही”, नाना पटोलेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल

मते घेईपर्यंत निकष ,नियम नाही आठवले आता आठवू लागले ..आता कळले तिजोरीवर भार येतोय

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेमुळं महायुती पुन्हा सत्तेत येण्यास कारणीभूत ठरल्याचं राजकीय तज्ज्ञ आणि जाणकार म्हणतात. दरम्यान, निवडणुकीपूर्वी जर आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेत १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ, असं आश्वासन महायुतीनं दिलं होतं. मात्र, राज्यात महायुतीचं सरकार येऊन चार महिने झाले. तरीही अद्याप लाडकी बहीण योजनेत वाढ करण्यात आली नाही. २१०० रुपये कधी येणार, याकडे लाडक्या बहिणी आस लावून बसल्या आहेत. तर मागील दोन महिन्यापूर्वी अनेक निकषावरून ९ लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आलंय. यानंतर आता आणखी ८ लाख बहिणींना या योजनेत केवळ ५०० रुपये मिळणार आहेत. यावरून आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय. शेतकरी सन्मान योजनेतून ज्या महिला लाभ घेतायेत, अशा ८ लाख महिलांना पुढील महिन्यापासून लाडकी बहीण योजनेतून केवळ पाचशे रुपये मिळणार आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून राज्यातील महायुती सरकारवर टीका करत आहेत. “आम्ही यापूर्वी म्हणत होतो की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना केवळ निवडणूक जिंकण्यासाठी आणि मतांसाठी आणली होती. निवडणुकीपूर्वी २१०० रुपयांचे आश्वासन दिलं होतं. अजूनही २१०० रुपये मिळत नाहीत. आधी ९ लाख महिलांना अपात्र ठरविल्यानंतर आता ८ लाख महिलांना हे सरकार अपात्र ठरवत आहे. सुरुवातीला लाडक्या बहिणींची मतं घेतली, पण आता पैसे द्यायची वेळ आल्यावर त्यांना नियम आठवतात. अपात्र करतात. त्यामुळं लाडक्या बहिणींची कळकळ आणि शाप या सरकारला लागेल”, अशी बोचरी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केलीय.

दरम्यान, राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन गुजरातमध्ये पार पडले. यानंतर काँग्रेसची महाराष्ट्रात बैठक होत आहे. याबाबत नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, ” या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. संघटनात्मक बांधणी आणि संघटनात्मक काम, यावर भर दिला जाणार आहे. तसंच जे नेते, पदाधिकारी काम करत नाहीत. त्यांना नारळ दिला जाईल”, असंही नाना पटोले यांनी म्हटलंय.सरकार कोणावरही अन्याय करणार नाही : सरकारनं आठ लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलं आहे, यावर बोलताना कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं की, “जे नियम, अटी आणि निकष जे पूर्वी होते. तेच आता आहेत. ज्या महिला शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतात आहेत. अशांना अपात्र करण्यात आलंय. परंतु सरकार कोणावरही अन्याय करणार नाही. सरकारने ज्या-ज्या योजनांची घोषणा केलीय. त्या योजना सुरूच राहतील. आता नवीन कोणतेही नियम किंवा अटी सरकारनं आणल्या नाहीत. याउलट या योजनेमध्ये सरकारनं २१०० रुपयांचे आश्वासन दिलं होतं, तेही पूर्ण करेल”, असा विश्वास कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केलाय.

सलमान खानला जीवे मारणाऱ्याची धमकी देणारा गुजरातमध्ये सापडला,पोलीस म्हणाले , तो मानसिक रोगी

मुंबई- : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. वरळी वाहतूक नियंत्रण कक्षाला सलमान खानवर हल्ला करणार असल्याचा मेसेज आला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणाचा सखोल तपास करून २४ तासांच्या आत सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला शोधून काढलं आहे.

अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारी व्यक्ती गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील आहे. ही व्यक्ती मानसिक आजारी आहे. हा तरुण गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया या गावाचा रहिवासी असल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. परंतु, अद्याप या तरुणाला अटक केलेली नाही. तपासानंतर २६ वर्षीय तरुणाला नोटीस पाठवून मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिलेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर रविवारी एक संदेश आला होता. यात अभिनेता सलमान खानला घरात घुसून जीवे मारण्याची आणि सलमानची गाडी बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबईतील वरळी पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं गुन्हा दाखल करत सखोल चौकशी केली. या धमकीच्या संदेशानंतर वरळी पोलिसांनी तातडीनं गुन्ह्याची नोंद केली. तसंच सलमानच्या वांद्रे इथल्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यात आली.सलमानला वाय प्लस सुरक्षा : सलमान खानला जीवे मारण्याची धमकीचा संदेश आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान हा संदेश वडोदरा इथल्या वाघोडिया गावातील व्यक्तीनं पाठवल्याचं स्पष्ट झालं. वडोदरा पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या तपास पथकासोबत वाघोडिया गावातील तरुणाच्या घरी धाव घेत त्या तरुणाचा तपास सुरू केला. त्यावेळी हा तरुण मानसिक रोगी असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं समोर आलं. प्रकरणाच्या चौकशीसाठी गरज भासेल त्यावेळी मुंबईत हजर राहावं, अशी नोटीस मुंबई पोलिसांनी त्या तरूणाला दिली आहे. सध्या सलमान खानला मुंबई पोलिसांची वाय प्लस श्रेणीतील सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे,” अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रोहन आनंद यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सलमानच्या निवासस्थानाला बुलेट प्रुफ काचेचं आच्छादन : सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराची घटना घडली होती. यानंतर नवी मुंबई पोलिसांनी सलमानच्या पनवेल इथल्या फार्म हाऊसची रेकी केलेल्या एका गटाला अटक केली होती. बिश्नोई गँगच्या या आरोपींकडून सलमानच्या फार्महाऊसवर हल्ला करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा पोलिसांनी त्यावेळी केला होता. गोळीबारीच्या घटनेनंतर सलमान खानचे वास्तव्य असलेल्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. निवासस्थानाला बुलेट प्रुफ काचेचं आच्छादन करण्यात आलंय.

