Home Blog Page 3301

कोंढव्यात भाजपच्या पुढाऱ्याकडून ‘डोंगर घोटाळा’ शिवसेना आक्रमक (व्हिडीओ)

0

पुणे- कोंढवा येथे भाजपच्या पुढाऱ्याकडून ‘डोंगर घोटाळा’ झाल्याचा घणघणाती आरोप करणारा मुद्दा आज शिवसेनेच्या नगरसेविका संगीता ठोसर आणि शिवसेना गटनेते संजय भोसले यांनी महापालिकेच्या मुख्य सभेत केला. मात्र या प्रकरणी अवघ्या मिनिटभरात लक्ष हटवून सभा तहकूब करण्यात आली पहा आणि नीट ऐका .. नेमके काय आहे हे प्रकरण … (व्हिडीओ)

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘सॅट अ‍ॅट बी व्ही’ चर्चासत्राचा चे आयोजन आत्मपरीक्षण करणे गरजेचे : अनिल जठार

0
पुणे :
​’सॅट अ‍ॅट बी व्ही‘ चर्चासत्राचा चे ​भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. बीपीएल ग्रुप चे ‘एक्स रे’ सल्लागार (बंगळूर) अनिल जठार यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आनंद भालेराव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
अनिल जठार यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘यशस्वी माणूस होण्यासाठी आपली ताकद आणि कमकुवतता जाणून घेण्यासाठी स्वत: शी बोला. आपण करीत असलेले कार्य एकनिष्ठेच्या धोरणा नुसार आहे की नाही याबाबत प्रत्येक व्यक्तीने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. व्यक्तिमत्वातील दोष ओळखण्यासाठी आणि सकारात्मकता येण्यासाठी स्वतःशी बोलने उत्तम. याचा अर्थ स्वतःची प्रशंसा करणे नसून, यामुळे आत्मपरीक्षण केले जाऊन कमकुवतपणा सुधारला जाऊ शकतो.

उपक्रमाबाबत माहिती देताना डॉ.भालेराव म्हणाले, ‘या उपक्रमाचे चौथे वर्ष आहे. विद्यार्थ्यांचा थेट उद्योजकांशी संवाद साधण्याच्या प्रमुख हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना नवोदित अभियंते म्हणून काम करताना तसेच उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दरी कमी करण्यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे. या उपक्रमास विद्यर्थ्यांकडून आणि उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.’ ​
 
​यशस्वी उद्योजकांची कौशल्ये, त्यांचा यशाचा प्रवास याबद्दल ​प्रत्यक्ष विचार ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे. भारतीय आणि पाश्च्यात्य व्यवस्थापकीय धोरणे विद्यार्थ्यांना शिकायला मिळतात.

आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कट्टीबध्द – आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा

0

पुणे दि. 9: आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. “पेसा” कायदा करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असून आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कट्टीबध्द असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आज केले.

येथील बालगंधर्व रंगमंदिरात जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थी सत्कार,तसेच संकेतस्थळ व मोबाईल ॲपचा शुभारंभ श्री.विष्णू सवरा यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास व वन विभागाचे राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, राष्ट्रीय जनजाती आयोगाच्या सदस्या माया इवनाते, आमदार डॉ. अशोक ऊइके, आमदार डॉ. देवराज होळी, आमदार पास्कल धनारे, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनिषा वर्मा, आदिवासी विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त नरेंद्र पोयाम, आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश जगदाळे उपस्थित होते.

श्री. विष्णू सावरा म्हणाले, आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. त्यासाठी आदिवासी मुलांना शासनाच्यावतीने प्रत्येक शहरातील नामांकित शाळेत संधी उपलब्ध करुन दिली जात आहे. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने त्यांचा विकास होत आहे. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना चांगल्या वसतिगृहात राहण्याची सोयी करुन दिल्या जात आहेत. स्पर्धा परिक्षेसाठी आदिवासी मुलांसाठी विशेष वर्गांचे आयोजन करण्यात येते. तसेच आदिवासी मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य विकास योजना राबवत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शासनाच्यावतीने सत्कार करण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून आदिवासी विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्याचे आवाहन श्री. सवरा यांनी केले.

राजे आम्ब्रीशराव म्हणाले, आदिवासी मुलांमध्ये भरपूर गुणवत्ता आहे. मुलांमधील गुणवत्ता हेरून त्यांना योग्य मार्ग दाखविण्याची गरज आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमामुळे आदिवासी मुले विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. सर्व समाजाच्या उत्थानासाठी ही आवश्यक आहे.