भाजपाने मुस्लीम व्यक्तीला पंतप्रधान किंवा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करावे: हर्षवर्धन सपकाळ

फडणवीस, अजित पवार व शिंदेंची मोदींकडे पत असेल तर विशेष पॅकेज आणून राज्याची आर्थिक घडी रुळावर आणावी.

अकोला, दि. १५ एप्रिल २०२५
काँग्रेसचे आजपर्यंत ८९ अध्यक्ष झाले, त्यात सर्व जाती धर्माचे, महिला, पुरुष, आदिवासी, एससी, एसटी, हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन धर्माचे नेते होते. काँग्रेसने विकासाची कामे करताना त्याची फळे सर्व जाती धर्माला मिळावीत हेच पाहिले पण आता भाजपावाले त्यांना मुस्लीम समाजाची खुप काळजी असल्याचे दाखवत आहेत. मुस्लीम महिलांच्या हितासाठी तीन तलाक व गरिब मुस्लीमांसाठी वक्फ बोर्ड कायदा आणला हे भाजपा नेते सांगत आहेत. भाजपाचा हा मुस्लीम कळवळा पाहता पंतप्रधानपदी किंवा भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुस्लीम व्यक्तीला संधी द्यावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

अकोला येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे जे. पी. नड्डा यांची अध्यक्षपदाची मुदत संपलेली आहे. नरेंद्र मोदी हे सुद्धा ७५ वर्ष पुर्ण करत आहे, त्यांना निवृत्तीचे वेध लागले असतील, रा. स्व. संघातून कोणाच्या नावाचे पाकीट येणार, त्यापेक्षा तुम्हीच एखाद्या मुस्लीम व्यक्तीला पंतप्रधान किंवा भाजपाचा अध्यक्ष करा. सरसंघचालक मोहन भागवत यांनाही विश्रांती द्यावी व त्यांच्या जागी आदिवासी वा दलित समाजाच्या व्यक्तीला सरसंघचालक पदी बसवावे, असेही सपकाळ म्हणाले.

मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत. सर्व सत्ता आपल्याच हाती हवी या हट्टापायी या निवडणुका होऊ दिल्या जात नाहीत. राज्यातील सर्व सत्ता तीन लोकच चालवत असून लुटारुंची रचना निर्माण केली आहे. शेतकऱ्यांची तूर बाजारात येण्याच्या आधीच त्याचे भाव पाडण्याचे काम मोदी सरकारने केले, दिडपड भाव दिले नाहीत पण शेतकऱ्यांचे कंबरडे मात्र मोडले. सरकारने अतिव़ृष्टीचे, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे पैसे दिले नाहीत, ठेकेदारांचे पैसे दिले नाहीत, लाकडी बहिणीला पैसे देत नाहीत, एसटी कर्माचाऱ्यांना पगार मिळत नाही. राज्याचे नेतृत्व करणाऱ्या तिघांची नरेंद्र मोदींकडे पत असेल तर केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला विशेष पॅकेज आणून शेतकरी कर्जमाफी द्यावी व राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित करावी.
राज्यात अवैध व्यवसायाने कळस गाठला आहे, गांजा, अंमली पदार्थाचा काळा बाजार सुरु आहे. गुजरातच्या कांडला बंदरातून राज्यात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात येत आहे, पण पोलीस काहीही कारवाई करत नाहीत. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेची अवस्था बिकट झाली आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

यावेळी प्रदेशाध्यक्षांसोबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, आमदार साजिद खान पठाण, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत वानखेडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, माजी मंत्री अजहर हुसेन, प्रदेश सरचिटणीस शाम उमाळकर, हिदायत पटेल, मदन भरगड, महेश गणगणे, डॉ. जिशान हुसेन डॉ. अभय पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कचऱ्याच्या आगीमध्ये ८ वीजवाहिन्या जळाल्या; विश्रांतवाडी, मोशी, धानोरीमध्ये वीजपुरवठा विस्कळीत

पुणे, दि. १५ एप्रिल २०२५:आळंदी-कळस रस्त्यावर ग्रेफ सेंटरसमोर असलेल्या ओढ्यात ट्रेंचवर फेकलेल्या कचऱ्याला आग लागली. यात ट्रेंचमधील महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या ८ वीजवाहिन्या जळाल्या. आज पहाटे २.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. त्यामुळे विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव परिसरातील सुमारे १ लाख १५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पहाटे ५ वाजेपर्यंत टप्प्याट्प्याने सुरु करण्यात आला. तर विश्रांतवाडी, कळस परिसरातील सुमारे १० हजार आणि दिघी परिसरातील १७ हजार अशा २७ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी १२.३० वाजेपर्यंत बंद होता.

याबाबत माहिती अशी की, नगररोड विभाग अंतर्गत आळंदी-कळस रस्त्यावर ग्रेफ सेंटरसमोर एक ओढा आहे. तेथील एका ट्रेंचमध्ये महावितरणच्या ८ वीजवाहिन्या आहेत व त्याद्वारे विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव, दिघी परिसरातील सुमारे १ लाख ४२ हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. मात्र ओढ्यातील या ट्रेंचवर सातत्याने कचरा टाकण्यात येत होता. साठलेल्या या कचऱ्याला आज पहाटे २.३० च्या सुमारास आग लागली. आग वाढल्याने महावितरणकडून पुढील धोका टाळण्यासाठी तातडीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सोबतच अग्निशमन दलानेही त्वरेने दाखल होऊन पहाटे ३ च्या सुमारास आग विझविली.

यानंतर महावितरणकडून सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे व जळालेल्या वीजवाहिन्यांच्या दुरूस्तीचे कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. यामध्ये पर्यायी व्यवस्थेतून विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव परिसरातील सुमारे १ लाख १५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पहाटे ५ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला. मात्र विजेच्या वाढलेल्या मागणीमुळे पर्यायी वीजवाहिन्यांवर भार व्यवस्थापन शक्य नसल्याने या परिसरातील सुमारे १० हजार लघुदाब आणि दिघी परिसरातील सुमारे १७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू होऊ शकला नाही.

महावितरणकडून दुरुस्ती कामे त्वरित करण्यासाठी एकाचवेळी ६ कंत्राटदारांना पाचारण करण्यात आले. सोबतच नगररोड विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अशोक जाधव, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. शारंगधर केनेकर व हर्षितकुमार वाकोडे यांच्यासह शाखा अभियंते, जनमित्रांनी दुरुस्ती कामात सहभाग घेतला.  वीजवाहिन्यांचा जळालेला भाग बदलणे, जॉईंट देणे व इतर कामांसह वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे कामे दुपारी १२.३० वाजता पूर्ण झाले. त्यानंतर सर्वच परिसरातील वीजपुरवठा दुरुस्त केलेल्या वाहिन्यांद्वारे सुरू करण्यात आला.

ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा

योगी पावन मनाचा। साही अपराध जनाचा।

विश्व रागे झाले वन्हि। संते सुखे व्हावे पाणी।

शब्द शस्त्रे झाले क्लेश। संती मानावा उपदेश।

विश्वपट ब्रह्म दोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।

“प्रत्येकाच्या जीवनात अध्यात्मिक तेजाचे दीपप्रज्वलित करत संपूर्ण विश्वासाठी ‘पसायदान’रूपी विश्वप्रार्थना लिहिणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज अवघ्या विश्वाचे माऊली बनले. भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या कुटुंबाची चरित्रगाथा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या माध्यमांतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचणार आहे. माउलींचे समता, बंधुतेचे विचार आणि आचरण यांचे आदर्श उलगडून दाखवतानाच प्रेक्षकांना दिव्यत्वाचे दर्शनही अनुभवायास मिळणार आहे. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित हा भव्य चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.

नुकताच या चित्रपटाचा हृदय संगीत सोहळा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते संपन्न झाला. ‘न भूतो न भविष्यती’ असा जिवंत संगीत सोहळा मी पहिल्यांदाच अनुभवाला प्रत्येकाच्या मनात संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असतेच त्या प्रतिमेला परत उजाळा देत   जिवंत करण्याचे काम या सुरेल सोहळ्याने केले असे सांगत ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. 

रंगलेल्या या स्वरयज्ञात गायकांनी सुरेल आवाजात गीते सादर करून ज्ञानेश्वर चरित्राची अनुभूती दिली. शेकडो श्रोत्यांच्या उपस्थितीत भक्तिपूर्ण वातावरणात ज्ञानेश्वरीचा हा आनंद सोहळा रंगला. ज्ञानेश्वरीच्या सर्व गीतांच्या सादरीकरणांमध्ये श्रोते रममाण होऊन गेले होते. तर काही गीतांच्या सादरीकरणाच्या वेळी श्रोत्यांचे डोळे पाणावले. पसायदानाच्या अलौकिक अनुभूतीला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. या सुमधुर गीतांच्या सादरीकरणासोबतच  संत ज्ञानेश्वरांच्या गाथेतील काही प्रसंग ही यावेळी सादर करण्यात आला. एकाहून एक सरस एक अभंगांनी वातावरण भक्तिमय होत गेले. कार्यक्रम असा उत्तरोत्तर रंगत असताना मनावर विशेषत्वाने ठसा उमटला तो पसायदानाच्या अलौकिक अनुभूतीने. या सगळ्या अभंगांचं निरूपण करत असताना ज्ञानेश्वरांचं चरित्र,त्यांची शैली, तिचे अनेकविध पैलु  याबद्दल अतिशय मनमोकळा संवाद साधत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या सोहळ्यात वेगळंच  चैतन्य आणलं.

या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, यांनी तर  संगीत वितरणाची जबाबदारी झी म्युझिकने सांभाळली आहे.  

परस्परांशी आर्त जिव्हाळ्याने बांधलेल्या आणि जगण्याचे एकच प्रयोजन असलेल्या भावंडांचे नाते कसे असावे हे दाखवतानाच व्यवहाराची थोर शिकवण शब्दाशब्दांतून देत असतानाच भक्तीचे रहस्य या भावंडांनी सहज उलगडून दाखविले. वैयक्तिक आत्मोद्धाराला लोकोद्धाराची जोड देऊन आत्मकल्याण आणि विश्वकल्याण साधावे हे सर्व तत्वज्ञान या भावंडांच्या पदोपदी प्रत्ययास येते. विश्वाला मांगल्य प्रदान करणाऱ्या या भावंडांचे अजोड कार्य व विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे व्हावेत, या उद्देशाने ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा विषय हाती घेतल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सांगतात. 