यावेळी महापौर मुक्ता टिळक, माया इवनाते, आमदार डॉ. देवराज होळी, आमदार डॉ. अशोक ऊइके यांची भाषणे झाली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याच्या विविध भागातून आलेल्या आदिवासी बांधवांनी रेला, तारपा आणि किंगरी ही पारंपारिक नृत्य सादर केले. यावेळी 10 वी, 12 वी सह विविध क्षेत्रात गुणवत्ता प्राप्त केलेल्या 122 विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच www.mahatraibal.gov.in या संकेत स्थळासह “आदिवासी विकास ॲप” हे मोबाईल ॲप व आदिवासी विकास विभागाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषा वर्मा यांनी केले. तर आभार रामंचद्र कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमाला राज्याच्या विविध भागातून आदिवासी बांधव, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******

शिक्षण संस्थांनी परस्पर सामंजस्य ठेवावे डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे

0
पुणे, ता. ९ – देशातील विद्यापीठे जागतिक दर्जाची व्हावीत यासाठी केंद्र शासन स्पर्धात्मक प्रोत्साहन देत आहे. या स्पर्धेत सरकारी व खाजगी क्षेत्रातील प्रत्येकी दहा संस्थांना चांगली संधी आहे. ही संधी साधण्यासाठी संस्थांनी परस्पर सामंजस्य आणि सहकार्य ठेवणे आवश्यक असल्याचे मत ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकदिन कार्यक्रमात डॉ. सहस्त्रबुध्दे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर, कार्यवाह प्रा. आनंद भिडे, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सहस्त्रबुध्दे पुढे म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित शंभर शिक्षण संस्थांमध्ये स्थान मिळविण्याची क्षमता देशातील शिक्षण संस्थांमध्ये आहे. आपल्या संस्थेकडील चांगल्या गोष्टींचे इतर संस्थांशी आदान-प्रदान केल्यास त्याचा निश्‍चित फायदा होईल. शिक्षण क्षेत्रातील भ‘ष्टाचार हे एक आव्हान आहे, त्याला संस्थांनी थारा न देता, योग्य ठिकाणी तक्रार करून, आपले चांगले कार्य सुरू ठेवावे.’
कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मानांकित संस्थांमध्ये देशात दहावा क्रमांक लागतो. त्यामुळे पहिल्या वीस संस्थांमध्ये नक्की समावेश होईल. त्यासाठी संलग्न महाविद्यालांचा सहभाग महत्वाचा आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘संस्कारक्षम नागरिक बनविणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी अभ्यासक्रमात संस्काराशी संबंधित घटकांचा समावेश करण्याची आवश्यकता आहे.’
यावेळी १२५ गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व कर्मचार्‍यांचा गौरव करण्यात आला. डॉ. चित्रा श्रीधरन यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कार्यवाह प्रा. आनंद भिडे यांनी अहवाल वाचन केले. डॉ. स्वाती सातपुते व डॉ. आरती खातू यांनी परिचय करून दिला. डॉ. स्वाती जोगळेकर यांनी गुणवंतांच्या यादीचे वाचन केले. उपप्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी यांनी आभार मानले. गणेश निसाळ यांनी संस्थेला देणगी दिली.

​​‘हज’ला जाणार्‍या यात्रेकरूंचा सत्कार

0
पुणे:
 
‘हज’ला यात्रेसाठी जाणार्‍या यात्रेकरूंचा सत्कार आज ‘अवामी महाज’ या संस्थेतर्फे  डॉ. पी .ए .इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम आझम कँम्पस येथील डेंटल कॉलेज येथे बुधवारी सकाळी झाला. ‘हज’ला जाणार्‍या यात्रेकरूंनी सर्वांच्या सुख, समाधान आणि शांततेसाठी प्रार्थना करावी’ आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला, असे  डॉ. पी. ए. इनामदार यांनी यावेळी बोलताना केले. 
 
यावेळी प्रमुख पाहुणे  मुस्लिम बँकेचे संचालक आझीम गुडाखूवाला, हाजी कदीर कुरेशी, उस्मान दाऊद खान, चाँद शेख, अब्दुल वाहब, वाहिद बियाबानी, एस. ए. इनामदार, शाहीद इनामदार, लतिफ मगदूम, अवामी महाज संस्थेचे सदस्य व ट्रस्टी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
या कार्यक्रमाची सुरुवात हाजी कदीर कुरेशी, मौलाना हुसेन कुराण पठण केले. मुफ्ती अहमद काझी यांनी हजच्या बाबतीत विस्तारीत माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत अवामी महाराजचे सचिव वाहिद बियाबानी यांनी केले. 
 
यावेळी हज यात्रेला जाणार्‍या यात्रेकरूंना शाल व हार घालून सत्कार करण्यात आला. सर्व हज यात्रेकरूंनी यावेळी शिरखुर्माचा आस्वाद घेतला.  अवामी महाजचे सचिव वाहिद बियाबानी यांनी आभार मानले. 

‘आनंद डोह’ देहु येथे ‘नमामि चंद्रभागा जलसाक्षरता यात्रेचे स्वागत

0
देहू : जलबिरादरी आयोजित ‘नमामि चंद्रभागा‘ जलसाक्षरता यात्रेचे गाथा मंदिर ( आनंद डोह ) येथे स्वागत करण्यात आले. पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणी कॉन्क्वेस्ट कॉलेजच्या वतीने यात्रेच्या जल कलशाचे पूजन करण्यात आले.
 