कैद्याच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी वारसाना पाच लाख रुपये तर आत्महत्येच्या प्रकरणात एक लाख रुपये

मुंबई-राज्यातील कारागृहांमध्ये कोठडीत असलेल्या कैद्यांचा मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झाल्यास त्याच्या वारसांना राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या सूचनेनुसार भरपाई देण्याच्या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
या धोरणानुसार कारागृहामध्ये काम करताना झालेल्या अपघातामुळे, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे, कारागृह कर्मचाऱ्यांच्या मारहाणीमुळे किंवा कैद्यांच्या आपापसातील भांडणात मृत्यू झाल्यास आणि संबंधित प्रकरणात प्रशासनाचा निष्काळजीपणा चौकशीतून सिद्ध झाल्यास, कैद्याच्या वारसांना पाच लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. तुरुंगवासातील आत्महत्येच्या प्रकरणात कैद्याच्या वारसांना एक लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व कारागृहांमध्ये हे धोरण लागू राहणार आहे. कैद्याचा मृत्यू वार्धक्य, दीर्घ आजार, कारागृहातून पलायन करताना अपघातात, जामीनावर असताना, किंवा उपचार नाकारल्याने झाला असल्यास कोणतीही भरपाई देण्यात येणार नाही.
नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्यास मात्र शासनाच्या विद्यमान धोरणानुसार भरपाई मिळेल.
भरपाईसाठी संबंधित कारागृह अधीक्षकांनी प्राथमिक चौकशी, शवविच्छेदन, पंचनामा, वैद्यकीय अहवाल, न्यायालयीन व जिल्हाधिकाऱ्यांचा तपास आदी कागदपत्रांसह अहवाल प्रादेशिक विभाग प्रमुखांकडे सादर करावा लागेल. यानंतर प्रकरणाची सखोल चौकशी करून अंतिम प्रस्ताव अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे सादर केला जाईल. त्यांच्या शिफारशींच्यानंतर शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल आणि भरपाई दिली जाईल. मृत्युच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

350+ अब्जांहून अधिक पावले चालल्यानेआदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सच्या हेल्थ रिटर्न्स™ मॉडेलअंतर्गत1 लाखांहून अधिक पॉलिसीधारकांना बक्षिसे

मुंबई : भारतातील आघाडीची वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा कंपनी आदित्य बिर्ला कॅपिटलची आरोग्य विमा शाखा आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, (“ABHICL”), ने जागतिक आरोग्य दिनानिमित्त घोषणा केली. आर्थिक वर्ष 2025 (एप्रिल 2024-मार्च 2025) मध्ये त्यांच्या हेल्दी हार्ट स्कोअर™ द्वारे देखरेख करण्यात आलेल्या आणि निरोगी जीवनशैलीची निवड करण्यासाठी तसेच हृदयाचे चांगले आरोग्य राखण्यासाठी त्यांच्या पहिल्याच HealthReturns™ मॉडेलचा 1 लाखांहून अधिक पॉलिसीधारकांना फायदा झाला आहे. HealthReturns™ मॉडेल प्रामुख्याने नियमित शारीरिक हालचालींवर लक्ष केंद्रित करते, ज्यामध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची उपलब्धता असते, जी ग्राहकांना सुधारित आरोग्य परिणाम प्रदान करण्यास मदत करते. आतापर्यंत 350 अब्जांपेक्षा जास्त पावले चालली आहेत, त्या ग्राहकांची आरोग्याप्रतीची ही वचनबद्धता त्यांच्या दैनंदिन सवयींमध्ये स्पष्ट होते.

‘हेल्थ – फर्स्ट’ दृष्टिकोनातून कंपनी रिअ‍ॅक्टिव्ह कव्हरेजपासून प्रोअ‍ॅक्टिव्ह वेलनेसला जास्त प्राधान्य देताना दिसते आहे. उद्योगाची पुनर्परिभाषा करतानाच आपल्या ऑफरमध्ये वेलनेस आणि हेल्थ मॅनेजमेंटचा समावेश करते आहे. या उपक्रमाचा एक मुख्य घटक म्हणजे अ‍ॅक्टिव्ह डेझ™, जो ग्राहकांना 10,000 पावले चालणे, वर्कआउट सेशनमध्ये 300 कॅलरीज बर्न करणे यासारख्या फिटनेस ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून हेल्थ रिटर्न™ मिळवण्याची परवानगी देतो. एका वर्षात 325 अ‍ॅक्टिव्ह डेझ™ मिळवणारे आणि ग्रीन हेल्दी हार्ट स्कोअर™ राखणारे पॉलिसीधारक त्यांच्या वार्षिक प्रीमियम रकमेच्या 100% पर्यंत हेल्थ रिटर्न™ म्हणून परत मिळवू शकतात.

·    आर्थिक वर्ष 25 मध्ये, आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सने 3.8 लाख लोकांचे आरोग्य मूल्यांकन केले आणि 18 लाख वैयक्तिकृत वेलबीइंग स्कोअर™ (एकूण आरोग्य आणि निरोगीपणाच्या स्थितीचा गतिमान ML-चालित निर्देशक) तयार केला आहे, यामुळे ग्राहकांना स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास मदत झाली आहे.

·    प्रतिबंधात्मक काळजीवर जास्त लक्ष केंद्रित करून, त्याच कालावधीत, 1 लाख+ ग्राहकांना आरोग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे, तर 1.6 लाख+ ग्राहकांना आरोग्य हस्तक्षेप देण्यात आले आहेत.

·    ABHICL च्या परिसंस्था प्रतिबंधात्मक काळजीशी संबंधित 81% ग्राहकांना HbA1C, रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब यासारख्या प्रमुख आरोग्य निर्देशकांवर चांगले नियंत्रण मिळाले आहे, ज्यामुळे आर्थिक वर्ष 25 मध्ये ABHICL ची आरोग्य परिणामांसाठी वचनबद्धता मजबूत झाली आहे.

आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सचे सीईओ श्री. मयंक बथवाल म्हणाले, आजच्या जगात आरोग्य विम्याची भूमिका ही आर्थिक संरक्षणाच्या पलीकडे जाऊन उत्तम जीवनमानाचे साधन बनते आहे. आज ग्राहक केवळ वैद्यकीय खर्चाच्या तरतुदीपेक्षा प्रतिबंधात्मक काळजीला प्राधान्य देत आहेज्यामुळे अपेक्षांमध्ये मूलभूत बदल झाला आहे. आरोग्य विम्यात निरोगीपणा आणि प्रतिबंधात्मक काळजी एकत्रित करण्यात आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स आघाडीवर आहे. आमचे अग्रगण्य हेल्थ रिटर्न™ मॉडेल पॉलिसीधारकांना केवळ निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहित करत नाही तर कल्याणासाठी सक्रियआरोग्य-प्रथम दृष्टिकोन राबवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देते. आमचे ध्येय आरोग्य-प्रथम परिसंस्था तयार करणे आहेजिथे पॉलिसीधारक आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असतील आणि निरोगीदीर्घ आयुष्य जगण्यासाठी सक्षम असतील.”

हे वेगळे मॉडेल आणि 100% आरोग्य, 100% आरोग्य विम्याचे आश्वासन अ‍ॅक्टिव्ह हेल्थ अ‍ॅपच्या वैयक्तिकृत सहभागाद्वारे दिले जाते, जे प्रत्येक वापरकर्त्याच्या अद्वितीय गरजा आणि वर्तनानुसार तयार केले जाते. स्थापनेपासूनच, आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सने चार-स्तरीय पाया रचला आहे, ज्यात विम्याची भूमिका केवळ आजार झाल्यावर त्यावर उपाय, त्याची तरतूद एवढीच नाही तर ग्राहकांना सक्रिय आरोग्य भागीदाराचेही महत्त्व पटवून देते आहे:

i.तुमचे आरोग्य जाणून घ्या – वेल-बीइंग स्कोअरलाइफस्टाइल स्कोअरडिजिटल हेल्थ असेसमेंट आणि मानसिक वेल-बीइंग मूल्यांकन यासारख्या साधनांद्वारे ग्राहकांना विविध प्रकारची माहिती उपलब्ध आहे.

i. तुमचे आरोग्य सुधारा – ग्राहकांना आरोग्य सेवा आणि आरोग्य व्यवस्थापन सेवा उपलब्ध आहेतज्यामध्ये ABHICL च्या आरोग्य प्रशिक्षकांचे नेटवर्क समाविष्ट आहेज्यांनी या सेवांद्वारे ग्राहकांना दीर्घकालीन आजार यशस्वीरित्या सुधारण्यास मदत केली आहे.

ii.बक्षीस मिळवा – हा पैलू ग्राहकांना HealthReturns™ सारख्या फायद्यांसह त्यांच्या कल्याणाला प्राधान्य देण्यास प्रोत्साहित करते. Active Dayz™ ट्रॅक करूनफिटनेस ऍक्टिव्हिटीत सहभागी होऊन तसेच नियमित आरोग्य तपासणी करूनग्राहक विशेष बक्षिसे अनलॉक करू शकतात जे केवळ त्यांची आर्थिक सुरक्षितता वाढवत नाहीत तर आयुष्यभर निरोगीपणाला प्रोत्साहन देतात.

iii.संरक्षित रहा – ABHICL व्यापक आरोग्य विमा योजना ऑफर करते ज्यामध्ये उद्योगातील आघाडीचे फायदे आहेत जसे की बिगर-वैद्यकीय खर्चासाठी 100% कव्हरेजखोली भाड्यावर कोणतीही उप-मर्यादा नाहीप्रसूती कव्हरविमा रकमेतील गुणक तसेच उत्पादन अटी आणि शर्तींनुसार बरेच काही.

आता नगराध्यक्षांना बहुमताने हटवता येणार:राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; नगर परिषद, नगरपंचायती, औद्योगिक नगरी कायद्यात करणार सुधारणा

स्थावर मालमत्तांच्या भाडेपट्ट्यांच्या नियमांत बदल, नवीन दराबाबत अधिसूचना

नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्ता करासाठी अभय योजना

मुंबई-राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार सदस्यांना देण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या तरतुदींस मान्यता देऊन महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

यापुर्वी नगराध्यक्षांना पदावरुन दूर करण्याच्या प्रक्रियेत निवडून आलेल्या सदस्यापैकी पन्नास टक्के सदस्यांच्या सह्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जात असे. त्यानंतर शासनस्तरावर कार्यवाही अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची कार्यवाही केली जात असे. त्याऐवजी आता अध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांना अधिकार दिले जाणार आहेत. त्यानुसार निवडून आलेल्या सदस्य संख्येपैकी दोन तृतीयांश संख्येने सदस्यांच्या सह्यांचा प्रस्ताव पाठवला जाईल. ज्यावर जिल्हाधिकाऱ्यांना दहा दिवसांच्या आता विशेष सभा आयोजित करून मतदानाद्वारे निर्णय घ्यावा लागेल. याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यास तसेच त्यासाठीचा अध्यादेश काढण्यास मान्यता देण्यात आली.

नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तांच्या भाडेपट्ट्यांच्या नियमांत बदल, नवीन दराबाबत अधिसूचना काढणार

राज्यातील महानगरपालिकांच्या स्थावर मालमत्ता व नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरीतील मालमत्ता भाडेपट्ट्याने देण्याच्या नियमांमध्ये एकवाक्यता आणण्यात येणार हे. त्याकरिता नवीन दरांबाबत अधिसूचना काढण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
राज्यातील महानगरपालिकांच्या स्थावर मालमत्ता भाडेपट्टयाने देणे, त्यांचे नूतनीकरण व हस्तांतरण याबाबत ६ नोव्हेंबर २०२३ रोजी नियम निश्चित करण्यात आले आहेत. त्यालाच अनुसरून आता राज्यातील सर्व नागरी स्थानिक संस्थांतील मालमत्तांच्या हस्तांतरणांत एकवाक्यता आणण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिका मालमत्ता हस्तांतरण नियमावलीच्या धर्तीवर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी (स्थावर मालमत्तेचे हस्तांतरण) (सुधारणा) नियम २०२५ निश्चित करण्यात येणार आहेत.
नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरी यांच्या मालमत्तांचे निवासी, शैक्षणिक, धर्मादाय व सार्वजनिक, व्यावसायिक व औद्योगिक असे वर्गीकरण करण्यात आले आहे. यात सुधारित नियमानुसार निवासी, शैक्षणिक, धर्मादाय व सार्वजनिक वापरासाठीच्या मालमत्तांचा भाडेपट्टा दर हा वर्तमान बाजारमूल्याच्या (रेडी रेकनर) ०.५ टक्के पेक्षा कमी असणार नाही. तसेच व्यावसायिक व औद्योगिक वापरासाठीच्या मालमत्तेचा बाजारमूल्याच्या ०.७ टक्के पेक्षा कमी असणार अशी तरतूद करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
या मालमत्तांचे अधिमुल्य, भाडेपट्टा दर व सुरक्षा ठेव निश्चिती ही संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समिती करेल.
सदर नियमांबाबत हरकती व सूचना मागविण्यात येतील व त्यानंतर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्ता करासाठी अभय योजना

राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरी क्षेत्रातील थकीत मालमत्ता कर वसूलीकरीता दंड माफ करून वसूली वाढविण्यासाठी अभय योजना लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्तांच्या थकीत करांवर दरमहा २% दंड लावण्याची तरतूद आहे. यामुळे मालमत्ता धारकाच्या एकूण थकबाकीमध्ये वाढ होऊन दंडाची ही रक्कम अनेकदा मूळ कराच्या रकमेपेक्षा अधिक होते. मूळ कराच्या रकमेपेक्षा दंडाची रक्कम अधिक झाल्याने मालमत्ताधारक कर भरण्यास टाळाटाळ करतात. यावर उपाय म्हणून थकीत मालमत्ता करावरील दंड माफ करून अभय योजना लागू करण्यात येणार आहे. यापुर्वीच्या अधिनियमात अशा अशा दंड माफीची तरतूद नाही. तशी तरतूद अधिनियमात करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

डॉ. आंबेडकर यांनी देशाला नवी दिशा देण्याचे कार्य केले-प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड

पुणे, दि.१४ एप्रिल : ” भारत देशाला नवी दिशा देण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांनी केले आहे. भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि परंपरेचा धागा पकडून त्यांनी संपूर्ण मानव जातीचा उद्धार केला आहे. सदगुणांची पूजा हीच ईश्वर पूजा आहे.” असे विचार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
प्रबुद्धनायक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वीं जयंती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने कोथरूड येथील विद्यापीठाच्या परिसरात साजरी केली. या वेळी विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी आपले विचार व्यक्त केले.
या प्रसंगी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण, सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, डॉ. विश्वजीत नागरगोजे, प्रा.डॉ. दत्ता दंडगे, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. विनोद जाधव उपस्थित होते.
डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले,” संपूर्ण जगात भारताची ओळख ही म. गांधी, भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पंचशील जीवनात उतरावे.”
डॉ. एस.एन.पठाण म्हणाले,” युगपुरूष डॉ. आंबेडकर यांना केवळ ६५ वर्षांचे जीवन लाभले खरे परंतू त्यांचे कार्य अद्वितीय आहे. यातील ३५ वर्ष शिक्षणात गेले. त्यांना केवळ २५ वर्षे काम करण्यासाठी मिळाले. त्यात काळात त्यांनी शिक्षण संस्थेंची स्थापना, सत्याग्रह, नियतकालिकांची निर्मिती, पक्ष काढणे तसेच विपूल लेखन आणि सर्वात महत्वाचे २३ ग्रंथांचे लिखान केले आहे. शिक्षणा शिवाय पर्याय नाही त्यांचा हा संदेशच मानव जातीच्या उध्दारासाठी अत्यंत महत्वाचा आहे.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,” डॉ. आंबेडकर यांनी ३२ विषयांमध्ये पदव्या घेतल्या होत्या. ९ भाषा अवगत असणारे युगपुरूष डॉ. बाबासाहेब यांनी सतत कठोर परिश्रम, समर्पण, सतत शिकत राहणे या गुणांचा विसर होऊ दिला नाही.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,” शिक्षण हे शस्त्रा प्रमाणे आहे. त्याचा उपयोग कसा करावे हे ज्याने त्याने ठरवावे. प्रगती करावयाची असेल तर जुन्या गोष्टींचे विस्मरण हे उच्चत्तम बुद्धीमत्तेचे लक्षण आहे.”
डॉ. दत्ता दंडगे म्हणाले,” डॉ. आंबेडकर यांनी समतेसाठी चळवळ उभी केली होती. तसेच त्यांनी पाण्यासाठी सत्याग्रह केला. १४ तळ्यांची चळचळ ही इतिहासातील अत्यंत महत्वाची घटना आहे. समाजातील दांभिकतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले जीवन अर्पीत केले होते.”
यानंतर प्रा. गणेश पोकळे, डॉ. जोशी आणि प्रदिप चाफेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला तसेच कवितेचे वाचन केले.
प्रा. विनोद जाधव यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

देशाची वाटचाल, संविधान आधारित होण्याकडे लक्ष देणे, विरोधी पक्षांचे कर्तव्य…!