प्रदूषणमुक्त, जलपर्णी मुक्त इंद्रायणीचा संकल्प यावेळी करण्यात आला.
 
नरेंद्र चुघ, सुनील जोशी,प्रा. नेहा बोकील, दिनेश जोशी, सोमनाथ म्हसगुडे, किशोर धारिया, विनोद बोधनकर, डॉ. सतीश चव्हाण, अनील कानडे, संदीप चोडणकर, शैलेंद्र पटेल, संतोष महाराज काळोखे, प्रा. पूजा अष्टपुत्रे, अनिल काकडे, चंद्रकांत काळोखे वनविभागाच्या अधिकारी सौ. शिंदे उपस्थित होते
 
‘जलपर्णी मुक्ती दलाची स्थापना करण्यात आली. अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले

9 वा तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार 2017 अमेरिकेतील एल्डर डी. टॉड ख्रिस्तोफरसन यांना जाहीर

0

पुणे,दि.9 ऑगस्ट: ‘डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ आणि विश्‍व शांती केंद्र (आळंदी)पुणेतर्फे तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊलींच्या नावाने दिला जाणारा एक अत्यंत प्रतिष्ठेचा, ऐतिहासिक स्वरूपाचा व नोबेल शांतता पारितोषिकाच्या धर्तीवरील 9वा ‘तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार 2017’ अमेरिकेतील चर्च ऑफ जीझस ख्राइस्ट लॅटर डे सेंट्सचे प्रमुख मार्गदर्शक एल्डर डी. टॉड ख्रिस्तोफरसन यांना, संत श्री ज्ञानेश्‍वर महाराजांची जयंती व गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून, सोमवार दि.14 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10.00 वा. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणातील स्वामी विवेकानंद सभामंडप येथे प्रदान करण्यात येणार आहे.

सदरील आंतरराष्ट्रीय कीर्तीचा विश्‍व शांती पुरस्कार, नोबेल चॅरिटेबल ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ.मायकेल नोबेल आणि महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शुभहस्ते आणि पुण्याच्या मा. महापौर सौ. मुक्ता टिळक यांच्या सन्माननीय उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर विश्‍वशांती पुरस्कार समितीचे अध्यक्ष आणि जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. आर.ए. माशेलकर (एफआरएस), जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ.विजय भटकर, विख्यात गीतकार आणि पटकथा लेखक श्री जावेद अख्तर, इंडियन मर्चन्टस चेंबरचे माजी अध्यक्ष श्री नानिक रूपानी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर इतर मान्यवर या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

अमेरिकेतील मान्यवरांची उपस्थिती

विशेष बाब म्हणजे, सदरील संत श्री ज्ञानेश्‍वर विश्‍वशांती पुरस्कार प्रदान समारंभासाठी अमेरिकेतील जगविख्यात विद्यापीठांचे अध्यक्ष मा. डॉ. स्टीफन मॉर्गन, डॉ. मॅथ्यू हॉलंड, डॉ. डिनीस हुफ्तालिन तसेच उटाह टेक्नॉलॉजी कॉन्सिलचे अध्यक्ष डॉ. रिचर्ड नेल्सन आणि अनेक जगविख्यात शास्त्रज्ञ, आध्यात्मिक गुरू, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ञ, तत्त्वज्ञ, कुलगुरू, कुलपती, उद्योजक, अमेरिकेतील काही जाणकार पत्रकार, डिजीटल आणि प्रिंट मिडीयाचे प्रमुख अशा विविध क्षेत्रातील सुमारे 60 मान्यवर व्यक्तींचे शिष्टमंडळ यावेळी उपस्थित राहणार आहे.

तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली व जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचे ज्ञान-विज्ञानाधिष्ठित तत्त्वज्ञान व सिद्धांत पहिल्यांदाच जगासमोर मांडण्याच्या हेतूने, हा जागतिक स्तरावरील तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार दिला जात आहे.
हा प्रतिष्ठेचा ‘जागतिक शांतता पुरस्कार’ यापूर्वी आदरणीय माता श्री अमृतानंदमयी देवी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रवीशंकरजी, जपानच्या गोई पीस फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष श्री. हिरू सायोंजी – श्रीमती मासामी सायोंजी, साधू वासवानी मिशनचे आध्यात्मिक गुरू पूज्य दादा जे. पी. वासवानी, अक्षरधामचे प्रमुख स्वामीजी, तसेच, मानव एकता मिशनचे संस्थापक-अध्यक्ष महायोगी गुरू श्री. एम.(श्री.मुमताज अली खान) यांना प्रदान करण्यात आला आहे.

21 व्या शतकात भारत देश ‘ज्ञानाचे दालन / विश्‍वगुरू’ म्हणून उदयास येणार!

भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंदांनी 1897 मध्ये भाकित केल्याप्रमाणे विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात सुख, समाधान व शांती नांदेल व 21वे शतक हे भारताचे शतक असेल आणि आपला भारत देश ‘ज्ञानाचे दालन व विश्‍वगुरु’ म्हणून जगासमोर उदयास येईल, हे भाकित खरे होण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल असेल, असा आम्हाला विश्‍वास वाटतो.

‘विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून विश्‍वशांती’ या विषयावर दोन दिवसीय
जागतिक शिखर परिषद

भारतीय संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञान व अध्यात्मशास्त्र हे धर्म व अंधश्रद्धेवर आधारित असल्याच्या चुकीच्या संकल्पनेला छेद देण्यासाठी, या संत ज्ञानेश्‍वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार प्रदान समारंभाचे औचित्य साधून, ‘विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून विश्‍वशांती’ या विषयावर दोन दिवसीय जागतिक शिखर परिषद रविवार, दि.13 ऑगस्ट 2017 आणि सोमवार दि. 14 ऑगस्ट 2017 या दरम्यान एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणातील स्वामी विवेकानंद सभामंडप येथे आयोजित करण्यात आली आहे.

सदरील जागतिक शांतता परिषदेसाठी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री ना.श्री.सुधीर मुनगंटीवार हे प्रमुख अतिथी म्हणून दि. 13 ऑगस्ट रोजी उपस्थित राहणार आहे.

या परिषदेचा उद्घाटन समारंभ रविवार दि. 13 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10.00 वा. होणार आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण जी.माधवन नायर यांच्या शुभहस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. नोबेल चॅरिटेबल ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ. मायकेल नोबेल हे विशेष सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, वेस्ट मिन्स्टर कॉलेजचे अध्यक्ष डॉ. स्टीफन मॉर्गन, सुप्रसिद्ध पत्रकार डॉ. फिरोज अहमद बख्त व साल्ट लेक कम्युनिटी कॉलेजचे अध्यक्ष डॉ. डेनिसी हफ्तालिन हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

सदरील जागतिक शांतता परिषदेस ब्ल्यूपाल सोल्यूशन्स प्रा.लि.चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजू मंथेना, उटाह टेक्नॉलॉजी कॉन्सिलचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रिचर्ड आर. नेल्सन, एलएलसी क्लार्क कॅपिटल पार्टनर जेम्स क्लार्क, स्विझरलँन्ड मधील जिनीव्हा येथील इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या प्रोग्राम डायरेक्टर डॉ. लारा श्रीवास्तव, पुण्याच्या लाइफ स्कूलचे संचालक नरेंद्र गोइंदानी, सामाजिक विचारवंत आणि तत्त्वज्ञ आर्य समाजी विद्वान स्वामी अग्निवेशजी, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी-साल्ट लेक कम्यूनिटी कॉलेजच्या प्रा.जेनीफर क्लेन्क, राज्य सभेचे माजी खासदार जमियत उलेमा ए हिंदचे सरचिटणीस मौलाना मोहम्मद मदानी, उत्तर प्रदेश मधील मथुरा वृंदावन येथील श्रीमान मध्व गौडेश्‍वर वैष्णव आचार्य श्री पुंडरिक गोस्वामीजी हे आपले विचार मांडतील.

या परिषदेचा समारोप समारंभ सोमवार दि. 14 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 03.00 ते 4.30 या दरम्यान होणार आहे.

अशी माहिती डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या कार्यकारी संचालिका प्रा. स्वाती कराड-चाटे, एमआयटी डब्ल्यपीयूचे कुलसचिव प्रा. डी.पी. आपटे आणि मिटसॉटचे संचालक डॉ. मिलींद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे उपस्थित होते.

जातीवाद मुक्त भारतासाठी कसबा भाजपची सामुहिक शपथ

0
पुणे- भारतीय जनता पार्टी कसबा मतदार संघाच्या वतीने
आज ९ ऑगस्ट २०१७ रोजी क्रांतिदिना निमित्त स्व. उमाजीराजे नाईक ह्यांच्या स्मारकास  पुष्पहार अर्पण करून
स्वच्छ भारत,भष्टाचार मुक्त भारत,आतंकवादी मुक्त भारत,जातीवाद मुक्त भारत,
सांप्रदाय मुक्त भारत,साकारण्यासाठी सामूहिकरीत्या शपथघेण्यात आली
भा. ज.पा.चे पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले तसेच राजेश येणपुरे -अध्यक्ष-कसबा मतदार संघ,वैशाली नाईक – महिला आघाडी कसबा मतदार संघ,प्रमोद कोंढरे – सरचिटणीस छगन बुलाखे,सम्राट अभय थोरात, नगरसेवक – अध्यक्ष क्रीडा समिती ,अजय अप्पासाहेब खेडेकर, नगरसेवक – अध्यक्ष भावणीपेठ क्षे. कार्यालय,आरतीताई कोंढरे, नगरसेविका,
गायत्री ताई खडके, नगर सेविका अध्यक्ष : विधी समिती पुणे म.न.पा., आणि कसबा मतदार संघाचे पदाधिकारी व कार्यकर्तेयावेळी उपस्थित होते .