सत्ताधारी व विरोधकांची ‘संविधानीक कर्तव्यपुर्ती’ हीच बाबासाहेबांना आदरांजली..!
⁃ काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे दि १४ –
प्रत्येकास समान मताचा अधिकार देणारे संविधान हीच भारताची ओळख असुन, संविधानाचे मुल्य जपले तरच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ भारत, आत्मनिर्भर भारत होऊ शकतो.
संविधानीक मुल्यांची व देशाच्या स्वायत्त संस्थांची पायमल्ली रोखत देशाची वाटचाल ‘संविधान आधारित’ होण्याकडे लक्ष ठेवणे, हे विरोधी पक्षांचे कर्तव्य असुन विरोधी पक्षांची संविधानीक कर्तव्यपुर्ती ही डॅा बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी अभिवादनपर कार्यक्रमात बोलतांना केले.
“महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस लिगल विभागा”च्या वतीने
महामानव, भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी, पुणे मनपा येथील डॅा आंबेडकरांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रमात बोलतांना त्यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजक सरचिटणीस ॲड फैयाझ शेख यांनी स्वागत – प्रास्ताविक केले. ऊपध्यक्ष ॲड शहीद अख्तर यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी ॲड श्रीकांत पाटील, ॲड सुरेश नांगरे, ॲड बाळासाहेब बामणे, ॲड विजय तिकोणे, ॲड अतुल गुंड पाटील, ॲड राजाभाऊ चांदेरे, ॲड इराफन शेख, ॲड सुरेश देवकर, ॲड आलीस सय्यद, इंटकचे मनोहर गाडेकर, जेष्ठ काँग्रेसजन सुरेश नांगरे, सुभाष जेधे, गणेश शिंदे, धनंजय भिलारे, विना कदम, अनिल धिमधीमे, विक्रांत धोत्रे इ उपस्थित होते…
या प्रसंगी संविधान प्रतींचे वाटप व सामुहीक वाचन करण्यात आले.
विविध धर्मिय स्वातंत्र्य सेनानींच्या प्रदीर्घ ब्रिटीश विरोधी लढ्यामुळे, बलीदानामुळे भारत लोकशाही प्रणीत प्रजासत्ताक देश म्हणून जगासमोर ऊभा राहिला. स्वातंत्र्या करीता वाहीलेल्या बलिदानाचे महत्व लक्षांत घेता, भविष्याची काळजी वहात ‘भारतिय संविधाना प्रती’ जागरूक राहून, भारतीय घटनेचे रक्षण करणे हे भारतीय नागरिकाचे देशाप्रती कर्तव्य ठरणार आहे. संविधानीक लोकशाहीत जागरुक नागरिकच् त्याच्या भविष्याचा शिल्पकार असून, भारताची संविधान आधारीत वाटचालीवर पहारा ठेवणे हीच खऱ्या अर्थाने डॅा बाबासाहेबांना आदरांजली ठरेल” अशा भावना उपस्थितींनी व्यक्त केल्या. ॲड राजेंद्र काळेबेरे यांनी आभार प्रदर्शन यांनी केले.

मोदीजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार?

काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल.

मोदींनी ११ वर्षात देशाचे काय भले केले? हिंदू-मुस्लीम, दलित-सवर्ण-ओबीसी यांच्यात द्वेष पसरवणे ही मोदींची कामागिरी !

मुंबई, दि. १४ एप्रिल २०२५
संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यातील सलोख्याचे संबंध जगजाहीर आहेत. नेहरुंनी बाबासाहेबांना सन्मानाने देशाच्या पहिल्या कायदा मंत्रीपदाची जबाबदारी दिली. आज काँग्रेस पक्षाचा अध्यक्षही दलित समाजाचा आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार? असा थेट सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नरेंद्र मोदी यांना केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा खरपूस समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मोदींनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत हास्यास्पद आहे, या विधानाचा मी जाहीर निषेध करतो. काँग्रेस पक्षाने देशासाठी दिलेले योगदान अधोरेखीत झालेले आहे, काँग्रेसला जाज्वल्य इतिहास आहे, हे मोदीच काय कोणीही नाकारू शकत नाही. काँग्रेस सरकारच्या काळात साक्षरतेपासून अंतराळापर्यंत प्रगती केलेली आहे. नरेंद्र मोदी हे ११ वर्षापासून सत्तेत आहेत, या ११ वर्षांत त्यांनी देशाचे काय भले केले, हे त्यांनी जाहीर करावे. नरेंद्र मोदी यांनी हिंदू-मुस्लीम, दलित-सवर्ण-ओबीसी यांच्यात द्वेष निर्माण करण्याचेच काम केले आहे. तीन तलाक, वक्ख बोर्ड सारखे मुद्दे उपस्थित करून मोदीजींनी मुस्लीम महिलांबद्दलची आपली खोटी तळमळ दाखवण्याचा प्रयत्न केला पण मोदींनी गेल्या ११ वर्षात एकाही मुस्लीम महिलेला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री केले नाही. मोदींनी गेल्या ११ वर्षात एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही. मोदी सरकारच्या कार्यकाळात मुस्लीम आणि दलितांवर अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यांचे लिंचिंग केले जात आहे ते रोखण्यासाठी मोदींनी काहीही केले नाही त्यामुळे त्यांच्या कोरड्या भाषणबाजीला काही अर्थ नाही.