त्या ‘बोगस कर्मचाऱ्या’मागील सूत्रधार कोण?

0

पुणे- कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे ,नगरसेवक अविनाश बागवे आणि माय मराठी ने केलेल्या धडक कारवाईत ‘त्या’ बोगस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडून तर देण्यात आले. त्याच्यावर आयुक्तांच्या आदेशान्वये गुन्हाही दाखल झाला . पण त्याला तिथे बसविणारे कोण होते ? कोण कोण या कटात सामील होते ? या सर्वांचा  बुरखा खेचण्याची गरज निर्माण झाली आहे. एकटा ‘तो ‘ कर्मचारी दोषी होता काय ? असा प्रश्न उपस्थित झाला तर त्यामगे नाही असेच उत्तर येईल . त्याला कोणी कोणी सामील करून घेतले होते ? नेमके हि मंडळी कशासाठी अशा बोगस कर्मचाऱ्यांची मदत घेत होती ? या सर्व प्रश्नांची उकल आयुक्त कुणाल कुमार यांच्या निवेदनातून होणार काय ? असा प्रश्न आता पुढे आहे .
दरम्यान गेल्या महिन्यातील १९ जुलै रोजी झालेल्या या प्रकरणाचे नेमके पुढे झाले काय ? महापालिकेच्या आणि पोलिसांच्या तपासात नेमके काय निष्पन्न झाले ? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत . याची उत्तरे अर्थातच येत्या काही दिवसातच मिळण्याची अपेक्षा आहे.

आदिवासी बांधव देशाची वनसंपदा जपण्याचे काम करत आहेत : महापौर मुक्ता टिळक

0
 पुणे :
‘आदिवासी जमातीच्या जीवनसंकृतीवरील छायाचित्रे पाहून आदिवासींच्या जीवनशैलीतील विविधतेची कल्पना येते. या प्रदर्शनातून आपल्या बांधवांच्या अनेक प्रतिमा,त्यांचे राहणीमान, त्यांची संकृती, त्यांची आभूषणे पाहायला मिळाली त्यामुळे त्यांच्या जीवनमानाची कल्पना येते. आदिवासी बांधव देशाची वनसंपदा जपण्याचे काम करत आहेत.या चित्रप्रदर्शनमुळे पुणेकरांना आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडेल.आदिवासी जमातीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे नृत्य आणि कलाकौशल्य ते जगासमोर यावे आणि त्यांना त्याचा चांगला मोबदला मिळावा यासाठी आपण योगदान दिले पाहिजे,’ असे उद्गार आज ‘जागतिक आदिवासी दिना’निमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी महापौर मुक्ता टिळक यांनी काढले.
  ‘आपल्या देशात विविध संस्कृती आहेत त्याचे जतन  केले पाहिजे, राहणारे कुशल कलाकार यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. आपल्या देशाची मूळ संकृती टिकविणे आवश्यक आहे. आदिवासी जीवनशैलीवर आधारित हे प्रदर्शन पाहून मी भारावून गेले आहे,हि कल्पकता जपणे पुढच्या पिढीचे कर्तव्य आहे’, असे प्रतिपादन जान्हवी धारिवाल यांनी ‘जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी केले.
 
मुक्त छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे यांनी काढलेल्या देशातील 16 राज्यांमधील 125 आदिवासीं जमातींच्या जीवनसंस्कृतीवरील छायाचित्रांचे आणि त्यांनी बनविलेल्या इको फ्रेंडली वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
‘रिजनल अ‍ॅडव्हर्टाझिंग मार्केटिंंग असोसिएशन’ (‘रामा’) आणि ‘बालमुद्रा डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’ यांच्या संयुक्तविद्यमाने तसेच ‘रसिकलाल एम. धारिवाल फाऊंडेशन’ च्या सहाय्याने आयोजित हे प्रदर्शन दिनांक ९ ते १५ ऑगस्ट २०१७ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळात ‘राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी’, जवाहरलाल नेहरु सभागृह, घोले रोड येथे आयोजित करण्यात आले आहेे. प्रदर्शन विनामुल्य आहे. या प्रदर्शनात लांजिया सोरा आणि गोंड हे पुरस्कार विजेते आदिवासी कलाकार तांदळाच्या साळीच्या टरफलापासून गणपती, देवी बनविण्याच्या कलेचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत.
या प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने आदिवासींच्या ‘हेडगेअर्स’ आणि ‘टॅटू’ चे विविध पैलू पाहायला मिळणार आहेत. पूर्वा परांजपे यांनी छायाचित्रांना शीर्षक देण्याचे काम पाहिले आहे. यावेळी दिनकर शिलेदार, मीना शिलेदार,श्रीकृष्ण परांजपे, पूर्वा परांजपे, प्रकाश वेलणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रांतीदिन-मशाल मार्च (व्हिडीओ)