देशात शेतकऱ्यांचा शेतमालाला भाव मिळत नाही, तरुणांना रोजगार मिळत नाही, देशातील बहुजन समाज अस्वस्थ आहे. या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे पण मोदी मात्र स्वतःची आरती करून घेत आहेत. कोराना काळात टाळी, थाळी वाजवायला लावली आता अमेरिकेच्या टेरिफवर काय भूमिका आहे ते स्पष्ट करावे. देशातील गरिबांची संख्या मोदींच्या काळात वाढत आहे, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, लाखोंच्या संख्येने लोक देश सोडून चालले आहेत हेच मोदींनी देशाचे भले केले आहे का. भाजपा सरकार मध्ये दलित अत्याचार वाढले आहेत, मॉब लिंचिग सारखे प्रकार दलितांबाबत झाले आहेत, ते थांबावे यासाठी मोदींनी काहीही प्रयत्न केले नाहीत. सातत्याने काँग्रेसवर टीका करणे हेच त्यांचे काम राहिले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भाजपा, रा. स्व. संघ यांना किती प्रेम आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही, याच विचाराच्या लोकांनी बाबासाहेबांचा सातत्याने अपमान केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला रा. स्व. संघ पहिल्यापासूनच मानत नाही. रामलीला मैदानावर बाबासाहेबांचे संविधान कोणी जाळले, हे मोदींना माहित नाही का? परंतु खोटा इतिहास सांगून दिशाभूल करणे ही संघाची शिकवण आहे, तेच मोदी करत आहेत. पण त्यांच्या अशा विधानाने खरा इतिहास झाकला जाणार नाही व रा. स्व. संघ, भाजपा व मोदींनी केलेली पापं धूवून निघणार नाहीत. प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीवर प्रेम असले पाहिजे हे संविधान सांगते, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही भारताची परंपरा आहे, ‘आतां विश्वात्मके देवे’, हे ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचे तत्वज्ञान आहे, तेच तत्वज्ञान काँग्रेसचे आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे

डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचे आपल्या सर्वांच्या आयुष्यात अढळ योगदान – अविनाश बागवे

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ‘भीम फेस्टिव्हल’

पुणे- ज्यांनी आपल्याला सामाजिक गुलामीतून मुक्त करून आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा हिरावून घेण्यात आलेला हक्क मिळवून दिला अशा पद्धतीने मिळवून दिला कि त्यांच्या जीवनाचा हा आदर्श पिढ्यानपिढ्या पुढे चालणार आहे, आणि पिढ्यानपिढ्याच्या जीवनात या महापुरुषाच्या कार्याचे योगदान अढळ राहणार आहे असे सांगत काँग्रेस पक्षाचे ख्यातनाम ,आणि अभ्यासू नगरसेवक असा लौकिक प्राप्त नेते अविनाश बागवे यांनी येथे वंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त ‘भीम फेस्टिव्हल’ चे उद्घाटन केले.

यावेळी ते म्हणाले,’ डॉ आंबेडकरांच्या कार्यामुळेच आपल्या संविधानात न्याय, समानता आणि स्वतंत्रतेचे सिद्धांत समाविष्ट केले गेले. बाबासाहेबांच्या विचारांनी लाखो लोकांना हक्क दिले, त्यांच्या कष्टामुळेच शिक्षण, समानता, कष्ट याची जाणीव झाली. त्यांच्या जीवनाचा आदर्श पिढ्यानपिढ्या पुढे चालणार आहे. आज त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून आपण त्यांची जयंती साजरी करतो. यानिमित्ताने पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघातील मंगळवार पेठेतील भीमनगर येथे वंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त ‘भीम फेस्टिव्हल’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी याचे उदघाटन काँग्रेस पक्षाचे नेते अविनाश बागवे, व अल्पसंख्यांक विभागाचे पुणे शहराचे पदाधिकारी, माजी नगरसेवक मुक्तार शेख, तसेच या फेस्टिव्हल चे आयोजक किशोर भोसले, रवींद्र भिंगारे या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी अत्यंत सुंदर पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जेष्ठ नागरिक जे प्रत्येक परिसराचा आधारस्तंभ असतात, अशा जेष्ठ नागरिक ज्यांच्या लग्नाला २५ वर्ष होऊन गेली आहेत अशा नागरिकांचा जोडीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली व या कार्यक्रमाचे कौतुकही केले. यावेळी नागरिकांशी संवाद साधत वंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

तकलादू देशभक्तांच्या काळात बाबासाहेबांचेच विचार दिशादर्शक ठरतील-माजी आमदार मोहन जोशी

पुणे – द्वेषावर आधारित राजकारण करून मिरवणाऱ्या तकलादू देशभक्तांच्या काळात सध्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि संविधान देशाला योग्य दिशेला नेईल, असे प्रतिपादन माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केले.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. डॉ बाबासाहेब यांनी क्रांतीकारी आणि दूरदृष्टीचे विचार मांडले. त्यातूनच लोकशाहीला बळकटी आली, असे या कार्यक्रमात बोलताना मोहन जोशी यांनी सांगितले.

या प्रसंगी सुनिल मलके, प्रशांत सुरसे, सुरेश कांबळे, प्रथमेश अबनावे, चेतन आग्रवाल, स्वाती शिंदे, साजीद शेख, विकास माने, पंकज बनसोडे, विक्रांत दिवेकर, व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.