0

पुणे-शहर  कॉंग्रेसच्या वतीने क्रांती दिनानिमित्त क्रांती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे . काल क्रांतिदिना निमित्त चलेजाव चळवळीचा इतिहास जागवणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन सुरु केल्यानंतर आज क्रांतिदिनाच्या पूर्व संध्येला मशाल मार्च काढून शहर कॉंग्रेसने पुन्हा पुन्हा १९४२ च्या लढ्याच्या स्मृती जागृत करण्याचा प्रयत्न केला . पहा या मोर्चाची एक अल्पशी झलक

१५ ऑगस्ट पासून १ लाख ४५ हजाराची वाशिंग मशीन बाजारात …

पुणे – सॅमसंग इंडियाने आज वॉशर व ड्रायरची सोय असलेली फ्लेक्सवॉश ही क्रांतीकारी यंत्रणा लाँच केली. उच्च दर्जाची कामगिरी करणाऱ्या या उपकरणामध्ये दोन वॉशर्स आणि एक ड्रायरचा समावेश करण्यात आला आहे. या उपकरणात अत्याधुनिक तंत्रज्ञान, उपयुक्तता व कलात्मक रचना यांचा मेळ घालण्यात आला आहे.

सॅमसंगच्या मूलभूत लाँड्री तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या फ्लेक्सवॉश उपकरणात लोकप्रिय अॅडडोअर वापरण्यात आले आहे, ज्यामुळे ग्राहकाला लाँड्रीसाठी ते वापरताना पूर्ण स्वातंत्र्य आणि लवचिकता मिळतेच, शिवाय कपडे दीर्घकाळ टिकावे म्हणून त्यांची आवश्यक काळजीही घेतली जाते.

सतत व्यग्र असलेल्या लोकांना कमीत कमी वेळेत कपडे धुता यावेत यासाठी तयार करण्यात आलेल्या या वॉशिंग मशिनमध्ये २३ किलोपर्यंतचे वजन स्वीकारण्याची क्षमता आहे. हे बहुपयोगी मशिन सॅमसंगच्या तीन मूलभूत तंत्रज्ञानांचा वापर करते. त्यात इकोबबल, बबल सोक आणि व्हायब्रेशन रिडक्शन टेक्नॉलॉजी (व्हीआरटी प्लस) यांचा समावेश आहे. इकोबबल पाणी व हवेचा वापर करून वॉशिंग पावडर विरघळवते आणि स्वच्छतेचे काम अधिक जलद व परिणामकारक होण्यासाठी बबल अॅक्शन तयार करते.

युनिट्स आयओटीवर आधारित आणि स्मार्ट कंट्रोलचा समावेश असलेले आहेत, ज्यामुळे युजर्सना त्यांच्या स्मार्टफोनद्वारे मशिनवर कुठूनही आणि कोणत्याही वेळेस लक्ष ठेवता येते. मशिन कोणत्याही वेळेस सुरू किंवा बंद करण्याचं नियंत्रण अक्षरशः त्यांच्या तळहातात असतं. कलात्मक रचना आणि सोयीस्कर डिझाइनमुळे भारतीय ग्राहकाच्या वेळेची आणखी बचत होते. आयओटीवर आधारित उपकरणे भविष्यात जास्त प्रचलित होणार असून या तंत्रज्ञानाचे प्रवर्तक असलेली सॅमसंग आपल्या सर्व उत्पादन श्रेणींमध्ये त्याचा वापर करण्याच्या तयारीत आहे.

‘ग्राहकाच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सॅमसंगने कायमच नाविन्यपूर्णतेत आघाडी राखत नवनवीन उत्पादने तयार केली आहेत. फ्लेक्सीवॉशच्या लाँचसह कपडे धुण्याचे काम जास्त सोपे आणि सोयीस्कर करण्याचे आमचे ध्येय आहे. आमच्या नाविन्यपूर्णतेतील प्रत्येक वैशिष्ट्य हे ग्राहकाला डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आले आहे,’ असे अलोक पाठक, उपाध्यक्ष, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग इंडिया यांनी सांगितले. ‘ग्राहकाच्या मानसिकतेत मोठा बदल पाहायला मिळत असून ड्युएलवॉलश आणि अडवॉशसारख्या तंत्रज्ञानांना त्यांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. यामुळे या क्षेत्रातील आघाडीचे स्थान मजबूत करण्यास आम्हाला मदत होत आहे,’ असेही ते म्हणाले.

किंमत आणि उपलब्धता

फ्लेक्सवॉश १५ ऑगस्ट २०१७ पासून सॅमसंगच्या सर्व दालनांत आणि प्रमुख रिटेलर्सकडे १,४५,००० रुपयांत उपलब्ध होणार आहे.

 

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कं. लि.

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कं. लि. आपल्या परिवर्तन घडवू शकणाऱ्या संकल्पना आणि तंत्रज्ञानांच्या मदतीने जगाला प्रेरणा देते व त्याचे रूपही बदलते. कंपनी टीव्ही, स्मार्टफोन्स, वेअरेबल उपकरणे, टॅब्लेट्स, डिजिटल उपकरणे, नेटवर्क यंत्रणा आणि मेमरी, सिस्टीम एलएसआय व  एलईडी सोल्यूशन्स या क्षेत्रांतील समीकरणे नव्याने प्रस्थापित करत आहे.

कर्ज रोख्यांचे २०० कोटी एफ डी करणार

0

पुणे- कर्ज रोख्यांतून मिळालेल्या २०० कोटीच्या रकमेवरील व्याजाचा दरमहा बसणारा सव्वा कोटीचा झटका कमी करण्यासाठी हि संपूर्ण रक्कम राष्ट्रीय बँकेत 6 महिन्यासाठी एफडी म्हणून गुंतविण्याचा निर्णय आज महापालिकेतील स्थायी समितीने घेतला . ८ विरुद्ध 5 अशा मतदानाने हा निर्णय घेण्यात आला .यामुळे 1 कोटी १० लाखाचे व्याज महाप्लीकेला मिळणार आहे .
२४ तास पाणीपुरवठा योजनेतील १८०० कोटीचे टेंडर रद्द करून फेर टेंडर काढण्याचा निर्णय झाल्यानंतर , या कामासाठी कार्जरोख्यांतून उभारलेली रक्कम .. आणि व्याज याबाबत प्रश्न निर्माण झाला होता . आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत झाएल्य निर्णयाची माहिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली .पहा आणि ऐका ..नेमके मोहोळ काय म्हणाले ….

सव्वाशे वर्षाच्या गणेश उत्सवाचे शाही सिलेब्रेशन ; उद्घाटन १२ तारखेला…

0

पुणे- सव्वाशे वर्षांची परंपरा पूर्ण करणाऱ्या गणेश उत्सवानिमित्त यंदा महापालिकेच्या वतीने सुमारे महिनाभर चालणाऱ्या महा उत्सवाचे आयोजन करण्यात येत असून यासंदर्भात महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिलेली संक्षिप्त माहिती ..  

अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचर येथे ‘नमामि चंद्रभागा’ यात्रेचे स्वागत

0
मंचर : भीमा नदीच्या उगमापासून भीमाशंकर ते विजापूर अशी ‘नमामि चंद्रभागा- जल साक्षरता यात्रेस प्रारंभ झाला. दिनांक ७ ते १४ ऑगस्ट २०१७ या कालावधीत काढण्यात आलेल्या यात्रेदरम्यान
आज मंचर येथे अण्णासाहेब आवटे (मंचर) महाविद्यालयात जल जागृती करणारी पथनाट्य सादर करण्यात आली. या पथनाट्यास चांगला प्रतिसाद मिळाला.
​यावेळी ​‘पुणे रोटरी वॉटर कमिटी’ प्रमुख व जलप्रेमी सतीश खाडे, शैलजा ​देशपांडे (जीवित नदी संस्था)​

यांची व्याख्याने झाली. प्राचार्य पांडुरंग गायकवाड अध्यक्षस्थानी होते.

​ ‘ जनतेबरोबर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची जलसाक्षरता देखील महत्वाची आहे. नळांना वॉशर बसवणे, शौचालय बांधकामात सेफ्टी टँक वापरणे, बोअरवेल रिचार्ज करणे हे उपाय ही महत्यपूर्ण ठरतात’, असे सतीश खाडे म्हणाले.
शैलजा देशपांडे म्हणाल्या नदीला समजून घेतले पाहिजे.परिसंस्था जगवून नदी जीवंत ठेवली पाहिजे.
​जलबिरादरीचे राज्य संघटक सुनील जोशी, ‘ जलजागृती यात्रा ‘ समन्वयक नरेंद्र चुघ, मकरंद शेंडे,
​हर्षल मौर्डे, संजय यादवराव, येवले महाराज,

संदीप चोडणकर  उपस्थित होते. यात्रा मार्गावर जलसंरक्षण समित्या स्थापन करण्यात येत आहे.

घोडेगाव येथे राजेंद सिंह यांच्या उपस्थितीत जलसंरक्षण समिती सदस्यांना जल, वन, नदी, पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली.

​भीमा नदी संरक्षणासाठी महाविद्यालयांमध्ये ‘ भीमा कार्य दल ‘ स्थापन करण्यात येत आहे.आवटे महाविद्यालयात या दलाची स्थापना जलबिरादरी ‘ च्या वतीने करण्यात आली
नमामि चंद्रभागा जल साक्षरता यात्रे विषयी
 
‘नमामि चंद्रभागा’या उपक्रमासाठी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ.राजेंद्रसिंह यांच्या समवेत विशेष मेहनत घेतली आहे. आपल्या संदेशात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, भीमा खोर्‍यातील शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पर्यावरणीय क्षेत्रात काम करणारे कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना युवापिढीच्या चळवळीत जोडण्याचा माझा मानस आहे. वनविभाग त्यासाठी प्रयत्नशील राहील.
 
वनविभागांने एका अभ्यास रथाचे नियोजन केले असून, याच दरम्यान गावकरी आणि युवा संवाद केला जाणार आहे. मुंबई येथून प्रा.स्नेहल दोंदे यांच्या नेतृत्वाखाली 15 विद्यार्थिनी या यात्रेत सहभागी होत आहेत.
 
‘हवामान बदल’(क्लायमेटचेंज) हा भारत देशासमोरचा सध्या सर्वात कळीचा मुद्दा आहे. ती राष्ट्रीय आपत्ती मानली पाहिजे. त्यामुळे निर्माण झालेल्या ‘दुष्काळ आणि पूर’ या दोन घटनांचा सर्व देशावर कमालीचा ताण आहे. नदी आणि तिची परिसंस्था यावर तर अधिक आहे. ‘पूर आणि दुष्काळ’ मुक्त आणि समृध्द भारत व्हायचा असेल तर सामान्य माणसांना, विशेषतः पुढच्या पिढीला नदीशी जोडण्याच्या अनुषंगाने ‘जलबिरादरी’ने देशभरात 101 ठिकाणी ‘नदी संवाद जल साक्षरता’ यात्रांचे आयोजन या वर्षात केले आहे. काश्मीर ते कन्याकुमारी या कार्यक्षेत्रात या जलयात्रा आयोजित केल्या होत्या.
 
विजापूर येथे देशभरातून निघालेल्या 101 यात्रांचे समायोजन होणार असून, तेथेच 16 ते 18 ऑगस्ट 2017 या कालावधीत डॉ. राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रीय जलसंमेलन’ आयोजित करण्यात आले आहे.
 
पुढच्या पिढीची आणि सामान्य माणसांची नदी प्रति आपली जबाबदारी निश्‍चित व्हावी सातत्याने होत असलेल्या नदीच्या अतिक्रमण, शोषण आणि प्रदूषण यातून तिला मुक्त केले जावे, या दृष्टीने हे ‘जल-जनजागरण’ आहे. 
 
या उपक्रमास ’पुणे विद्यापीठ’, ’सोलापूर विद्यापीठ’, ’महाराष्ट्र विकास केंद्र’, ’जीवितनदी’, ’पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ’, ’विश्‍वसंस्कृती आश्रम’, ’सागरमित्र अभियान’, ’गायत्री परिवार’, ’वसुंधरा स्वच्छता अभियान’, ’बावधन एरिया सभा-राम नदी स्वच्छता अभियान’, ’वृक्षम’, ’ज्ञानशक्ती विकास वाहिनी’, ’दि गुजराती मित्र मंडळ’, सोलापूर यांचे सहकार्य लाभले आहे.
 
जलबिरादरीचे राज्य संघटक सुनील जोशी, ‘जलबिरादरी’चे पुणे शहर व जिल्हाध्यक्ष विनोद बोधनकर, यात्रा समन्वयक नरेंद्र चुघ, ‘महाराष्ट्र विकास केंद्र’चे अध्यक्ष अनिल पाटील, ‘पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघा’चे अध्यक्ष सुहास पटवर्धन, पावन पवना आणि ‘पानी फौंडेशन’चे समन्वयक धनंजय शेडबाळे, जीवित नदीच्या शैलजा देशपांडे, मकरंद शेंडे, प्रभाकर बांदेकर (जलबिरादरी) आणि संबंधित संस्थांचे प्रतिनिधी यात्रेच्या समन्वयक समितीत सहभागी आहेत.
 
(दिनांक-यात्रा मार्ग आणि कार्यक्रम या क्रमाने)
 
7 ऑगस्ट -शुभारंभ-भीमाशंकर भीमा नदी उगम स्थळ-लोकसंकल्प
 
8 ऑगस्ट -मंचर-राजगुरुनगर-लोकसंवाद
 
9 ऑगस्ट -देहू-आळंदी-नदीकाठच्या लोकांशी संवाद आणि संत-वारकरी संप्रदाय प्रतिनिधीशी चर्चा.
 
10 ऑगस्ट -पुणे -सकाळी 7. 30 -नदी संवाद-जीवित नदी आयोजित नदी भेट.
पुणे विद्यापीठ- 10 ते दुपारी 1 विद्यार्थी संवाद.
 
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका-नगरसेवक, उद्योजक, नागरिकांशी संवाद-दुपारी 3 ते 5  
 
11 ऑगस्ट -यवत,केडगाव,पाटस व दौंड- नागरिकांशी संवाद.
 
12 ऑगस्ट -कुरकुंभ, भिगवण, पळसदेव, रांजणी, अकोले आणि नीरा नरसिंहपूर
 
13 ऑगस्ट -पंढरपूर-वारकरी संप्रदायातीलमान्यवर आणि विद्यार्थी संवाद.
 
14 ऑगस्ट सोलापूर-सोलापूर विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांशी संवाद-सकाळी 10 ते 1 आणि दुपारी- 3 ते 5 जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह-‘नमामि चंद्रभागा’ उपक‘माच्या कृतीनियोजनाबाबत मंथन-लोकसंवाद.​